Tuesday, 3 May 2016

सैराट माझ्या नजरेतून



सैराट माझ्या .नजरेतून ....

या चित्रपटावर ,चित्रपट येण्या आधीच खूप लिहिले गेले होते.आणि बघितल्या नंतर पण खूप लिहिले गेले .अर्थात दोन्ही मध्ये खूप फरक होता.आता पर्यंत अनेक प्रेम हा विषय घेवून चित्रपट आले आहेत .अर्थात नायक नायिका कसे भेटतात नंतर अनेक विरोध पत्करून लग्न करतात.किवा एक होतात .मग अनेकदा ते एका समाजाचे असतात किवा नसतात देखील .
पण सैराट या चित्रपटाचे विशेष कौतुक या साठी .....हळुवार फुलत जाणारे प्रेम आणि त्यानंतर त्यांचे पळून जाणे.येथ पर्यंत कसे सकाळच्या प्रसन्न वातावरणा सारखे तर त्यानंन्तर उ त्तरार्ध मात्र एकदम वाळवंटातील दुपार सारखा ........
येथेच चित्रपटाचे वेगळे पण जाणवते .अनेकदा फक्त प्रेम खूप सुंदर भावना प्रेमासाठी वाटेल ते असेच काही दाखवले जाते
 .
पण खरी सुरवात असते ते पळून गेल्यावर पुढे काय .आधी सगळे सुंदर आणि सोपे वाटते ते किती अवघड असते याची जाणीव होते.मग आधी तू छान मी छान असे वाटणारे प्रेमी मग एकमेकचे गुणदोष दाखवत बसतात.यातून अनेकदा मग पश्चाताप देखील होतो.पण परतीचा मार्ग बंद झालेला असतो .ज्या आईवडिलांनी खूप जीव लावलेले असते त्यांच्या इज्जतीचा त्यांच्या
प्रेमाचा विसर पडलेले असतो.मग परत फिरता येत नाही नाविलाज झाल्या सारखे आयुष्याला सामोरे जावे लागते .याची जाणीव किती प्रेम करणाऱ्यांनाअसते.पण प्रेमात जे आंधळे झालेले असते त्यांना काही दिसत नाही .
प्रेमाच्या शेवटा बद्दल काही बोलणार नाही .कारण अनेकदा मुलगी कोणत्या समाजातील जाती मधील असो,मुलगी आईवडिलांचा अभिमान असतो .तिचा लग्नाचे स्वप्न अनेक आई वडील बघत असतात.तिला सगळे हवे ते देण्याचा
प्रयत्न करतात .तिचे लग्न एक चांगल्या मुलाबरोबर होवे असी अपेक्षा असते.यात चूक काही नाही.जेव्हा मुलगी असे पळून जाते तेव्हा.अनेकदा काही लोक बेभान होतात.आपली मुलगी असे वागू शकते हे त्यांना सहन होत नाही .तर काही गेली आम्हाला मेली ेअसे समजतात तिचा साठी घराचे दारे बंद करतात.आणि स्वताचे आयुष्य जगायला लागतात .पण हा समाज त्यांना विसरू देतो का.मोठ्या शहरात ठीक आहे पण जेव्हा गावच्या ठिकाणी सगळे एकमेकाला ओळखतात तिथे लोक एक संधी सोडत नाही अस्या पळून गेलेल्या परीवारचा अपमान करण्याची .मग तिचा भाऊ असो कि वडील." तू बोलूच नको रे ,तुला तुझी मुलगी सांभाळता आली नाही .किवा तुझी बाहिणीने बघ काय दिवे लावले माहिती आहे ." असे ऐकायला
लागते .मुलगी जाते तिच्या वाटेने .पण अगदी मरणाहून मेल्या सारखे जीवन
जगायला लागते परिवाराला ................
"हे मात्र एवढे प्रभावी नाही दाखवले असे वाटले कुठे तरी" ............
सैराट मधून अजून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आपली मुलगी आपला मुलगा काय करतो याची आईवडील कुठे दखल घेतानी दिसत नाही .एकदाम ते प्रेमात पडतात .पकडले जातात मग मुलीचे सरळ लग्न ठरवणे सुरु होते.यातून एक बोध नक्की घ्यावा मुली कुठे जातात काय करतात त्यांचे मित्र कोण  हे नेहमी आईवडिलांना माहिती असावे नाही का?
प्रेम कोणाला कुठे कधी होते हे जरी खरे असले तरी ..............त्यातील धोके ओळखून पुढे जायचे का नाही याचा विचार नक्की करावा .नाही का ? किवामुलांना समजून द्यावे त्यांच्या साठी काय योग्य काय अयोग्...........
असेच मनातले काही{मी काही कोणी समीक्षक नाही जे मनात आले ते लिहिले }

पोहे

पोहे
कोणता पदार्थ करणे आणि तो करता येणे या वेगळ्या गोष्टी आहे असे मला वाटते. पदार्थ करणे जेव्हा फक्त करायचा म्हणून केला जातो तेव्हा त्याला चव असेलच असे नाही.करणे म्हणजे तो छान झाला पाहिजे म्हणून मनापासून करणे.
आज एक पोह्याची पोस्ट पहिली आणि मला जुने काही आठवले.


एप्रिल मे लग्नाचे महिने आणि लग्न जुळण्याचे महिने.मग मुलीला बघयला येणार असेल तर कांदे पोहे केलेच पाहिजे हा नियमच.पण खेड्यात अनेकदा भाजीपाला हा फक्त बाजाराच्या दिवसी मिळत असे,म्हणजे हिरवी मिरची ,कोथांबीर फक्त
बाजाराच्या दिवसी मिळे.आमच्या गावात मंगळवारी बाजार असे .म्हणजे त्यादिवसी घेतलेला भाजीपाला आठ दिवस वापरायचा .पण जर कोणी पाहुणे रविवारी किवा सोमवारी आले तर मग खूप पंचाईत होत असे.पोहे करायचे तर हिरवी मिरची एक तर सुकून जात असे नाही तर लाल होवून जायची .कोथांबीर तर कधीच मरून गेलेली असे .{अर्थात सुकवून ठेवेल असे}
मला माझी सासू आणि घरातील अचानक बघायला आले .तेव्हा गावात फक्त चिवडा करतो तसे पातळ पोहे मिळत असे.ते भिजवताने खूप काळजी घायलालागे नाही तर सरळ गोळा बनत असे.आमच्या सासू बाई आल्या आणि सरळ स्वयपाक घरात येवून बसल्या .असा कोणापुढे कधी स्वयपाक केला नव्हता .त्यामुळे माझी गडबड झाली.आणि पोहे भिजवताना पोहेंचा गोळा झाला . पटकन ते बाजूला ठेवून दुसरे पोहे भिजवले . आणि बघितले तर हिरवी मिरची नाही आता काय करा
मनात आले." मुलीला बघायला आले कि पोहे करा " हे कोणी शोधले काय माहिती.
मिरच्या लाल झालेल्या होत्या आणि त्या पण सुकल्या होत्या.नाविलाज होता त्याच टाकल्या. पोहे केले छान झाले असे वासावरून तरी वाटत होते .आणि अचानक आठवले मीठ राहिले.आता काय करा,कारण आमच्या कडे खडे मीठ वापरत .तेच बारीक करून टाकले जायचे.आता पोहे तर करून झाले.आता मीठ त्यात मिक्स पण होणार नाही .सासू बाई मागे बसल्या आहे .सरळ त्यांच्या कडे पाठ केली आणि मीठ वाटून त्यात थोडे पाणी टाकून ते पोहेत टाकले.
"इज्जत का सवाल होता "खूप वेळ हलवून नंतर त्यावर झाकण ठेवले.तेवढ्यात छोटा भाऊ स्वयपाक घरात आला .त्याला खुणेने चव घेवून बघ म्हणून सांगितले.त्याने दिसणार नाही असे थोडे पोहे घेतले आणि बाहेर गेला.परत आला आणि खुणेने सांगितले ठीक आहे.लाल मिरची त्यात सुकलेली कोथांबीर पोहे भारीच दिसत होते.तेव्हा खोबरे आणि शेव बीव घालण्याची काही पद्धत नव्हती .
एकदाचो आम्ही ती परीक्षा पास झालो .पण लग्न झाल्यावर आमच्या सासू बाई बोलल्या " तू काय काय केले ते बघितले होते ",पदार्थ येण्यापेक्षा बिघडत असतानातो सावरून घेणे जमले पाहिजे .सासू बाई खूप सुगरण होत्या.तू छान स्वयपाक करते हे त्या कधीच बोलल्या नाही .मी कधी जास्त विचार केला नाही.छान असे नाही पण ठीक करते मी स्वयपाक .......
असेच एक पोस्ट वरून आज पोहे आठवले.
फोटो-गुगल सर्च

चित्रपटा आणि समाज

कोणाकोणाला करिस्मा कपूरचा प्रेम कैदी आठवतो .१९९१ कि ९२ मध्ये आला होता.एक प्रेम कथा होता तो पण जवळजवळ २५ वर्षा पूर्वी अश्या कमी वयात येणार्या प्रेमकथा तेव्हा चालत होत्या .आणि  आज अनेकांना सैराट मुळे मुले बिघडतील असे वाटते.त्यावेळची आमची पिढी नाही बिघडली हि नाही बिघडणार.

मी अजून चित्रपट बघितला नाही पण एक वय असतेत्या वयात सावरायचे असते.
आणि सावरणारे असतात आई वडील ...आईवडिलांना बरोबर जर मुलांचा सवांद असेल तर काही होत नाही .आठवा आपल्या कॉलेजचा जमाना ......त्याकाळात मुली मुला बरोबर बोलायचे देखील नाही .तरी कुठे तरी बोलावे वाटायचे ना ?घराबाहेर उभे राहायचे नाही .रस्त्याने चालाताने खाली मान घालून चालायचे.चुकून कधी कोण्या मुलाबरोबर बोललो तर घरातून खूप मोठी चूक केली .असे बोलणे बसत .पण तेव्हा वाटायचे ना ? काय होते बोललो तर ? पण आई वडिलांना उलट उत्तर न करण्याचा तो जमाना होता.पण मनात रागतर यायचा ना? हे असे का वागतात ? खरे तर दोन पिढी मधील अंतर म्हणून आईला समजून सांगता येत नसे ,मग त्यांचे सांगणे म्हणजे रागावणे असे.पण का रागवतातअसा प्रश्न पडायचा ना ? त्या वयाचा तो दोष होता .एक सोळा ते अठरा असे काही वर्ष सरली कि स्वतालाच काय वाईट काय चांगले याची जाणीव होते..
.
आज आपण शिकलेले समजदार पालक आहोत .आपण आपल्याला त्या वयात
काय वाटत होते यावरून ,आपण मुलाबरोबर जे वागतो त्याबद्दल त्यांना काय वाटते किवा काय वाटेल ते समजू शकतो .जास्त विरोध करणे म्हणजे .अजून एखादी गोष्ट करून बघण्याची उर्मी वाढणे.आज मुले मोठे झाल्यावर नाही तर
ती लहान असतानी त्यांना समजून घेतले तर मुला समोर काही आले तरी ते आधी
तुमच्या जवळ येवून बोलतील ..
मुलांचे पालक राहून मित्र बना ,वेळ पडली तर पालक म्हणून शिस्त हवी .आणि
समजून घेतानी काय चूक हे पटवून देतानी एक मित्र ......
खूप पोस्ट बघून असेच मनातले काही