Tuesday, 29 November 2016

ती

रविवारी पुण्यावरून ट्रेन ने येत होते .महिलांचा डबा .गर्दी होती बसायला जागा नव्हती .एक घाणेरडे कळकट मळकट कपडे घातलेली वीस बावीस वर्षाची मुलगी दरवाजा समोर झोपली होती तिचा बाजूला छोटी मुलगी होती तिला बघून ती एक दीड वर्षाची असावी असे वाटत होते .गर्दी मुळे सगळ्या बायका तिला ओरडत होते येथे उभे राहिला जागा नाही आणि हि काय झोपली .पण तिने सगळ्यांचा बोलण्या कडे साफ दुर्लक्ष केले .तशीच झोपून राहिली .दरवाजात साधारणता पंचवीस वर्षाचा एक मुलगा बसला होता .तो तिचा नवरा होता .कर्जत गेले आणिती उठूनबसली .किती दिवसाची अंघोळ केली नाही असे वाटत होते .तिचा कडे नीट बघितले तेव्हा मला समजले तिला कावीळ झाली होती .तिला विचारले कुठे गेली होती .बोलली काविळीचे औषध टाकायला .दोन महिन्या पासून तिला कावीळ आहे .त्या छोट्या मुलीला पण कावीळ झाली होती .खूप अशक्त पणा आहे म्हणून झोपले होते बोलली

.कुठे तरी मुलुंड मध्ये गजरे विकते बोलली .राहायला कल्याण मध्ये कुठे तरी फूटपाथ वर राहते .कुठे पाणी पिणे अस्वच्छता या मुळे तिला कावीळ झाली असणार .तिला बोलले या मुलीला तुझा मुळे कावीळ झाली का .तर बोलली हि तीन वर्षाची आहे .हिचा नंतर एक मुलगा होता .छान होता .तिचा भाषेत टकाटक होता अचानक मेला .किती थंड पणे ती सांगत होती .ऐकून अंगावर काटा आला .आपले मुलं गेले .जसे ते जाणार होते असेच काही तिचे बोलणे .रस्त्यावर राहणारे म्हणून आपण त्याच्या कडे तुच्छातेने बघतो .पण आई हि तर आई असते ना ? ती मग बंगल्याील असो कि रस्त्यावरील .दुःख तर सारखेच ना .पण कशाचा बाऊ नाही कि रडारड नाही .हे असेच असते आणि होत राहणार हे त्यांनी स्वीकारेल असते का ? दोन बाळंतपण सहन केलेली ती मुलगी .फक्त आज म्हणून जगते का ? करणं त्यांना आपल्या मुलांची काळजी वाटत नसते का ? आपला धड ठिकाणा नाही मग आपण जन्म देतो त्या मुलांचे काय .असे त्यांना वाटत नाही का ?


दादर फुल मार्केट बाहेर असाच कमी वयाच्या मुली हार गजरे विकत असतात .उगाच मनात येते किती तफावत आहे समाजात .एक वर्ग आहे जो फक्त करियर चा विचार करून लग्न लवकर करत नाही .किंवा एक मुल बस महागाई आहे त्यांना चांगले भविष्य देऊ शकू का हा विचार करणारे .आणि हा एक वर्ग लवकर लग्न लवकर मुले .पुढे काय विचार नाही .कधी संपेल हि दरी .
असेच मनातले काही

आठवणीतील गाव

तिन्ही सांजेची वेळ , धुरळा उडवत आणि आवाज करत एस.टी स्टॅन्डवर येऊन उभी राहिली. तो बस मधुन उतरला एक नजर आजुबाजुला फिरवली. काही ओळखीचे चेहरे समोर आले. त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य करून घराच्या वाटे कडे निघाला. गावच्या वेशी जवळ आल्यावर वेशीच्या उजव्या बाजूला दोन मंदिर होते . एक मारुतीच आणि दुसर संत मंदिर त्यासमोर मोठा सभागृह . जिथे गावातील भागवत सप्ताह संपन्न होतात. तर उन्हाळ्यात लग्न. रोज संध्याकाळी सांज आरती असते .आता पण आरती चालली होती . "युगे अठ्ठावीस विटेवरी उभा|"नकळतच त्याचे पाऊले मंदिराकडे वळाले . दर्शन घेतले आणि तो गावच्या ओबडधोबड रस्त्यावरून चालू लागला. मध्येच एखादी आज्जी ओट्यावर बसलेली दिसत होती. तिन्ही सांज म्हणुन झाडावर पाखरांची किलबिल ऐकु येत होती. शेतातुन घरी परतणारी माणसे. कोणाच्या डोक्यावर गवताचे भारे तर कोणाच्या हातात शेळी नाही तर बैल . अन बैलाच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज. हे सगळे बघत तो कधी घरा समोर आला  हे त्याला पण समजले नाही.

घराला कुलूप होते. म्हणजे आई अजून आली नव्हती. तो तिथेच ओट्यावर बसला .त्याला स्वताचे बालपण आठवले. शाळेतून घरी आला की तो अशीच आईची वाट बघत बसायचा . घरासमोर बोरीचे झाड होते. त्याचे बोर पाडायचा किंवा चिंचोके खात बसायचा . आई कधी येईल. भूक लागलेली असायची. दुर शेता कडून येणाऱ्या वाटे कडे डोळे लावून बसायचा. दुर वरुन डोक्यावर गवताचे ओझे आणि हातात शेळी घेऊन आई येताना दिसली की खूप आनंद व्हायचा त्याला. गवताचे भारे अंगणात टाकून शेळी बांधे पर्यत आईचा पदर धरून मागे मागे फिरत रहायचा. मग आई घरात जायची. पटकन चुली मधील राख भरून टाकायची. बाहेरून गोवऱ्या आणि बाभळीचे सरपण घेऊन घरात यायची. दिवा लावायची . चुल पेटवायची मग चुलीवर चहा ठेवायची. शेतातुन आणलेली भाजी काढायची . त्या बरोबर मुगाच्या किंवा चवळीच्या शेंगा काढून द्यायची. चहा होई पर्यंत तो शेंगा खात बसायचा . शेळीच्या दुधाचा चहा पिऊन झाला की तो दिवसभर शाळेत काय झाले ते आईला सांगायचा. चुली वरील गरम गरम भाकरी बरोबर भाजी खाऊन घ्यायचा.घरच्या ओट्यावर घरातील सर्व जण बसायचे. पौर्णिमेच्या आधी आणि नंतर काही दिवस छान चांदणे पडायचे. मग शेजारच्या आज्जी काकू कोणी येऊन बसत गोष्ट सांगत . आजु बाजुला पडलेला चंद्र प्रकाश . शांतता छान वाटायची उगाच जमिनीवर पडुन आकाशात किती तारे असतील ते मोजण्याचा वायफळ प्रयत्न करायचा. ते बघत बघत झोप लागायची समजत नसे.किती सुंदर दिवस होते ते. कुठून तरी बाईक चा आवाज आला आणि त्याची तंद्री तुटली. दुर वरुन येणाऱ्या पाय वाटे वरून एक बाईक येत होती. शेजारच्या काकू मुला बरोबर बाईक वरुन शेतातुन आल्या होत्या. आता गाव बदलले होते. कोणी पायी जास्त चालत नाही.
दूर वरून येणारी आई दिसली तशीच अनेक वर्षा पुर्वी होती तशीच डोक्यावर गवताचे ओझे हातात शेळी फक्त आई आता थकली होती. जवळ आली त्याला बघून आनंदी झाली. तो पुढे गेला गवत घेतले. शेळी बांधली. आई कडून चावी घेतली . घरात गेला पाणी आणले आईला दिले. त्याने आईला गॅस घेऊन दिला होता . त्यानेच चहा केला. गॅस वर आईने कुकर लावला. त्याच्या साठी चपात्या केल्या. तो नको नको म्हणत होता. पण तुला आता भाकरीची सवय नसेल राहिली ना . असे म्हणून तिने त्याला ते जेवण दिले. त्याला ओरडून आईला सांगावे वाटत होते. आई मला परत चुली वरील भाजी-भाकरी हवी गं . पण त्याने ते मनात ठेवले कारण त्याला माहीत होते .असे वरणभात चपाती आई फक्त तो आल्यावर करते . आपल्या बरोबर ती दोन तीन घास चांगले खाते . म्हणून तो गप्प राहतो . आईचे लक्ष नाही हे बघून तो दुपारची टोपल्यातील भाकर घेऊन खातो . त्याच्या कडे सगळे आहे पण आई त्याच्या बरोबर राहत नाही. तिला शहरातील वातावरण आवडत नाही. कारण तिचे आयुष्य शेतात गेलेले असते ना .

तो जेवून बाहेर येतो .आता पण तसाच प्रकाश पडलेला असतो . फक्त आता कोणी बसायला येत नाही. कारण आता शेजारच्या आज्जी काकू या घरात टीव्ही बघत असतात . एक होता राजा कधीच हरवलेला असतो .आकाशातील तारे मोजण्या पेक्षा मुले घरात मोबाइत वर गेम खेळत बसतात . तो मनात म्हणतो हरवलेला गाव माझा ..

निरागस

लहान मुले खूप निरागस असतात असे आपण म्हणतो .किवा त्यांनी काही मागितले कि आपण त्यांना जसे जमेल तसे देतो .मग गरीब असेल नाही तर श्रीमंत आपल्या ऐपती प्रमाणे खरेदी केली जाते .पण कधी कधी मुले नको तो हट्ट करतात .
मागे काही दिवसा पूर्वी मुंबई विमानतळावर{ डोमास्तिक} जाण्याचा योग आला होता.प्रतीक्षा विभागात वाट बघत बसले होते .समोर प्रवास करून येणारे प्रवाशी गेट मधून बाहेर येताना दिसत होते .कोणी एकटे कोणी परिवारा बरोबर काही एकदम खुश तर काही त्रस्थ ..........


गेट मधून असेच एक परिवार बाहेर आले त्यांचा बरोबर एक दोन तीन वर्षाचा मुलगा होता.आजी आई बाबा आणि तो ....आई च्या हाताला पकडून चालत होता .म्हणण्या पेक्षा त्याची आई त्याला खेचत घेवून जात होती आणि तो रडत होता.अचानक त्याने आईचा हात सोडला आणि तो जमिनीवर लोळायला लागला.छान ड्रेस घातलेला तोछोटा मुलगा आपले आई ऐकत नाही बघून त्याने असे केले असणार .ते बघून मला गम्मत वाटली .विमानतळ म्हणजे काही एखादी गल्ली किवा रस्ता नाही .त्याचे आई वडील पण चांगले श्रीमंत वाटत होते .
गाच मला दिवाळी खरेदी वेळी गावच्या बाजारात आईच्या मागे रडत जाणारे मुले आठवले .आईने घेतलेले कपडे आवडले नाही का ते सरळ आपण कुठे आहे हेबघत नसायचे आणि जमिनिवार मातींत लोळण घायचे त्याबरोबर जोरजोरात रडायचे.हात पाय आपटायचे आपल्याला हवे ते मिळत नाही तो पर्यंत हे चालू राहायचे.पण त्याच वेळी आईवडिलांची अवस्था काय होत असणार हे त्यांना समजत नसायचे.पैसे असेल तर हवे ते घेता येत असे नाही तर अजून मार मिळत असे .तसाच आपल्या रडणाऱ्या मुलाला घेवून मनातून दुखी होत ते जायचे.

ठिकाण कोणते असो ,परस्थिती कोणती असो .मुलांची मानसिकता सारखी असते हेच खरे .आपल्याला जे हवे ते मिळत नसेल तर असे काहीकरा बाकी लोकांचे लक्ष जाईन आणि आई बाबा आपल्याला हवे ते घेतील हा त्यांचा हिशोब असतो .

असे करताना सहज आपल्या आईबाबांना मुलाला काही वळण नाही लावले का असे बोलून जातात या गोष्टीचे त्या निरागस मुलांना जाणीव नसते .


चार लोकात कोणी नाव ठेवू नाही म्हणून आईबाबा हवे ते मुलांना घेवून देतात.मग मुले बरोबर लक्षात ठेवतात .आपण माणसांत असे वागले कि आपल्याला हवे ते मिळते .मग ते श्रीमंत असतील नाही तर गरीब ,मग तो गावचा बाजार असेल नाहीतर विमानतळ नाही का? 

असेचमनातले काही

मिस यु सो मच.

मिस यु सो मच.
.दिवसभर त्याचा एक पण मेसेज नाही बघून तिनी त्याला मेसेज पाठवला .s2u त्याचा रिप्लाय .तिला यावर काही बोलावे वाटलेच नाही .खरे तर तिला यावर वेगळे काही ऐकायचे होते .पण तो काही बोलतच नाही .मग तिनी आता चुपच बसू असे ठरवले .पण यावर तो काही बोलला नाही .तिला त्याचा काही थांगपत्ता लागत नाही .गेले अनेक वर्ष तो तिला ओळखत होता.त्याचे वागणे त्याचे बोलणे यावरून तिला नेहमी वाटायचे कि त्याला ती आवडते .तसा तो बिनधास्त वोलयचा त्याच्या आयुष्यात असणाऱ्या त्याच्या मैत्रिणी ,असलेली त्याची मैत्री आणि त्याची त्याला सोडून गेलेल्या मैत्रिणी बद्दल तिला सगळे सांगत असायचा .तरी तिला कुठे तरी वाटत राहायचे .त्याला ती आवडत असावी तो कधी बोललाच नाही .पण तिला जाणवत राहायचे .त्याला भेटली तरी तिला तो समजायचं नाही .


तो बोलत नाही तर आपणच बोलू या असा विचार करून ती त्याला भेटायला जाते .तिला असे अचानक बघून तो खुष होतो .तसे तिला ़सांगतो बस त्यानंतर तिला तो कळतच नाही .तिला वाटते त्याला ओरडून विचारावे तुला नक्की .काय वाटते पण ती काही बोलत नाही .त्याच्या नजरेत ती प्रेम शोधत राहते पण तिला ते जाणवत नाही आणि दिसत हि नाही .त्याच्या आयुष्यात आपली जागा काय असा प्रश्न तिला पडतो .कारण त्याच्या भोवताली असणारा त्याच्या मित्र मैत्रिणीचा घोळका नाही तर चालू असणारे त्याचे फोन .तिला प्रश्न पडतो आपण का आलो याला भेटायला .ज्या उत्साहाने ती त्याला भेटायला आली होती आता तो मावळतो .ती काही झालेच नाही असे दाखवते  '



.त्याला भेटून आल्यावर विचार करत राहते .तो मेसेज करेल खूप भरभरून बोलेन .तिला ऐकायचे असते .तिला अचानक बघून त्याला काय वाटले .? ती त्याच्या जवळ बसली तर त्याला नेमके काय वाटले .ती गेली तर त्याने खूप मिस केले .तिचा बरोबर खूप बोलायचे राहून गेले .असे प्रेमाचे खूप काय काय बोलेन असे तिला वाटत राहते .पण तसे काही होत नाही .ती आली गेली .त्याला काही फरक नाही पडत म्हणजे त्याच्या आयुष्यात तिला काही जागा नाही .हे तिच्या लक्षात येते .ती मनाशी ठरवते आता त्याचा विचार कधी करायचा नाही .स्वतःच्या कामात त्याला विसरण्याचा प्रयत्न करते .काही दिवस जातात .एक रविवारी अचानक सकाळी सकाळी बेल वाजते .दार तीच उघडते .समोर त्याच्या आई बाबा बरोबर तो उभा असतो ती अवाक होऊन बघते ."काय होणाऱ्या सुनबाई ,घरात तरी बोलवणार का नाही ".ती एकदम भानावर येऊन त्याच्या कडे बघते तो मिश्किल पणे गालात हसत असतो .(काल्पनिक )

स्वकौतुक .

काही लोक स्वता बद्दल खूप बोलतात .अर्थात ते बोलतात ते खरे असेल त्यांनी समाजासाठी मोठे काम केले असेल तर कोणी त्यांचे बोलणे मन लावून ऐकतात .कारण त्यांच्या कडून खूप काही असते शिकायला .पण याउलट काही लोक काही नसताना किवा आपण काही विचारले नाही तरी स्वता बद्दल सांगत असतात .

असे लोक कुठे भेटतात .अगदी बस मध्ये एखाद्या रांगेत .मला नेहमी प्रश्न पडतो का असे करतात हे लोक .

माझे मते माणसांची खरी संपत्ती त्याचे ज्ञान आणि त्याची मुले हि असतात .तुमच्या कडे मोठे घर आहे .अनेक गाड्या आहे .सगळ्या सुख सुविधा आहे .पण त्या तुम्ही कधी बरोबर घेवून नाही फिरू शकत .पण ज्ञान अशी गोष्ट नेहमी तुमच्या बरोबर राहते .अर्थात याबद्दल देखील काही लोकांना खूप अहंकार असतो .न विचारता ते किती शिकले .काय जॉब करतात .त्यांना पगार किती .हे सांगत असतात .

काही दिवसा पूर्वी एक हॉस्पिटल; मध्ये आलेला अनुभव ,अर्थात हॉस्पिटल सरकारी आयुर्वेदिक,बाहेरच्या पेक्षा येथे खूप कमी ,फक्त २५% फी घेतली जाते अर्थात सरकारी म्हणजे काही अडचणी असतात तश्या येथे आहे .पण येथे एक महिला अडमीट होती .अगदी पहिल्या दिवसापासून .जेवण बरोबर नाही चहा बरोबर नाही .आम्ही असे नोकरांना पण नाही देत .अर्थात त्या जेवणा बद्दल बाकी लोकांना काही प्रोब्लेम नव्हता .कारण हॉस्पिटलचे जेवण चमचमीत कसे असणार असे त्यांचे मत होते आणि ते बरोबर होते
.
हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या महिला बरोबर ती बाई सकाळी सकाळी भांडत होती मला येथे नाही राहायचे मला मला डिस्चार्ज द्या कारण पंचकर्म विभाग तिच्या वार्ड पासून लांब आहे .तिला खूप चालावे लागते ."आमच्या घरी फोर व्हीलर आहे .दारात गाड्या उभ्या असतात ."चालण्याची सवय नाही .हे बोलून झाल्यावर ती थोड्या वेळाने बोलली ."उगाच बाहेर दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये परवडत नाही म्हणून येथे आलो " हॉस्पिटल मधील महिला कर्मचारी हिने माझ्याकडे बघितले .तिच्या नजरेत प्रश्न होता .दारात गाड्या आहे .मग हिला 
दुसरीकडे परवडत नाही .नेमके काय खरे .
हे एक उदाहरण आहे .का बोलतात लोक हे ,त्यांच्या कडे किती असेल ते आपल्या काही उपयोगाचे असते का ?
ज्यांचे मुले निर्व्यसनी ,आईवडिलांचा आदर करणारी असतात .त्यांचे नाव मोठे करणारी असतात .ती खरी कमाई.नाही तर तुमच्या कडे अनेक गाड्या अनेक बंगले आहे .मुले व्यसनी आहे .रोज घरात तमाशा करतात .आईवडिलांना त्रास देतात .तर काही कमवले नाही असे समजायला काय हरकत असते .
ज्ञानच गर्व नक्की असावा .पण तेव्हा त्या ज्ञाना मुळे तुम्ही कोणाच्या उपयोगी पडत असाल तर .कौतुक नक्की करावे .पण आपण आपले नाही तर समाजाने आपले ........
असेच मनातले काही .