Sunday, 20 December 2015

माझ्या फेसबुक पोस्ट


एक स्मित हास्य कोणाला आपलेसे करण्यास पुरे असते .तेच स्मित कोणाकडे बघून उपरोधिक पणे केले तर आपले परके होवून जातात.






एखाद्या व्यक्तीचा खूप आदर वाटतो .ती असते आदर करण्या सारखी ...

सगळ्यांना मान देणारी .पण आपण तिचा बरोबरीचे असून तिला मान सन्मान मिळतो .यश तिचा पायाशी नेहमी लोळण घेते .आपण कुठे कमी नसतो तरी यश मिळत नाही. मग ज्यांना यश मिळते त्यांच्या बद्दल आधी असूया तयार होते.मग हळूहळू त्याचा नासूर होतो.आणि मग त्या व्यक्तीला शत्रू समजतो.सगळ्यात मोठा शत्रू.......पण असे का होते त्या व्यक्तीचा राग का येतो.राग नेमका कोणाचा असतो .आपल्या अपयशाचा का ?
समोरील व्यक्तीच्या यशाचा .समजत नाही .
मग यश मिळवण्यासाठी वाटेल ते ....
यश मिळते आणि अहंकार वाढतो ...
पण जाणीव असतेच आपण जे करतो त्याची...
असेच मनातले काही

यश मिळते आणि अहंकार वाढतो ...
पण जाणीव असतेच आपण जे करतो त्याची...
असेच मनातले काही






चित्रपट आपली संसकृती सांगत असतो .त्या काळात लोक कसे राहत होते किवा एखादी आदर देणारी व्यक्ती नक्की कशी होती ते जाणवून घायला कोणालाही आवडते पण ते साठी अभ्यास करावा "मुघले आझम' किवा उमराव जान हे चित्रपट आठवतात .अगदी त्या काळातील दागिने यावर सुद्धा बारीक विचार केला गेलेल्या दिसतो .कदाचित तेव्हा पैसे या पेक्षा कलाकृतील जास्त महत्व दिले जात असावे .
येणारा बाजीराव मस्तानी आल्या नंतरच समजेल कसा आहे .दोन्ही खांद्यावर पदर घेणाऱ्या पेशवाई मधील स्रिया बघायला भेटतात का ? आणिखी काही समजेल लवकर .
असेच मनातले काही

येणारा बाजीराव मस्तानी आल्या नंतरच समजेल कसा आहे .दोन्ही खांद्यावर पदर घेणाऱ्या पेशवाई मधील स्रिया बघायला भेटतात का ? आणिखी काही समजेल लवकर .
असेच मनातले काही







आजच्या पिढीला इतिहास वाचायला जास्त आवडत नाही .एक निरीक्षण .....त्यांना आवडते आज मध्ये जगायला ,पण इतिहास हा जेव्हा चित्रपट आणि मालिके मधून समोर येतो तेव्हा ते नक्की त्याबद्दल चर्चा करतात ,बघतात . पण गरज असते इतिहास नीट वाचण्याची तो समजून घेण्याची ,पुढील पिढी समोर तो जसा आहे तसा मांडण्याची .फक्त भव्य दिव्य करण्याकडे आणि केवळ बाजारात विकला जावा म्हणून त्यात नको ते घुसवून ,चुकीची माहिती देणे पण बरोबर नाही ना ?

काही लोक कारण नसतानी दुसर्यांना रडवण्यात धन्यता मानतात तर काही लोक कारण नसतानी दुसर्यांचे आसू पुसण्यात धन्यता मानतात .१७ feb




पैशाने दिखावा करता येतो माणसे विकत घेता येतात .माणसे गोळा करता येतात .पण माणुसकी आणि चागले पणा पैशाने नाही मिळत .



वेदना झाल्या कि डोळ्यात पाणी येते .पण ते वेदनेचे आहे हे समजायला मन तसे असायला हवे .नाही तर ते रडगाणे वाटणारे त्यावर हसणारे एक दिवस रडतात .
आपण कोणाला हसलो कोणच्या दुखावर हसलो हे समजून पचात्ताप होतो पण तेव्हा वेळ गेलेली असते .देवाच्या लाठीला आवाज नसतो बोलतात .तसे होते .ती कधी तरी पडते मग जसे करावे तसे भरावे याचा अनुभव येतो .आज आहे तो उद्या राहीलच हि समज माणसाला एक दिवस नियती नक्की चपराक देते .{17feb}
‪#‎असेचमनातलेकाही‬


नको ते बोलून आत्मविस्वास घालवणारे असतात तसेच पुढे येवून उम्मीद देणारे असतात .तेव्हा समजून जा तुम्ही चुकत नाहीत .


दोन शब्द मनापासून कोणाशी बोला ,कोणाच्या चेहऱ्यावर नक्की हसू दिसेल .दोन शब्द रागाने बोला ,हसरा चेहरा नक्कीच रडवा होईल .आपण काय करायचे ते आपण ठरवायचे .{२२ feb १५ }



व्यक्ती जेव्हा शून्यातून यशाच्या शिखरावर पोहचते .तेव्हा त्याच्या बरोबर असतात प्रामाणिक जीवाला जीव देणारी माणसे,त्यांना कशाची अपेक्षा नसते.
आपली व्यक्ती मोठी होणे यातच त्यांचे समाधान असते.यशस्वी व्यक्ती विसरत नाही आपल्या जीवाला जीव देणाऱ्या माणसाना .......पण वेळ बदलते यशस्वी व्यक्ती भोवती स्तुती करणाऱ्या स्वार्थी लोकांचा गराडा पडतो.नाविलाज असतो किवा यशाची हवा डोक्यात जाते.नकळत जीवाला जीव देणारे हळूहळू दूर होत जातात.यात दोष कोणाचा असतो .परस्थिती नुसार बदलता न येणाऱ्या माणसांचा ....
कोणतीही गोष्ट अति झाली कि ती नको वाटते .मग ती किती आवडणारी असली तरी .


नावे ठेवणे हा मनुष्य स्वभाव आहे आणि असतो .मी नाही तसा किवा तशी असे किती म्हटले तरी हा गुण प्रत्येका मध्ये असतोच .पण मला नेहमी वाटते एखादी व्यक्ती अशी का वागते याचा विचार जर त्याच्या जागी जावून केला तर ,आपण त्या व्यक्तीला समजून तर घेऊ शकतो ,आणि जमेल तशी मदत करू शकतो असे मला वाटते .



आयुष्यात छोट्या गोष्टींना खूप महत्व असते.पण त्यांना छोट्या समजण्याची चूक केली तर त्या पुढे जावून खूप मोठ्या होतात .







असेच मनातले काही

एक व्यक्ती कधी दुसऱ्या व्यक्ती सारखी नसते .अगदी मग ते दिसणे असो कि बोलणे .चालणे. आणिहि विचार सुद्धा हे माहिती असून अनेकदा अनेक "मी नाही तुझा सारखा .किवा मी नाही त्याचा सारखा "असे वाक्य का बरे बोलत असतील .




अति विचार हे दिशा हीन नावे सारखे असतात .जिला कधी किनारा मिळत नाही.


कधी तरी खोटे बोलून बघा,खरे आपोआप बाहेर येते...............


स्तुती आवडत नाही असे कोणी भेटणार नाही ,फक्त ती किती खरी किती खोटी हे ओळखता आले पाहिजे .

नाही ओळखता आले तर अधोगती ठरलेली 

आयुष्यात काही दिवस विसरायचे म्हटले तरी विसरता येत नाही .कुठे तरी वाईट आठवणी मनावर घाव करून गेलेल्या असतात .त्या आठवणी जर हलाखीच्या परस्थिती मधील असतील तर त्या नेमक्या आनंदाच्या क्षणी आठवतात .मग नकळत डोळे कधी भरून येतात ते पण समजत नाही .

अपमानाचा घाव म्हणजे सुदर प्रतिबिंबाला गेलेला नाजूक तडा .जो कधी भरला जात नाही

अतिशय खरी आणि वास्तव म्हण .......

सगळे सोंगे आणता येतात पण पैशाचे नाही .........
आणि पैशाच ठरवतो माणसांची किमत ........
कमीतकमी आजच्या जगात तरी .......

कोणती गोष्ट जेव्हा नवीन असते तो पर्यंत तिचा बद्दल आकर्षण असते ,तिचा बद्दल ओढ असते .नंतर येणारा तोच तोच पणा यामुळे मग त्यातील आकर्षण संपून जाते .मग ती गोष्ट नकोशी वाटते .मग ते काही असो .एखादी वस्तू .अथवा एखादी व्यक्ती किवा आणखी काही .खरे तर माणसाचे मन हे चंचल असते .त्याला नेहमी नवीन काही हवे असते .मग त्या साठी जुने मागे पडते .नकळत .....

जिंदगी किती सुदर शब्द आहे ना.म्हणजेच जीवन,.आपल्यला जन्म आई वडील देतात.चालयला शिकवतात.त्यांना जमेल तसा रस्ता दाखवतात .संस्कार देतात .परंतु या जीवन रुपी रस्त्यावरून आपल्यला चालायचे असते.ते कसे आपण ठरवायचे असते.रस्त्यात खाच खळगे येणार ,अनेक वळणे येणारआपण ते कसे पार करतो,आणि या जीवन रुपी चित्रात कोणते रंग कुठे आणि कसे भरतो हे तर आपल्यावरच असते ना


कोणी तरी वर्षानुवर्षे आठवणी काढावी,नतमस्तक व्हावे ,असे महान कार्य कारावे लागते.त्यासाठी लागते प्रचंड मेहनत आणि जिद्द मग तेव्हा ती ठरते समाज बदलाची मोठी नादी.........



चित्रपट आणि विरोधक


वाद कुठे घालावा????
ज्या विषयाची पूर्ण माहिती असेल आणि अभ्यास असेल तिथे नाही का ?
संजय भन्साळी यांनी इतिहासचे विकृत्तीकरण केले आहे असे बोलले जात आहे .
काल काही लोकांनी तो चित्रपट दाखवू नाही म्हणून पुण्यात आंदोलन केले .
त्यावेळी काही पत्रकारांनी आंदोलना करणाऱ्यांना काही प्रश्न विचारले .
जसे "पहिला पेशवा कोण आणि त्यांना पेशवा हे पद कोणी दिले "?
बाजीराव पेशव्यांनी लढलेली पहिली लढाई ?
या प्रश्नाचे उत्तर त्या आंदोलन करणाऱ्यांना देता आले नाही .ते चूप बसले .
आता प्रश्न असा आहे.मराठ्याचा अभिमान असणारे ,पेशव्याचा अभिमान असणाऱ्यांनाया आंदोलकांना हे माहिती असू नाही .मग आपण भन्साळी कडून काय अपेक्षा करणार नाही का ?
आंदोलन करणारे मराठी प्रश्न विचारणारे मराठी मग त्यांनी पत्रकारांना का नाही विचारले .
काशी बाई आणि मस्तानी एकत्र नाचली होती का ?
पेशवे कालीन बायका असा प्रकारे साडी घालत होत्या का ?
मिडिया नेमका कोणाची बाजू घेतो .
आंदोलन करून आंदोलक कोणाला मदत करतात .
माहिती नाही पण या सगळ्याचा फायदा चित्रपटाला नक्की होतो असे वाटते .
असेच मनातले काही

नात्याचे प्रकार



सख्खे आणि मानलेले नाते.......
कोणाला वाटते सख्खे नाते किती मतभेद झाले तरी ते तुटत नाही.
जसे पाण्यावर लाठी मारून पाणी वेगळे करता येत नाही तसे सख्खे नाते असते.
तर कोणाला वाटते मानलेले नाते सख्या नात्या पेक्षा बरे ...
अर्थात हा ज्याचा त्याचा अनुभव आहे.
अनेकदा सख्खी नाती केवळ अतिअपेक्षा किवा कर्तव्याच्या नावा खाली होणर्या त्रास मुळे तुटतात. अनेकदा मग एकमेकाची तोंडे न बघण्यापर्यंत ताणलेली नाती काही दुवे {घरातील वडिलधारे} यांच्या मुळे परत जुळले जातात देखील ,मानलेल्या नात्या मध्ये जास्त अपेक्षा या नसतातच. आणि काही करणामुळे जर मानलेले नाते तुटले तर.तेपरत जुळण्याची शक्यता कमी असते.होपण अनेकदा आम्ही त्यांचे कोणी नसून त्यांच्या साठी हे केले ते केले हे मात्र बोलले जाते.माझ्या मते सख्या आणि मानलेल्या नात्या पेक्षा वरचढ ठरतात ते शेजार्याच्या बरोबर असलेले नाते ,कोणत्या दुखात सगळ्यात आधी धावून येतात ते शेजारी.किती सहज नाते असते. अर्थात सगळ्यांना चांगले शेजारी भेटणे ज्याचे त्याचे नशीब असते .असेच मनातले काही

नाते मातीशी



आपल्या हाय फाय गाडीतून तो जात होता रस्त्यावर वर्दळ नव्हती .
रस्त्याच्या दुतर्फा ज्वारीची मस्त पीक शेतात डोलत होते .सकाळची वेळ होती .हवेत मस्त गारवा होता .गाडी मधून खाली उतरण्याचा मोह त्याला झाला .एका बाजूला गाडी उभी करून तो खाली उतरला .जवळच्या शेतात बोर चालू होते त्याचे पाणी कोणी तरी शेताला देत होते .त्याने पायातील आपले बूट काढले .त्याच्या पायांना ओल्या मातीचा थंडगार स्पर्श झाला .पाण्यात हात घातले किती थंड पाणी होते .खूप वर्षाने त्याने हा मातीचा आणि पाण्याचा स्पर्श अनुभवला.किती वेळा तो बिना चप्पलचा अश्या ओल्या माती मधून धावला होता .पडला होता .त्याचे मन भूत काळात गेले .
छोट्या गावातील वडिलांचे छेत्र हरवले म्हणून आई बरोबर मामा कडे येवून राहिलेला .एक प्रकारे आश्रित .आई बरोबर जे काम सांगितले जात ते करणे एवढे माहिती असलेला .एक सज्जन मास्तर आयुष्यात आले आणि शिक्षणा मुळे आयुष्य बदलते हे समजले .मग फक्त जिद्द आणि जिद्द .यशाची एक एक पायरी कधी चढत कधी वरच्या पदावर गेला हे समजले नाही .
या सगळ्यात मागे राहिले गाव आणि बाल सवंगडी ...


दूर वरून "जय जय रामकृष्ण हरी " आवाज आला आणि तो भानावर आला .
कुठे तरी भजन चालू होते .नकळत खेचले जावे तसा तो त्या आवाजाच्या दिशेने गेला .एक मंदिरात कीर्तन चालू होते .सात दिवस चाललेल्या सप्ताह आज काल्याच्या कीर्तनाने संपत होता .
त्यांनी एका मानसं कडून टाळ घेतला .आणि तो टाळकऱ्या मध्ये जावून उभा राहिला .कीर्तन कर महाराज

 अभंग म्हणत होते .
"किती कर हा संसार नर देह मातीला जाणार "
तो देखील भजनात तल्लीन होऊन गेला .
आज त्याला मनात खूप समाधान वाटत होते .
तो लहान असतानी गावात एकमेव कर्यक्रम होत असे तो म्हणजे गावातील सप्ताह ,रोज भजन ,पारायण ,प्रवचन आणि रात्री कीर्तन .गावात नुसती धमाल असे .आणि त्याला ते सगळे आवडत असे .कीर्तानात नेहमी टाळकरी म्हणून तो उभा राहात असे .अभंग तर तोंडपाठ मग काय बाबा कीर्तन करत असतानी हा योग्य अभंग म्हणून नेहमी बाबांना आडवे जात असे .आयुष्यात खूप काही मिळवता मिळवता खूप काही मागे सुटले ...
मनापासून देवाला प्रणाम केला आणि वर्षातील सात दिवस कुठल्या world टूर करण्या पेक्षा गावाला जायचे आपल्या मातींत आपल्या माणसात हा निश्चय करून तो आपल्या पुढच्या प्रवासाला निघाला .
असेच मनातले काही .
{काल्पनिक }
छोट्या गावातील वडिलांचे छेत्र हरवले म्हणून आई बरोबर मामा कडे येवून राहिलेला .एक प्रकारे आश्रित .आई बरोबर जे काम सांगितले जात ते करणे एवढे माहिती असलेला .एक सज्जन मास्तर आयुष्यात आले आणि शिक्षणा मुळे आयुष्य बदलते हे समजले .मग फक्त जिद्द आणि जिद्द .यशाची एक एक पायरी कधी चढत कधी वरच्या पदावर गेला हे समजले नाही .या सगळ्यात मागे राहिले गाव आणि बाल सवंगडी ...दूर वरून "जय जय रामकृष्ण हरी " आवाज आला आणि तो भानावर आला .कुठे तरी भजन चालू होते .नकळत खेचले जावे तसा तो त्या आवाजाच्या दिशेने गेला .एक मंदिरात कीर्तन चालू होते .सात दिवस चाललेल्या सप्ताह आज काल्याच्या कीर्तनाने संपत होता .त्यांनी एका मानसं कडून टाळ घेतला .आणि तो टाळकऱ्या मध्ये जावून उभा राहिला .कीर्तन कर महाराज अभंग म्हणत होते ."किती कर हा संसार नर देह मातीला जाणार "तो देखील भजनात तल्लीन होऊन गेला .आज त्याला मनात खूप समाधान वाटत होते .तो लहान असतानी गावात एकमेव कर्यक्रम होत असे तो म्हणजे गावातील सप्ताह ,रोज भजन ,पारायण ,प्रवचन आणि रात्री कीर्तन .गावात नुसती धमाल असे .आणि त्याला ते सगळे आवडत असे .कीर्तानात नेहमी टाळकरी म्हणून तो उभा राहात असे .अभंग तर तोंडपाठ मग काय बाबा कीर्तन करत असतानी हा योग्य अभंग म्हणून नेहमी बाबांना आडवे जात असे .आयुष्यात खूप काही मिळवता मिळवता खूप काही मागे सुटले ...मनापासून देवाला प्रणाम केला आणि वर्षातील सात दिवस कुठल्या world टूर करण्या पेक्षा गावाला जायचे आपल्या मातींत आपल्या माणसात हा निश्चय करून तो आपल्या पुढच्या प्रवासाला निघाला .असेच मनातले काही .{काल्पनिक }