Friday, 26 December 2014

एक अधुरी कहाणी

कथा -५
एक अधुरी कहाणी

सुधा उंच गोरी दिसायला अतिशय छान .खूप बोलकी आईची अतिशय लाडकी
अभ्यासात जशी हुशार तशीच कामात पण तरबेज , वडील शिक्षक त्यामुळे नेहमी होणार्या बदल्या .नवीन शाळा नवीन मैत्रिणी ,नवीन लोक आता अशाच एक गावात सुधाच्या वडिलांची बदली झाली होती ,गाव तसे खूप छान होते . घर भेटले ते पण छान ठिकाणी समोर मंदिर ... घराची मालकीण राधा बाई अतिशय चांगल्या होत्या .भरपूर जमीन ,मोठे घर याचा त्यांना अजिबात गर्व नव्हता .राधाबाईचा मुलगा बाहेर गावी शिकायला होता . कोणाला आवडणारी सुधा राधा बाईना खूप आवडली . नवीन गावात राधा चांगलीच रुळली होती . एक दिवस अचानक राधाबाई चक्कर येऊन पडल्या ,त्यांना हॉस्पिटल मध्ये ठेवले . त्याच्या पोटात ट्यूमर असल्या मुळे ऑपरेशन करावे लागले . या काळात त्याची स्वताच्या मुली सारखी काळजी घेतेली सुधा ने , परीक्षा असल्या मुळे त्यांच्या मुलाला काही कळू दिले नाही . अचानक सकाळी सकाळी राधाबाईचा मुलगा विनय आला .तेव्हा सुधा त्यांना चहा देत होती .त्याने सुधाला बगीतले आणि त्याला ती खूप आवडली . रोज घरी येणारी सुधा बरोबर आता विनय बरोबर बोलयची .तो खूप हुशार होता तो बोलताने ती ऐकत बसायची . त्याची मैत्री आणि सुधाचे वागणे बघून राधाबाईने तिनी सून करून घेण्याचे ठरवले . पण मुलाला नोकरी लागली का मग . असेच दिवस जात होते ,विन्य आणि सुधाची मैत्री आता प्रेमात रुपातरीत झाली होती . घरापासून जवळ असलेल्या नदीवर ते तासनतास जाऊन बसत ,सुखी संसाराचे स्वप्न रंगवत नदीमधील खोल डोहा कडे बघत .तो त्याला खूप आवडायचा . विनय आय पी यस मधील लेखी परीक्षा पास झाला होता आता मेडिकल आणि मुलखात बाकी होत्या .आपण नक्की पास होणार यावर त्याचा पूर्ण विस्वास होता .मेडिकल टेस्ट साठी विनयला शहरात जावे लागले . चार पाच दिवसानी येणारा विनय महिना झाला तरी परत आला नव्हता . ती त्याला रोज फोन करत असे पण तो मात्र मी बिझी आहेम्ह्णून तिचे फोन घेत नसे . आता त्यांनी तिला मेसेज करणे पण बंद केले . राधाला काही समजत नव्हते विनयला काय झाले .हसरी ,बोलकी राधा आता अबोल झाली होती . तिची हि अवस्था तिचा आई बाबांना आणि राधा बाईना पण बघवत नव्हती . विनय परत आला .पण आता तो राधाशी बोलत देखील नव्हता . काय झाले हे सागत पण नव्हता . एक दिवस सुधाच्या बाबांनी बदली मागवून घेतेली .आता ते गाव सोडून जाणार होते . सुधा मनात खूप रडत होती .विनय काय चुकले रे माझे सांग तरी मला ,बोल माझाशी एकदा तरी बोल ..तिची उदाशी त्याचा पर्यंत जाताच नव्हती , आज सुधा हे गाव सोडून जाणार होती ,सामान बाधून झाले .ती राधाबाईना भेटायला गेली . त्यांना नमस्कार केला . राधाबाई रडत होत्या आणि सुधा देखील तिची नजर विनयला शोधात होती . "माझा समोर एकदा तरी ये रे मला तुला डोळे भरून बघू तरी दे " पण तो कुठे नव्हता . या गोष्टीला आता १० वर्ष झाले .विनया आता शिक्षण अधिकारी झाली आहे . तिनी लग्न केले नाही आज ती विनयच्या गावात शाळा तपासायला आली आहे . बस मधून उतरली आणि तिला जाणवले गाव खूप बदलले आहे , शाळेतील काम आटोपले आणि सुधाच्या नकळत तिचे पावले विनयच्या घरा कडे वळाले तिला वाटले आता तिथे नवीन बंगला असणार . पण ते घर होते तसेच होते .रंग नसलेले उदास वाटत होते . विनय आता गावी येत नसावा असे तिला वाटले . घरा समोर राधा बाई बसल्या होत्या आता त्या खूप वयस्कर वाटत होत्या . त्यांनी सुधाला लगेच ओळखले . सुधा त्याच्या पाया पडली .कोणी विनयचा विषय काढला नाही . चहा झाला सुधा बोलली मी नदीवर जाऊन येते . राधाबाई तिला थांब बोलल्या त्या आता गेल्या एक कागद घेऊन आल्या तो सुधाच्या हातात दिला आणि बोलल्या हे विनय ने तुझा साठी दिले आहे ,वाच . ती काही न बोलता नदीवर गेली .तिनी तो पेपर उघडला . आणि वाचायला सुरवात केली . प्रिय सुधा ... तू खूप रागावली असणार माझ्यावर माहित होते मला पण तू पुन्हा कधीना कधी येशील हे माहित होते मला , म्हणून हे पत्र तुझ्यासाठी , खूप प्रेम होते ग माझे तुझावर . पण ते नियतीला मान्य नव्हते .मी मेडिकल साठी गेलो तेव्हा समजले . मला ब्लड कॅन्सर झाला आहे .मी जास्त दिवस नाही जगू शकणार . आणि माझ्या शिवय तू माहित होते मला .पण मी तर या जगातून जाणारच आहे तर तुला दुखी नव्हते करायचे मला . म्हणून मी तुला धोका दिला असे दाखवले मला माहित होते तू ते सहन नाही करू शकणार पण माझ्या मरणाच्या दुखा पेक्षा ते बरे होते . सुधा तू गाव सोडून गेली .तू जेव्हा गेली तेव्हा मी तुला बघत होतो ग पण मी समोर असलो तर तुला खूप वाईट वाटेल म्हणून मी झाडाच्या मागे उभा राहून तुला बघत होतो .खूप रडायला येत होते डोळे भरून येत होते आणि बघता बघता तू दिसेनाशी झाली . तू गेली मला काही सुचतच नव्हते ग रोज या नदीवर येऊन बसायचो .सुधा मला माफ कर . सुधाच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या . अजून एक पेपर होता तो तिनी उघडला . प्रिय आईं बाबा . मी तर आता काही दिवसाचा सोबतो आहे मला माहित आहे पण तो पर्यंत मी कसा जगू मला सुधा शिवय जगणे मुश्कील आहे म्हणून मी नदी मधील डोहात आत्महत्या करत आहे .एक दिवस सुधा नक्की येईन मी तिचा साठी एक पत्र लिहिले आहे ते तिला द्या . म्हणजे विनयने मला धोका नव्हता दिला .तो फक्त माझा होता . काही वेळाने डुबुक आवाज आला . विनय तुझी सुधा पण तुझा कडे येत आहे हा आवाज .आला . काही वेळाने डुबुक आवाज आला . सगळे शांत झाले होते .पाण्यावर तरंग तेवढे दिसत होते .
११/१/२०१४

No comments :

Post a Comment