Friday, 26 December 2014

समाधान

कथा -६ 
समाधान आज दिवाळी काही करून त्याला घरी पोहाचायचे होते
एका महत्वच्या कामा साठी तो एका हॉस्पीटला भेट देण्यास  गेला होता .ते गाव  शहरा पासून दूर होते। त्याच्या  साठी  एकदम अनोळखी असे. कार्यक्रमास  उशीर  झाला  त्यामुळे 
निघायला उशीर झाला होता .दिवाळी असल्या मुळे ड्राईव्हर सुट्टीवर 
होता .त्या मुळे तो स्व:ताच गाडी चालवत होता .रस्त्याच्या आजूबाजूला 
छोटी छोटी गावे दिसत होती .कुठे लाईट होती कुठे नव्हती .रस्त्यावर
वाहनाची ये जा देखील नव्हती . त्यात थंडीचे दिवस  आणि  अमाव्स्याची  रात्र त्यामुळे  सगळी  कडे  लवकर अंधार  पसरला  होता ,जेवढा स्पीडने चालवता येईन तेवढ्या
स्पीड ने तो गाडी चालवत होता .
आणि अचानक गाडी थांबली .काय झाले त्याने खाली उतरून
बघितले पण काही समजत नव्हते .रस्त्यावर कोणी नव्हते .
त्याने आजूबाजूला बघितले .दूरवर एक घर दिसले .
इकडे काही मदत भेटेल या विचाराने तो घर कडे चालू लागला .
लाईट नव्हती जसजसा तो घर जवळ गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले .
घर समोर मोठे अंगण होते .ते शेणाने सरावले होते .सगळी कडे
खूप  समोर खूप  पणत्या लावल्या होत्या .
घरच्या दरवाज्याच्या बाजूला छोटे छोटे खाती [कोनाडे ]होती त्यात पणत्या ठेवल्या
होत्या त्याचा प्रकश सगळी कडे पसरला होता . सगळीकडे असणाऱ्या  त्या  अंधारात  त्यांचा उजेड छान  वाटत  होता।  घरा  पु ढे रंग न भरलेली सुंदर रांगोळी काढलेली होती .
घरात कदाचित पुरण पोळी बनवली जात असावी तिचा वास येत होता .
काही वेळ तो विसरून गेला आपण कुठे आहे .
अचानक कुत्र्याच्या भूकण्या मुळे तो भानावर आला .
घरातून एक माणूस बाहेर आला .त्याला तो  बोलला माझी गाडी खराब झाली आहे म्हणून मी आलो .काही मदत भेटेल का जवळ  ग्यारेज  आहे का ?
तो माणूस बोलला नाही जवळ नाही येथून  दहा पंधरा  किमी वर आहे .
पण आता तिकडे कसे जाणार आणि आज तर दिवाळी ते लवकर बंद पण झाले असणार .
आपली काही हरकत नसेल तर तुम्ही राहा आज आमच्या कडे .त्याने  खिशातून  मोबाईल  काढला .कोणाला तरी फोन करून  दुसरी  गाडीची  व्यवस्था  करावी असे  त्याला  वाटले  पण  तेथील  वातावरण  बघून   तो भारावून गेला होता .काही आठवत होते .काही तरी सापडले होते .
त्या माणसाच्या विनंतीला मान देऊन तो घरात गेला .
किती साधे घर होते ते मातीच्या भिंती गवताचे छप्पर 
छोट्या छोट्या दोन खोल्या होत्या..त्याने आजूबाजूला बघितले .
एक खोलीत एक खाट होती साधी रस्सीने विणलेली .एका कोपऱ्यात देवाचे 
साधासा देव्हारा  त्या समोर काही  फुले  होती ,बाजूला  केरसुणी  आणि  एका ताटात  काही  धान्य ठेवलेले होते  .तीच  त्यांची  लक्ष्मी  पूजा  होती .गरीबाची  पूजा अशीच  असते असे  तो मनात पुटपुटला .दुसऱ्या कोपऱ्यात दोन लोखंडी पेट्या .त्याच्या वर छान रचून ठेवलेल्या
गोधड्या आणि चादरी .बस एवढेच काय ते सामान .
बाजूच्या घरात चूल स्वयपाकाची भांडी बस .
घरात पण दिवे लावले होते रॉकेलचे .एक चटई अंथरून देत तो माणूस
बोलला बसा पाहुणे .पाणी दिले .घरात एक लहान मुलगा होता .
त्या माणसाची बायको सून आणि मुलगा असे पाच माणसाचे ते घर होते .
तो मात्र भूत काळात गेला खूप मागे असेच त्याचे घर होते .आई वडील आणि तो .
दुसर्याच्या शेतावर मोलमजुरी करून पोट चालवणारे त्याचे आई वडील आणि तो .
आपल्या मुलाने खूप शिकावे हाच त्याचा ध्यास होता .शाळेत तो खूप हुशार होता .
नेहमी वर्गात पहिला .पाचवीला गेला आणि वडील साप चावून जग सोडून गेले .
तरी पण आई ने हिम्मत नाही हरली शिक "मी आहे ना, असेच ती बोलायची .
शेतातील कामा बरोबर तिनी चार घरी धुणीभांडी सुरु केली .
तो पण रविवारी कोणच्या हॉटेलमध्ये काम करी .कधी  कोणाच्या शेतात  आई  बरोबर  कामाला  जात असे .
१० विला तो जिल्ह्यात पाहिला आला .आणि त्याला शिष्यवृत्ती भेटली .आता त्याला शहरात
शिकायला जावे लागले .आईला सोडून जाताना त्याला  खूप वाईट वाटले .
पण नेहमी काम काम या मुळे त्याची आई आजारी पडू लागली .तिनी दुखणे अंगावर
काढले .आपण डॉक्टर कडे गेलो तर खूप पैसे लागणार म्हणून ती मुलाला काही समजू
देत नसे.दुखणे जादा वाढले आणि त्याचा एकुलता एक आधार पण संपला .
जिथे कोणी नाही त्या गावात का जायचे म्हणून तो पुन्हा कधी गावी गेला नाही .
खूप शिकला मेहनत केली .आणि डॉक्टर झाला .परदेशात जाऊन आला .
त्याची मेहनत बघून एक डॉक्टर ने आपली डॉक्टर मुलगी त्याला दिली .
आज शहरातील एक नामाकीत हॉस्पिटलचा तो मालक आहे .
खूप पैसे कमावले .गाड्या आहे .मोठा बंगला आहे .
काय नाही आहे .त्याच्या कडे पण तरी काही तरी कमी आहे हेच त्याला जाणवत राहते .
काय ते त्याला समजत नाही .
पाहुणे चहा घ्या लवकरच सैपाक होईल मग जेवण करू..
आणि तो त्या आवजाने भानावर आला .चहा घेताने त्याला समजले .
हा शेळीच्या  दुधाचा चहा आहे .जसा लहान असतानी तो घ्यायचा .
त्याने सहज विचारले लाईट नाही मग टीव्ही नाही .कसे राहतात तुम्ही .
आम्ही मोलमजुरी करून जगणारी माणसे ,सकाळ झाली कि कामावर जायचे
दिवसभर कष्ट करून  दमून घरी यायचे जेवण करयचे आणि झोपून जायचे .
कशाला हवा आम्हाला टीव्ही .दर महिन्याला  येणारे  लाईटचे  बील  पण  परवडत नाही .
"पण मग जगात काय चालू आहे कसे समजणार तुम्हाला "तो
"जगात काय चालू आहे ते समजून काय करायचे साहेब " त्यांनी काय पोटाला भेटणार आहे का ?
पोट भरणार आहे .
तेवढ्यात जेवण तयार आहे चला जेवयला म्हणून त्याची बायको ने आवाज दिला .
चुली समोर जेवणाची ताटे मांडली होती .सगळे ताटावर बसले .त्याच्या बायकोने एक ताट
घेतले आणि ती बाहेर गेली .आणि त्याला आठवले जेव्हा कधी असा सन असे तेव्हा त्याची
आई देखील असे करत असे .आकाशाच्या दिशेने ते ताट पकडून ती ते दाखवत असे .
नंतर ते ताट गाई समोर ठेवत असे .असे का करते असे त्याने आईला विचारले होते अनेकदा .
"अरे आपल्यला प्रकाश देणारे चंद्र ,सूर्य .हे आकशात असतात ना म्हणून .गाई  आपल्यला
दुध देते म्हणून ."असे आई त्याला सागत असे .
आज त्याला खूप काही काही आठवत होते .आरशा वरील धूळ झटकून टाकावी आणि त्यात
आपलेच प्रतिबिंब लख्ख  दिसावे तसे .
साधे जेवण पुरण पोळी ,भजी ,कुरडई.सार {कटाची आमटी }.बस बाकी काही नाही .न लाडू आहे
ना करंजी चकली काही नाही .
पण दिव्याच्या उजेडात चाललेले ते जेवणाची चव जगात त्याला कुठल्या पण हॉटेल मध्ये
भेटली नव्हती .
कोण होती हि माणसे त्याची पण किती प्रेमाने त्यांनि कसली अपेक्षा न ठेवता त्याला जेवायला
घातले होते .
आज त्याला आई खूप आठवली .आपले ते घर आठवले .त्या घरात असलेले प्रेम आठवले .
त्याला त्याच्या आयुष्यातील कमी समजली .सगळे होते त्याच्या कडे पण नव्हते असे घर .
मातीच्या भिंती ,शेणानी सारवलेली जामीन .कोणता सन असतानी घराचे ते वेगळे रूप .
त्याच्या कडे होता बंगला आधुनिक सुविधा असलेला .पण त्याच्या मनातील ते घर कधी गेलेच
नव्हते . म्हणून प्रत्येक दिवाळीला त्याला एक प्रकारची उदासी येत असे का ? हे त्याला समजत नव्हते .
आज त्याला सगळे लक्ख समजले .आणि त्यांनी मनाशी एक निर्णय घेतला.
त्यांनी आपला मोबाईल काढला आणि घरी फोन केला .मी उद्या माझ्या जन्म गावी जातो आहे .
या गोष्टीला आता दोन वर्ष झाले आहे .त्याच्या जन्म गावी त्याने मोठे हॉस्पिटल बांधले आहे .
बाजूला एक छोटे घर आहे जे मातीच्या भिंती आणि गवताचे छप्पर असलेले आहे .
जिथे त्याला समधान भेटते आई आहे आपल्या बरोबर हे जाणवत जगातील कोणत्या  गोष्टीने  न  भेटलेले समाधान आज त्याला भेटले .
ज्या घरात तो गेला आणि त्याला  हि प्रेरणा भेटली ती कुटुंब आता त्याच्या बरोबर आहे .
आता त्याचे एकच ध्येय आहे .त्याच्या आई सारखे कोणी इलाजा शिवाय राहू नये .
२६/१०/२०१४ 

No comments :

Post a Comment