भाकरीची गोष्ट ......
खूप भूक लागली कि पटकन ताटात भाजी भाकर घ्यायची आणि खावून टाकायची .पण कधी आपण विचार केला का एक भाकर ताटात येई पर्यंत कशी आणि कुठून येते .अर्थात त्याची गरज वाटत नाही ,ना ?
शाळेत असतानी भाकरीची गोष्ट . नावाचा धडा होता नक्की आठवत नाही पण आनंद यादव याचा असावा .आमच्या कडे जास्त करून खाल्ली जाते ती बाजरी ,कमी पाऊस असल्या मुळे जिरायती पिक म्हणून बाजरी जास्त होते.
जून मध्ये पाऊस पडला कि शेतात ढेकळे फोडण्यासाठी वखर हाकला जातो शेत सपाट केले जाते..पाऊस पडला का सुरवात होते पेरणीस,ज्याला पाभर म्हणतात .त्यातून पेरणी केली जाते.पाभर मधून टाकलेले बी झाकले जावे म्हणून त्या मागे राहाक्या असतो .त्याने बी झाकले जाते . .बाजरी बरोबर मठ ,मुग ,आणि कुळीद पण टाकले जातात.कोणाला जास्त माहिती नसलेला वरी {भगर } सारखा दिसणारे एक धान्य असते ज्याला राळे म्हणतात .{आज कोणाला माहिती नसेल }हे पण पेरले जाते.आणि न पेरता बाजरी बरोबर येणारे आणि पिकाला त्रासदायक असे एक गवत देखील येते ते म्हणजे कोंबडा गवत.ज्या मुळे सगळे शेत पांढरे दिसते .
बाजरीची पेरणी झाली कि होते ती निदांनी .शेत जर मोठे असेल तर हे शक्य नसते .बाजरी पिक थोडे मोठे झाले कि कोळपणी केली जाते ज्या मुळे पिकतील गवत काढले जाते.यानंतर बाजरी जर चांगला पाऊस झाला तर जोमाने वाढते .बाजरीला फुलारा आला कि पाऊस पडला तर कधी कधी बाजारीवर रोग पडतो .ज्याला आरगड बोलतात .ज्या मुळे बाजरी काळी पडते .या सगळ्यातून जर पिक चांगले आले कि त्याची मग बाजरीची सोगणी केली जाते .सोगणी करायची त्याच्या पेंढ्या बांधायच्या त्याचे वघे घालायचे .ते सगळे एक ठिकाणी जमा करायचे .त्याची शेतात सुडी करायची .सोगणी करातांनी जर पाउस आला तर त्या पेंढ्या ओल्या मातीती राहून त्याला उदाई लागू नाही ओल्या पेंढ्या लवकर सुखाव्या म्हणून त्या उभ्या करून ठेवायला लागतात ज्याला कोचळे म्हणतात .त्यानंतर सुरवात होते खळे करण्यास ,शेतातील पिक खळ्यात आणले जाते .त्या आधी जमीन गोल आकारा मध्ये सारवली जाते.त्याला खळे म्हणतात .शेतातील बाजरी खळ्यावर आणून परत त्याची खळ्यावर सुडी केली जाते .जेव्हा वेळ असतो पाऊस नसतो तेव्हा त्यांची मोडणी केली जाते म्हणजे कणसे खुडणे .यानंतर आज आधुनिक पद्धतीने मशीन मध्ये धान्य काढले जाते .
पण पूर्वीच्या काळी मात्र मळणी केली जात असे .मग असे खळे महिना महिना चालत असे .यानंतर तयार होते बाजरी ,ती दळून आणणे मग पीठाची भाकरी बनवणे .या सगळ्या सोपस्कारा नंतर भाकरी तयार होते .
या सगळ्या कष्टाची जाणीव होती म्हणून पूर्वीचे लोक मूठ भर धान्य जरी सांडले तर एक एक दाणा जमा करत. पण आज असे करत नाही मुळात ताटात येणारी भाकरी असो कि चपाती ती कशी येते याची जाणीव कुठे असते .
एक फ्रेंड च्या कालच्या पोस्ट वरून हे सगळे आठवले म्हणून लिहिले.
फोटो -गुगल सर्च
खूप भूक लागली कि पटकन ताटात भाजी भाकर घ्यायची आणि खावून टाकायची .पण कधी आपण विचार केला का एक भाकर ताटात येई पर्यंत कशी आणि कुठून येते .अर्थात त्याची गरज वाटत नाही ,ना ?
शाळेत असतानी भाकरीची गोष्ट . नावाचा धडा होता नक्की आठवत नाही पण आनंद यादव याचा असावा .आमच्या कडे जास्त करून खाल्ली जाते ती बाजरी ,कमी पाऊस असल्या मुळे जिरायती पिक म्हणून बाजरी जास्त होते.
जून मध्ये पाऊस पडला कि शेतात ढेकळे फोडण्यासाठी वखर हाकला जातो शेत सपाट केले जाते..पाऊस पडला का सुरवात होते पेरणीस,ज्याला पाभर म्हणतात .त्यातून पेरणी केली जाते.पाभर मधून टाकलेले बी झाकले जावे म्हणून त्या मागे राहाक्या असतो .त्याने बी झाकले जाते . .बाजरी बरोबर मठ ,मुग ,आणि कुळीद पण टाकले जातात.कोणाला जास्त माहिती नसलेला वरी {भगर } सारखा दिसणारे एक धान्य असते ज्याला राळे म्हणतात .{आज कोणाला माहिती नसेल }हे पण पेरले जाते.आणि न पेरता बाजरी बरोबर येणारे आणि पिकाला त्रासदायक असे एक गवत देखील येते ते म्हणजे कोंबडा गवत.ज्या मुळे सगळे शेत पांढरे दिसते .
बाजरीची पेरणी झाली कि होते ती निदांनी .शेत जर मोठे असेल तर हे शक्य नसते .बाजरी पिक थोडे मोठे झाले कि कोळपणी केली जाते ज्या मुळे पिकतील गवत काढले जाते.यानंतर बाजरी जर चांगला पाऊस झाला तर जोमाने वाढते .बाजरीला फुलारा आला कि पाऊस पडला तर कधी कधी बाजारीवर रोग पडतो .ज्याला आरगड बोलतात .ज्या मुळे बाजरी काळी पडते .या सगळ्यातून जर पिक चांगले आले कि त्याची मग बाजरीची सोगणी केली जाते .सोगणी करायची त्याच्या पेंढ्या बांधायच्या त्याचे वघे घालायचे .ते सगळे एक ठिकाणी जमा करायचे .त्याची शेतात सुडी करायची .सोगणी करातांनी जर पाउस आला तर त्या पेंढ्या ओल्या मातीती राहून त्याला उदाई लागू नाही ओल्या पेंढ्या लवकर सुखाव्या म्हणून त्या उभ्या करून ठेवायला लागतात ज्याला कोचळे म्हणतात .त्यानंतर सुरवात होते खळे करण्यास ,शेतातील पिक खळ्यात आणले जाते .त्या आधी जमीन गोल आकारा मध्ये सारवली जाते.त्याला खळे म्हणतात .शेतातील बाजरी खळ्यावर आणून परत त्याची खळ्यावर सुडी केली जाते .जेव्हा वेळ असतो पाऊस नसतो तेव्हा त्यांची मोडणी केली जाते म्हणजे कणसे खुडणे .यानंतर आज आधुनिक पद्धतीने मशीन मध्ये धान्य काढले जाते .
पण पूर्वीच्या काळी मात्र मळणी केली जात असे .मग असे खळे महिना महिना चालत असे .यानंतर तयार होते बाजरी ,ती दळून आणणे मग पीठाची भाकरी बनवणे .या सगळ्या सोपस्कारा नंतर भाकरी तयार होते .
या सगळ्या कष्टाची जाणीव होती म्हणून पूर्वीचे लोक मूठ भर धान्य जरी सांडले तर एक एक दाणा जमा करत. पण आज असे करत नाही मुळात ताटात येणारी भाकरी असो कि चपाती ती कशी येते याची जाणीव कुठे असते .
एक फ्रेंड च्या कालच्या पोस्ट वरून हे सगळे आठवले म्हणून लिहिले.
फोटो -गुगल सर्च



No comments :
Post a Comment