Friday, 26 December 2014

प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात आपण भटकतो. खुपदा धडपडतो. कधीकधी चुकतो. आणि मग शिकतो. प्रश्नांची उकल ही जलाप्रमाणे आहे. प्रश्नांमुळे व्याकूळ झालेल्याला व्यक्तीला ती तृप्त करते. परंतु, प्रश्नाचे महात्म्य तितकेच. खरंच! जर प्रश्न निर्माणच झाले नाहीत. तर कदाचित जगणे हाच एक प्रश्न बनेल.
प्रश्न हा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. प्रश्न निर्माण होतात. त्याच्या उकली सापडतांना जीवन वेगवेगळ्या अंगांनी बदलत जाते. बदल हा सृष्टीचा (न बदलणारा) नियम आहे.

No comments :

Post a Comment