Friday, 26 December 2014

रक्षाबंधन



काल राखी पोर्णिमा होती सगळ्याच्या वाल वर व्हाटस अप सगळी कडे छान
छान शुभेछ्या फोटो मेसेज बघून छान वाटत होते ना ?
पण खरच सर्वाना आपल्या बहिणी आणि भाव वर एवढे प्रेम खरच आहे का ?
आज जमाना बदलला आहे.महागाई वाढली आहे .
प्रेत्यक जन फक्त स्वताचा विचार करत आहे .
लहानपणी एकमेकावर खूप प्रेम आणि जीव असतो .
किती निरागसता असते त्यात कोणता स्वार्थ नसतो .
हि माझी बहिण आहे हा माझा भाऊ आहे .हि एक निष्पाप भावना असते
पण आज अनेक घरात काय दिसून येते .जेव्हा पासून कायद्याने
मुलीना माहेरच्या संपत्ती मध्ये हिस्सा भेटायला लागला .
खरच तेव्हा पासून बहिण आणि भावा मध्ये असलेले नाते खरच
निकोप राहिले आहे का ?
अनेकदा भावाची परस्थिती अतिशय चांगली असते .
बहिणीची नसते तेव्हा किती भाऊ हे आनंदाने तिचा हिस्सा तिला देतात .
आणि असा किती बहिणी आहे ज्या आपली परस्थिती अतिशय उत्तम असून
देखील आपला हिस्सा नाकारतात .
या मुळे नात्यात एक कटुता येते .आज देखील जमिनी आणि संपती वरून सगळ्यात
जादा कोर्ट केस चालू आहे हे दिसून येते .
अनेकदा सख्या पेक्षा परके परवडले हे आपण नेहमी ऐकतो .
सख्खा भाऊ असून किवा सख्खी बहिण असून अनेक जन त्याच्या
कडे पटत नाही म्हणून पाठ फिरवून मानलेल्या नात्यानं जादा महत्व देताना
दिसून येतात .
उत्सव पेक्षा गिफ्ट ला जादा महत्व आले आहे .
अशा वेळी खरच मनात येते .आज आपण करत असलेले सन उत्सव या मध्ये
पहिल्या एवढा जिव्हाळा खरच राहिला आहे का 
फेसबुक पोस्ट 
११ ऑगस्ट

No comments :

Post a Comment