Friday, 26 December 2014

कधी थांबणार हे ????????

कधी थांबणार हे ????????
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, कोकणात अवकाळी पाऊस
बळीराजाला पुन्हा अस्मानी तडाखा
आधीच शेतकरी आत्महत्या करत आहे .त्यात निसर्गाने त्यांची अजून परीक्षा 
बघण्याची ठरवली आहे .काल उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील बळीराजाला पावसाने 
जबरदस्त तडाखा दिला आहे .आज शेतकर्याची हलत खूप वाईट आहे .
कधी कधी पीक असून भाव नाही तर कधी पीक हाताशी येऊन पाउस होतेचे नव्हते
करत आहे .पीक छान आले आता उद्याचे स्वप्न बघणारे आज धाय मोकलून रडायची
वेळ आली आहे .
या महिन्यात विदर्भातील दोन शेतकऱ्यांनी अतिशय काळजाचा थरकाप होईल अशा पद्धतीनी आत्महत्या केल्या .
एका तरुण शेतकरी आत्महत्या साठी आपल्या शेतातील मोटारपंपाची विजेची तार काढून त्याने अंगाभोवती गुंडाळली आणि स्वत:च्या हाताने बोर्डावरील बटण दाबले! हाय व्होल्ट वीज प्रवाहा क्षणात तो भाजला गेला आणि काही वेळातच गतप्राण झाला.
तर एक शेतकर्याने कदाचित आपण गेल्यावर आपल्या अंत्यसंस्कारचा पण आपल्या कुटुंबांला खर्च नको म्हणून स्वतच शेताच्या एका कोपर्‍यात लाकडांचे सरण रचले, ते पेटविले आणि स्वत:ला त्यात उडी मारली . काही वेळात त्याचा देह जळून खाक झाला .
खरच का करत आहे आज बळीराजा असे .
कारण रोज बळीराजा आत्महत्या करत आहे आणि त्याचा कोणाला फरक पडत नाही .
मग सरकारांनी आता तरी दाखल घ्यावी असे असेल का ?
असे आत्महत्या होत आहे .कालच्या पावसामुळे कांदा, डाळिंब, द्राक्ष
पिकांची अक्षरश: माती झाली आहे .या शेतकऱ्यांना सरकार त्यांनी पण असे काही
पाऊल उचलण्या आधी मदत करेल का ?

No comments :

Post a Comment