Thursday, 11 December 2014



आपल्याला कधी कधी एकटे राहण्याची किती सवय होते ना .
पण त्या वेळी आपल्याला आपण एकटे आहे त्याचे थोडे वाईट वाटते ना ?
पण तेच बरे असते असे वाटते कधी कधी,कारण आयुष्यात काही नाते असे असतात .
ते ना आपल्या बरोबर असतात ना आपल्या पासून दूर ,ओझे झाल्या सारखे ते
ना टाकून देता येतात ना बरोबर घेऊन चालता येतात .
अशा वेळी खरच वाटते मी आणि माझा एकात बरा
कोण काय बोलते कोण काय सल्ला देते काहीच नको
असेच मनात आलेले .......आशा

No comments :

Post a Comment