Friday, 26 December 2014

.
आनंदाचे हसरे क्षण कसे पटकन निघून जातात.त्यांना थांबवता येत नाही .तसेच 
दुखाचे क्षण देखील थाबुन राहत नाही .पण ते खूप काही शिकवून जातात .
आयुष्यात नेहमी सगळे सरळ असावे असे वाटते .पण या छोट्याश्या आयुष्यातील 
प्रवास मात्र नेहमीच सरळ असतो असे नाही .कधी सरळ तर कधी खाचंखळग्याचा .
आनंदी क्षणी आपले आणि जे आपले नसतात ते बरोबर असतात .
संकटा मध्ये आपले आणि आपले म्हणणारे कोण ते समजते .अशा वेळी समोर असतो तो फक्त अंधार असा वेळी एखादा आशेचा किरण दिसावा तसे काही लोक आपल्यला साथ देऊन जातात कोणती अपेक्षा न करता अचानक देवदूत सारखे येतात मदत करतात कोणती अपेक्षा न ठेवता निघून देखील जातात .
आपण खूप काही शिकतो.जगाच्या या शाळेत .......

No comments :

Post a Comment