Sunday, 24 May 2015

असे काही

वेश्या हा शब्द जरी उच्चारला तरी त्यांच्या बद्दल बोलणे टाळले जाते.
त्यांच्या बरोबर बोलणे खूपच दूर ........
मी जिथे राहते तेथून फक्त १० मिनिटाच्या अंतरावर मुंबई मधील बदनाम 
समजला जाणारा रेडलाईट एरिया,कामाठीपुरा आहे .
खूप फरक आहे काही अंतरावर असून सुद्धा,येथे १५ गल्ल्या आहेत.
पण फक्त काही गल्य्या अश्या आहेत जिथे हे काम चालते.
बाकी सगळ्या गल्य्यात आता आपल्या सारखे लोकच राहतात.
बाजूला फोरस रोड तिकडे मात्र याचे प्रमाण जास्त आहे.कधी तरी 
छोट्या छोट्या गल्य्या अगदी जुन्या काळातील चाळी आहे इकडे .
कधी तरी बसने त्या बाजूने जाण्याचा योग आला तर,मग ती कोणती वेळ असो 
तिकडे दिसणारे एक दृश्य म्हणजे या बायका बाहेर उभ्या दिसतात .
स्वताला आपण सभ्य समजणारे जेव्हा येथून जातो तेव्हा कुठे तरी वाईट 
वाटते.कोणी आपल्या कडे बघते हे बघून आपल्याला किती राग येतो .
स्वाभाविक पणे साडी असेल तर पदर सावरला जातो.ड्रेस असेल तर दुपट्टा 
सावरला जातो .पण येथे जे दिसते ते किती अलग असते.कोणी तरी आपल्या 
कडे बघावे म्हणून कमी कपडे पदर टाकून बसणे.हे बघून मनात येते .
एक स्री ते वेश्या किती अंतर आहे ना.
एकीला स्री म्हणून लज्जा मार्यदा तर तीच जेव्हा वेश्या होते तेव्हा लज्जा मार्यदा 
कुठे तरी गुडाळून ठेवायला लागते मग ती स्वखुशी असो कि मजबुरी .
नेहमी दिसणाऱ्या या बायका बोलण्याचा कधी प्रसंग आला नाही.
पण कोणत्या चित्रपटात दिसतो तसा हा मला कधी रेडलाईट एरिया दिसला नाही.
संध्याकाळी ६ पासून मात्र येथून अनेक मुली बाहेर जातात हे मात्र खरे.
आणि ज्या आता वय झाले त्या रस्त्यावर दिसतात .
कधी न एरियाची भीती वाटली ना कधी राग आला .
ना कधी या बायका बरोबर बोलावे वाटले.
कधी तरी ग्रांटरोड किवा मुंबई सेन्ट्रल च्या नाक्यावर या बायका येऊन 
उभ्या राहतात तेव्हा कधी तरी एरियातील महिला मुलीना त्रास होतो .
मग पोलिस त्यांना तिकडे थांबू देत नाही.
त्या उघड उघड धंदा करतात म्हणून त्यांच्या कडे चांगल्या नजरेने 
बघितले जात नाही. पण कधी तरी पेपर मध्ये वाचून समजते .
कोण कोणत्या प्रकारे हे काम करतात.पण त्याला एक नाव असते..
ते म्हणजे हाय प्रोफाईल ,{कॉल गर्ल }
काही असो स्वखुशी असो नाही तर मजबुरी ,किवा फसवून असो.
पण एक स्री म्हणून त्यांच्या जीवना बद्दल वाईट वाटते हे मात्र खरे .........

Saturday, 23 May 2015

बायको माहेरी जाते तेव्हा

फेसबुक वर आपण काही पोस्ट बघतो ,
त्यामुळे अनेक लोक गावी जातात त्यात जास्त करून बायका आणि मुले 
असतात .ते गावी गेले म्हणून पुरुष म्हणजे नवरे लोक खूप खुश होतात .
त्यांना खूप आनंद होतो अशा एक सूर दिसतो .
का बरे असे ? का असे वाटते ?
अनेक करणे असतात त्या मागे ,पण सगळ्यात महत्वाचे एक कारण असते ते

 म्हणजे कधी तरी एकटे राहावे वाटते .अगदी उठल्या पासून कोणी काही बोलू नाही .
कोणती वस्तू कुठे टाकून दिली तरी उदा .टॉवेल .सकाळी उठावे मस्त पेपर वाचत बसावा ,
चल उशीर होतो लवकर अंघोळ करा म्हणून मागे भुणभुण नाही .{पण बायको का भुणभुण
 करते याचा कधी विचार केला आहे का ?}
नावडती भाजी डब्यात घेऊन जायला नको .घरी कधी आले तरी टेन्सन नाही ,

मित्रांना फोन करावे मस्त पार्ट्य करावी हवे ते खावे कधी घरी यावे .असे वाटते
पण खरच हा आनंद किती दिवस टिकतो मनाला विचारा ....
काही दिवस ठीक वाटते नन्तर काय ....
घरातील मुलांची आठवण येते ,खाली घर मग खायला उठते ,
कामावरून आले कि रिकामे घर खायला उठते .
बाहेरचे खाऊन कंटाळा येतो .
मग आझादी नको वाटते.परत कोणी तरी आपल्यला सांगावे ,हट्ट करावा,
मुलांनी घरात गोंधळ घालावा.असे वाटते ना .
{मग बायको परत कधी येणार याची वाट बघायला सुरवात होते }
असेच मनातील काही

नवरा गावी जातो तेव्हा

मी मागे एक पोस्ट टाकली होती बायको माहेरी जाते तेव्हा ......
आता त्यावर एक कॉम्मेंत होती नवरे जर बाहेर गेले तर बायकांना काय वाटते.
नवरा गावी गेला किवा बाहेर गेला तर बायकांना जास्त काही फरक जाणवत नाही.
कारण बायकांच्या कोणत्या कामात काही बदल होत नाही.जरी त्या एकट्या असल्या तरी 
रोज जी कामे असतात ती करायला लागतातच.कारण नेहमी प्रमाणे मुलांच्या
शाळा किवा कोणते ना कोणते क्लास असतात.ते बघायला लागतेच.
हो एक फरक नक्की पडतो घरात नवरा असतो तेव्हा सगळा स्वयपाक बनवला 
जातो पण नवरा नसेल तर काही तरी {खिचडी भात }असे बनवले जाते.
नवरा गेला तरी त्याला सूचना देणे हे एक काम चालू असते.
सांभाळून जा बाहेरचे जपून खा असेच काहीना काही .
पण अनेकदा वाटते बायकांना आपला पण असा एखादा दिवस असावा.
जो फक्त माझा असावा,सकाळी उठल्या म्हणजे स्वताला वाटले तेव्हा उठावे.
स्वताला हवा तसा चहा करावा,आवडतो तो नाष्टा करावा.मुलांच्या आणि नवऱ्याच्या 
आवडी सांभाळता सांभाळता स्वताच्या आवडीची विसरून गेलेली एखादी 

भाजी करून खावी.टीव्ही वर हवा तो चित्रपट बघावा.मग तो किती का जुना असो .
आवडीचे गाणे ऐकावे.हातात कोणते सामान न घेता बाहेर फिरावे.
आपल्या आवडत्या ठिकाणी मग ते गार्डन असो किवा चौपाटी तिथे जाऊन शांत 
बसावे.
माझ्या शेजारी एक बाई राहते लग्नाला १६ वर्ष झाले.माहेरी एकत्र परिवार, सासरी सासू 
सासरे दोन मुले आणि छोटे घर,मागे पिकनिक गेली घरातील सगळे गेले ती नाही गेली.
तिला विचारले का नाही गेली.
तिचे उत्तर होते आज मला एकटे राहायचे आहे,शांत पणे आणि आज तो मला भेटला आहे .

हे होते जास्त करून मुंबईत घर सोडून कुठे जागा नसते.
असा प्रोब्लेम गावाकडे सहसा येत नाही,मोठे घरे असतात.अंगण असते.
किती काही असले तरी बायकांना प्रिय असते आपले घर.
काही वेळा साठी माझा एक दिवस असावा असे वाटले तरी माझी मुले माझे घर 
यापासून जास्त दूर त्या राहू शकत नाही हे पण खरे आहे.