Friday, 4 September 2015

गोकुळ अष्टमी

श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना कंसाच्या बंदिशाळेत,गोकुळात झाला म्हणून या दिवसाला गोकुळाष्टमी म्हणतात. संपूर्ण भारतात सर्व ठिकाणी अतिशय उत्साहात हा जन्मदिवस साजरा करतात. या दिवशी विविध खाद्यपदार्थ दही, दूध, लोणी एकत्र करून कालाविणे म्हणजेच “काला” होय. यालाच दहीकाला असे म्हणतात. या दिवशी दहीकाला करून खाण्याचा प्रघात आहे. श्रीकृष्णाचा हा आवडता खाद्यपदार्थ होता.
अष्टमीचा दुसरा दिवस गोपाळ काला असतो.या दिवशी दही हंडी फोडली जाते.पण हा सन साजरा करातांनी खरच त्यात श्रधा असते का ? असा प्रश्न आजचे उत्सव साजरे करतांनी मनात आल्या वाचून राहत नाही.
आज आपण इंटरनेटच्या जमान्यात जगत आहे असे बोलतो.पण सण का साजरे केले जात होते त्याचा हेतू काय होता हे समजून घेत नाही.
पूर्वीच्या काळी मनोरंजनाच्या साधने नव्हते.लोकांनी एकत्र यावे काही वेळ एकत्र
घालवावा .या हेतूने अनेक सन साजरे केले जात .श्रावण मध्ये सगळीकडे हिरवेगार झालेले असते .शेतातील बहुतेक कामे संपलेली असत .अश्या वेळी पोथी पुरण .भागवत सप्ताह चालू असत .पण आज काय होते.आज तर मनोरंजनाचे अनेक साधने असतानी सुद्धा आपण हे सन साजरे करातांनी काय करतो .उंच उंच दही हंड्या बांधल्या जातात.त्या फोडण्यासाठी मग अनेक गोविंदा पथके तयार होतात .लाखोच्या दही हंड्या फोडण्यासाठी आणि बक्षिसा साठी मग हे गोविंदा आपल्या जीवाची पर्वा करत नाही.
अनेक जण जखमी होतात.काही तर कायमचे अपंग होतात.त्यांच्या घराचे मग अश्या मुला कडे रडत बघत आयुष्य घालवतात.
आज सगळीकडे दुष्काळ पडला आहे अनेकांना एक हंडा पाणी मिळावे म्हणून किती पायपीट करायला लागते.आज अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे .
आणि असे उत्सव साजरे करून किती खर्च केले जातात.किती पाणी वाया घालवले जाते.अनेकदा अश्या उत्सवा मुळे अनेक रस्ते बंद होवून जातात .जोरजोरात डीजे लावले जातात .कधी आजारी माणसे असेल तर त्यांना किती त्रास होतो. पण कोणी काही बोलू शकत नाही जर बोलणार तर त्यांना धार्मिक भावना दुखावल्या जातात .पण विचार केला तर सन हे सन म्हणून फक्त साजरे केले तर ? कोणाला त्रास न होता ? असे होवू शकते ना ?

फोटो -गुगल सर्च 

No comments :

Post a Comment