रविवारी पुण्यावरून ट्रेन ने येत होते .महिलांचा डबा .गर्दी होती बसायला जागा नव्हती .एक घाणेरडे कळकट मळकट कपडे घातलेली वीस बावीस वर्षाची मुलगी दरवाजा समोर झोपली होती तिचा बाजूला छोटी मुलगी होती तिला बघून ती एक दीड वर्षाची असावी असे वाटत होते .गर्दी मुळे सगळ्या बायका तिला ओरडत होते येथे उभे राहिला जागा नाही आणि हि काय झोपली .पण तिने सगळ्यांचा बोलण्या कडे साफ दुर्लक्ष केले .तशीच झोपून राहिली .दरवाजात साधारणता पंचवीस वर्षाचा एक मुलगा बसला होता .तो तिचा नवरा होता .कर्जत गेले आणिती उठूनबसली .किती दिवसाची अंघोळ केली नाही असे वाटत होते .तिचा कडे नीट बघितले तेव्हा मला समजले तिला कावीळ झाली होती .तिला विचारले कुठे गेली होती .बोलली काविळीचे औषध टाकायला .दोन महिन्या पासून तिला कावीळ आहे .त्या छोट्या मुलीला पण कावीळ झाली होती .खूप अशक्त पणा आहे म्हणून झोपले होते बोलली
.कुठे तरी मुलुंड मध्ये गजरे विकते बोलली .राहायला कल्याण मध्ये कुठे तरी फूटपाथ वर राहते .कुठे पाणी पिणे अस्वच्छता या मुळे तिला कावीळ झाली असणार .तिला बोलले या मुलीला तुझा मुळे कावीळ झाली का .तर बोलली हि तीन वर्षाची आहे .हिचा नंतर एक मुलगा होता .छान होता .तिचा भाषेत टकाटक होता अचानक मेला .किती थंड पणे ती सांगत होती .ऐकून अंगावर काटा आला .आपले मुलं गेले .जसे ते जाणार होते असेच काही तिचे बोलणे .रस्त्यावर राहणारे म्हणून आपण त्याच्या कडे तुच्छातेने बघतो .पण आई हि तर आई असते ना ? ती मग बंगल्याील असो कि रस्त्यावरील .दुःख तर सारखेच ना .पण कशाचा बाऊ नाही कि रडारड नाही .हे असेच असते आणि होत राहणार हे त्यांनी स्वीकारेल असते का ? दोन बाळंतपण सहन केलेली ती मुलगी .फक्त आज म्हणून जगते का ? करणं त्यांना आपल्या मुलांची काळजी वाटत नसते का ? आपला धड ठिकाणा नाही मग आपण जन्म देतो त्या मुलांचे काय .असे त्यांना वाटत नाही का ?
दादर फुल मार्केट बाहेर असाच कमी वयाच्या मुली हार गजरे विकत असतात .उगाच मनात येते किती तफावत आहे समाजात .एक वर्ग आहे जो फक्त करियर चा विचार करून लग्न लवकर करत नाही .किंवा एक मुल बस महागाई आहे त्यांना चांगले भविष्य देऊ शकू का हा विचार करणारे .आणि हा एक वर्ग लवकर लग्न लवकर मुले .पुढे काय विचार नाही .कधी संपेल हि दरी .
असेच मनातले काही
.कुठे तरी मुलुंड मध्ये गजरे विकते बोलली .राहायला कल्याण मध्ये कुठे तरी फूटपाथ वर राहते .कुठे पाणी पिणे अस्वच्छता या मुळे तिला कावीळ झाली असणार .तिला बोलले या मुलीला तुझा मुळे कावीळ झाली का .तर बोलली हि तीन वर्षाची आहे .हिचा नंतर एक मुलगा होता .छान होता .तिचा भाषेत टकाटक होता अचानक मेला .किती थंड पणे ती सांगत होती .ऐकून अंगावर काटा आला .आपले मुलं गेले .जसे ते जाणार होते असेच काही तिचे बोलणे .रस्त्यावर राहणारे म्हणून आपण त्याच्या कडे तुच्छातेने बघतो .पण आई हि तर आई असते ना ? ती मग बंगल्याील असो कि रस्त्यावरील .दुःख तर सारखेच ना .पण कशाचा बाऊ नाही कि रडारड नाही .हे असेच असते आणि होत राहणार हे त्यांनी स्वीकारेल असते का ? दोन बाळंतपण सहन केलेली ती मुलगी .फक्त आज म्हणून जगते का ? करणं त्यांना आपल्या मुलांची काळजी वाटत नसते का ? आपला धड ठिकाणा नाही मग आपण जन्म देतो त्या मुलांचे काय .असे त्यांना वाटत नाही का ?
दादर फुल मार्केट बाहेर असाच कमी वयाच्या मुली हार गजरे विकत असतात .उगाच मनात येते किती तफावत आहे समाजात .एक वर्ग आहे जो फक्त करियर चा विचार करून लग्न लवकर करत नाही .किंवा एक मुल बस महागाई आहे त्यांना चांगले भविष्य देऊ शकू का हा विचार करणारे .आणि हा एक वर्ग लवकर लग्न लवकर मुले .पुढे काय विचार नाही .कधी संपेल हि दरी .
असेच मनातले काही
