Wednesday, 29 April 2015

कोण बरोबर कोण चूक

                आज एक फेसबुक फ्रेंड  ganesh khankal यांची पोस्ट  ,आज मी जे लिहिणार ते अनेकांना आवडणार नाही माहिती आहे.पण मी  माझ्या नातेवाईक मध्ये आणि काही असेच स्वत: बघितलेले .एकदा कोर्ट  मध्ये गेले होते तेव्हा काही वकिल कडून देखील मिळालेली माहिती वरून हे लिहित आहे .अनेक लग्न आज पण जमवून केले जातात कधी  ओळखीचे असतात त्यांच्या मार्फत लग्न ठरतात ,काही लग्न खूप मोठी  होतात काही साधारण असतात .                           
            लग्न नंतर काही दिवस नवीन असतात सगळे ठीक  असते.जसजसे दिवस जातात एकमेकांचे स्वभाव समजतात.अनेकदा  आई वडिलांनी खूप काही केलेले असते मुला साठी अगदी कर्ज काढून  किवा जमीन विकून शिक्षण दिलेले असते.मुलाला त्याची जाणीव असते  त्याला घरासाठी खूप काही करण्याची इच्छा असते .परंतु लग्ना नंतर  भावी पत्नीला हे मान्य नसते.मग होते वादाला सुरवात घरातील लोका  बरोबर न जमणे.कुरुबुरी बरोबर संसार चालू असतो.अनेकदा मुली  सासरच्या लोका बरोबर जमवून घेत नाही.सासरच्या लोका पेक्षा  माहेरच्या लोकांना जास्त जवळ समजले जाते.नवर्याने पण तेच करावे  अशी तिची अपेक्षा असते.अनेकदा मुलाला दिसत असते .आपली बायको  चुकत आहे तर कधी आई वडील चुकत आहे तो कोणाची बाजू घेऊ शकत  नाही.बायकोची घेवी तर आईवडील नाराज आणि आईवडिलांची घ्यावी  तर बायको नाराज होते .अनेकदा आईवडील मुलाच्या सुखासाठी चूप  बसतात काही बोलत नाही मग सून कशी पण वागली तरी ,पण याचा परिणाम उलट होतो.बायको मग ब्लाक्मेल करायला सुरवात करते.घरात  वाटेल तो त्रास देणे सासू सासर्यांना वाटेल ते बोलणे घरात काम न  करणे.छोट्या छोट्या गोष्ठी वरून तमाशा करणे .न सांगता माहेरी निघून  जाणे.सासू जर वयस्कर असेल तिला काम होत नसेल तर असे मुद्दामवागणे.पदोपदी अपमान करणे.यावर जर नवरा आपला ऐकत नाही हे  बघून शेवटचा उपाय करतात.तमाशा करून माहेरी जायचे .तिकडे जावून खोटी पोलिस केस करायची सगळ्या घरादाराला अडकवायचे.हुंडा  मागतात छळ करतात.कायदे स्रीयाच्या बाजूने आहे त्यामुळे काही चूक  नसतानी पूर्ण घरदार यात भरडले जातात.चुका नसतानी मानहानी होते.                  
         याउलट जर मुले असतील तर मग मानसिक त्रास अलग  असतो.एक बाप म्हणून मुलाला आपल्या पासून दूर जाताने ते बघू शकत नाही.खोट्या केस टाकल्या जातात.सरळ घटस्पोट पण देत नाही.खावटी  मागितली जाते.ती खूप असते. लग्नाचा खर्च म्हणून खूप मोठी रक्कम  मागितली जाते अनेक जनी फक्त दुसरे लग्न करू नाही म्हणून केसअनेक वर्ष कोर्ट मध्ये चालू ठेवतात.मुलांना भेटू देत नाही.अस्या वेळी  अनेकदा त्या मुलाला सगळ्याचे ऐकायला लागते.याला बायको सांभाळता आली नाही.याची बायको अशी याची बायको तशी या सगळ्याचा  अनेकजणा वर परिणाम होतो,मग अनेक जन व्यसनाला जवळ  करतात.असे अनेक माझ्या जवळचे ;लोक मी बघितले आहे खूप ड्रिंक  करून स्वतच्या मुलांचे नाव घेऊन रडणारे,कारण नसतानी बायकांना जे त्रास देतात त्याना शिक्षा नक्की होयला पाहिजे.या बद्दल दुमत नाही.पण जर चूक नसेल तर अनेकदा पूर्ण घरदार त्रास सहन करते             
        बायकांच्या बाजूने अनेक कायदे आहे त्याचा काही ठराविक बायका चुकीचा वापर करतात. स्वता बरोबर दुसर्याला देखील त्रास करून घेतात
.     ganesh khankal  यांची पोस्ट खाली देत आहे जी खूप वास्तव आहे .
'ती आई होती म्हणूनी...!!!' 
सगळे कायदे तिच्या बाजूने होते.
आणी याची जाणीव तिलाही होतीच.
क्षणात पाच महिन्यांचं बाळ तिने उचललं 
आणी तरातरा चालू लागली.म्हणाली
,"आई,वडिलांपासून वेगळं राहायचं असेल तरच मागे या माझ्या!"
बाळात जीव अडकला होता त्याचा.काय करावं त्याला सुचेना.
कारण सगळे कायदे तिच्या बाजूने होते.

'ती आई होती म्हणूनी'.....

भूकंप

                 उद्या काय होणार हे माहित नसते.किती स्वप्न असतात माणसाची मी हे करेल मी ते करेल तेव्हा त्याच्या वर कुठे तरी नियती हसत असेल का ?तु किती विचार कर जे होणार ते मी करणार मी घडवणार असे म्हणत असेल 
का नियती ?

                आज भूकंप झाला नशीब दिवस होता ...एवढ्यात किती लोक मरण पावले हे सांगत येणार नाही .
या मधून जे लोक नशिबाने वाचले त्यांना आपण वाचलो म्हणून आनंद मानायाचा का आपले सगळे गेले म्हणून दु:ख करायचे .कारण जे गेले त्या पेक्षा मागे राहिले त्याचे दु:ख किती मोठे .या पेक्षा आपण पण या मध्ये गेलो का नाही असेच वाटणार.
जाणारे जातात पण मागे राहतात. ते मात्र अश्या घटनाच्या आठवणीने रोज मरतात .जे लोक फक्त अंगावरील कपड्यावर आज वाचली.त्यांना आपली माणसे गेले हे दु:ख आणि आता पुढे काय ?
सरकारी मदतीच्या घोषणा होतात पण ती वेळे वर मिळते का ?
{काही वर्षा पूर्वी लातूरला भूकंप झाला त्या मध्ये वचालेला एक तरुण भूकंप
नंतर तीन चार वर्षांनी भेटला होता .घरातील १७ माणसे भूकंप मध्ये गेले होते मोठे घरदार सगळे ,
हा शेतात होता म्हणून एकटाच वाचला होता .शेती भरपूर होती पण आता कोण साठी जगायचा ,म्हणून त्याने गाव सोडून
तो पायी फिरत प्रत्येक मंदिरात जात होता . देवाला एक प्रश्न विचारात होता आमचा दोष काय ?}
शेवटी निसर्ग पुढे कोणाचे काही चालत नाही.काही मिनिट होत्याचे नव्हते होते.

Thursday, 23 April 2015

"द लास्ट बुक "

"द लास्ट बुक " 
पुस्तक दिनाच्या निम्मिताने ......
गेले २१ वर्षा पासून मी मुंबई वरून गावी जातानि कधी कसारा ट्रेन नाही तर नाशिक रोड ट्रेन .
असाच प्रवास चालू आहे.कसारा दोन सव्वा दोन तासाचा प्रवास तर नाशिक हा साडे चार तासाचा प्रवास,या प्रवासात नेहमी बरोबर असते कोणते ना कोणते पुस्तक.मीच नाही तर काही वर्षा पूर्वी 
अनेक जण प्रवासात पुस्तके वाचतानी दिसत असायचे .
पण आता हे चित्र दुर्मिळ होत चालले आहे.आज काल सगळे ट्रेन मध्ये मोबाईल मध्ये बिझी असतात.नाही तर कानात ईयर फोन घालून बसलेले दिसतात.कोणाला कोणा कडे बघायला वेळ नसतो.लोकलच्या गर्दीत धक्के बुक्के खात पुस्तकात डोके घालून बसणारी हि मंडळी गेली कुठे असा प्रशन पडतो.
आता शब्द कोडे सोडवणारे दिसत नाही.आता दिसतात गेम खेळणारे,पेपर वाचणारे दिसत नाही.आता पेपर पण नेटवर असतात.मागे नेटवर एक फोटो प्रदर्शनाची जाहिरात बघितली होती.त्यावर एक पेपर मध्ये पण वाचले होते.ते प्रदर्शन होते "द लास्ट बुक "या छायाचित्राचे,
रेनीअर गेरीत्सन या छायाचित्रकाराने ते भरवले होते.आजच्या स्मार्ट फोन च्या जमान्यात छापील
पुस्तके जास्त टिकतील का नाही असा प्रश्न त्यांना पडला. त्या साठी जवळ जवळ तीन वर्ष त्याने
दिवसातील ठराविक वेळेत त्याने मेट्रो ,रेल्वे सब वे रेल्वे स्टेशन्स येथे त्याने जी वाचकांची पुस्तके वाचत असतानी फोटो काढले.नशिबाने त्याला असे वाचक भेटले.काही काळाने भेटतील का नाही माहिती नाही
.२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आणि जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही! पुस्तका सारखा दुसरा मित्र नाही.
वाचाल तर वाचाल आधी पुस्तक वेडे होते आता मोबाईल वेडे आहेत.

फोटो -गुगल सर्च 

Tuesday, 21 April 2015

अक्षय्य तृतीया

आज अक्षय तुतीया .
अक्षय्य तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.
या दिवसी कोणते शुभ काम सुरु केले जाते.पण आज काल हा दिवस म्हणजे फक्त सोने 
खरेदीचा दिवस समजला जाते .कोणत्या बातम्याच्या chanal वर बघा ,तेच दाखवतात .
माझे नॉन मराठी शेजारी मला विचारतात "सोना खरीदने का दिन कब है !"
पण आमच्या लहान पणी गावा कडे मात्र असे काही नव्हते .आपले पूर्वज गेलेले असतील
त्यांची आठवण म्हणून छोटी मातीची घागर विकत घेतेली जात असे .त्यावर छोटे मडके असायचे
याला गावाकडे केळी आणि करा असे बोलतात .या दिवसी फक्त लाल मातीची घागर घेतेली जात असे ,का ते नाही माहिती नाही {,मी कधी पण काळ्या रंगाची केळी {घागर } नाही बघितली .मोठे माठ मात्र काळे असतात} .त्यात पाणी भरून ठेवतात .
काही तरी गोड बनवले जात असे ,नैवद्य म्हणून .खरे तर शेतातील सगळे काम संपलेले असे .अश्या वेळी येणारा हा सन आहे .त्या मुळे खूप लग्न असतात या दिवसी कुठे कुठे जाणार असे होऊन जात असायचे .उन्हातून आले कि मग या घागरीतील पाणी पिले जात असे .मातीचा वास आणि थंड पाणी एक वेगळी चव असत असे .
अजून एक काम केले जात असे या दिवसी ते म्हणजे झाडे लावणे ,किवा वेलीचे बी टाकणे .
मग त्यात भोपळ्या पासून .कारल्या पर्यंत सगळे बी असे .या दिवसी लावलेल्या वेलीला खूप .डांगर म्हणजे लाल भोपळे असो नाही तरी दोडका नाही तर घोसाळी खूप येत असत .
हा अनुभव मी खूप घेतला आहे .
आजच्या दिवसा नंतर प्रत्येक घरी करा आणि केळी दिसत असे .अगदी शेतात घेऊन जाण्यासाठी सुद्धा ......
गावाकडच्या आठवणी .

Monday, 20 April 2015

मर्यादा


मनात विचारचे काहूर असेल तर समुद्र किनारी जाऊन बसावे...

खूप काही विचार येतात सागरला बघून .
.
जर सागरला भरती असेल किवा सागर खवळलेला असेल तर
खूप जोराने मोठ्या मोठ्या लाटा वेगाने किनाऱ्या कडे येतात 
आणि परत जातात.....असे वाटते सागर किती खवळलेला असला तरी 
त्याला किनाऱ्याची मार्यदा आहे....
.पण जेव्हा हि मार्यदा ओलडली जाते तेव्हा जे होते त्याला प्रलय किवा 
सुनामी म्हटले जाते हवाहावसा सागर मग भयानक वाटतो

माणसाच्या मनाचे थोडे असेच असते ना ? 
त्यांना पण जगतानी समाज रुपी मर्यादांचा किनारा असतो .
आणि जेव्हा त्याचे उल्घन होते तेव्हा त्या व्यक्तीला खुनी ,पशु 
स्वैराचारी आणि अनेक नावाने बदनाम व्हावे लागते .

कारण

सकाळी सकाळी मोबाईल वर संदेशचा मेसेज आला .
सागर  "इज नो मोर "
काही समजण्या आधी मोबाईल कधी हातातून पडला समजले पण नाही .
आई आवाज ऐकून माझ्या खोलीत आली .
काय झाले ?
मला तर काय  बोलावे समजत नव्हते .
आई ! सागर गेला .
काय कसा ?काय झाले त्याला ?
आईचा पण विस्वास बसत नव्हता .
आई सागरने आत्महत्या केली .त्यांनी घरात गळफास घेतला .
का केले त्याने असे ? प्रश्न आणि फक्त प्रश्न .
मी भरभर कपडे केले आणि निघालो .
सागरच्या घरा समोर खूप गर्दी होती .
सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता .सागर आणि आत्महत्या 
काय झाले असेल का केली असेल हाच प्रश्न .
सागर आमच्या गावातील हुशार मुलगा होता .लहानपणीच वडिलांचे 
छत्र हरवलेला .आईनेच त्याला वाढवले .आई त्याच्या साठी सगळे काही होती .
गावात एक छोटे घर आणि शेती होती .परंतु सागर खूप हुशार होता .
सगळ्यांना मदत करणारा ,शिक्षकांचा आणि सगळ्या मुलांचा तो आवडता होता .नावा प्रमाणे विशाल मनाचा होता .कधी कोणाशी भाडंण  नाही .वाद नाही .दहावीला पूर्ण जिल्ह्यात प्रथम आला होता .शिष्यवृत्ती भेटली आणि इंजिनियर झाला .सरकारी बांधकाम खात्यात नोकरी भेटली .
स्वताच्या गावात बदली करून घेतली .गावात पाण्याची कायम व्यवस्था 
व्हावी म्हणून गावातील नदीवर धरणाचे काम चालू केले होते आणि  ते पूर्ण झाले होते त्याला अजून महिना पण झाला नव्हता .सगळा गाव खुश होता सागर वर .
तीस वर्षाचा झाला तरी तो लग्नाचे नाव घेत नव्हता .आमच्या सगळ्या 
मित्रांचे लग्न झाले होते .नोकरी होती छान घर बांधले होते .मग सागर का 
लग्न टाळत होता.हे  कधी आम्हा मित्रांना पण समजले नाही .त्याचे कोणावर प्रेम देखील नव्हते .अनेक मुलींनी त्याच्या बरोबर मैत्री करायचा 
प्रयत्न केला होता .पण  त्याने फक्त मैत्री ठेवली होती .तो नेहमी खुश राहणारा सागर असे काही करेल कोणाला पटत नव्हते .
सागर गेला खूप प्रश्न सोडून ,त्याचे उत्तर कोणा कडे नव्हते .त्यांनी 
आत्महत्या करतांनी जी चिट्ठी लिहिली होती त्यात लिहिले होते .
"आई मला माफ कर तुला सोडून जातो आहे .पुन्हा पुन्हा तुझ्या पोटी जन्म घ्यायला आवडेल मला ,या जन्मात आपली एवढीच साथ "
माझ्या मृत्यूस कोणास जबाबदार धरू नाही .
काही कारण नाही काही नाही .सागरच्या आत्महत्याचे कारण त्याच्या बरोबरच गेले .
या गोष्टीला पाच वर्ष होऊन गेले आहे .आम्ही मित्र गाव वाले त्याच्या आईला होईल तेवढी मदत करत असतो .
आज त्याच्या आईचा फोन आला .घरी येऊन जा .
रात्री त्यांच्या घरी गेलो .काय काम असावे हा विचार करतच .
फक्त मी नाही तर सागरचे आम्ही सगळे मित्र आले होते .
सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न होता .सागरच्या आईने का बोलावले असेल ?
शांतता होती खूप ....
सागरची आई आली .
तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना ?
मी का बोलवले सगळ्यांना .
गेले पाच वर्ष मला आणि  सगळ्यांना प्रश्न पडला होता ना ?
सागरने आत्महत्या का केली .का तो सोडून गेला सगळ्यांना याचे उत्तर भेटले आहे .
काय ?आम्ही सगळे एकदम बोललो .
आज मी सागरचे काही पुस्तके कोणाला तरी देऊन टाकावे म्हणून बघत होते .त्याचे पुस्तके बघतानी मी काही अशी पुस्तके बघितले जी त्याचा कामाची नव्हती .ती सगळे पुस्तके संधिवात वरील होती .संधिवाता मधील एक प्रकार आमवात जो कोणत्या वयात होतो .आपला मुलगा हे का वाचत असावा असे मनात आले .म्हणून मी ती पुस्तके चालत असतानी मला त्यात काही पेपर भेटले .ज्यावर सागरने काही लिहिले होते .
१० तारीख माझी परीक्षा संपणार म्हणून मी खुश होतो .दोन दिवस येथे 
राहायचे आणि गावाला जायचे .पण संध्याकाळी माझे पाय सुजले असेल असेच म्हणून मी लक्ष नाही दिले .सकाळी थंड पाण्याने अंघोळ केली .
त्यानंतर मला थोडा ताप आला असे वाटले झोपून राहिलो .पण आता माझे पाय जास्त दुखत होते .पाया बरोबर हाताना पण सूज आली होती .
उठणे मुश्कील झाले .मित्रांनी मला हॉस्पिटल मध्ये नेले .सगळ्या तपासण्या झाल्या .आणि निदान झाले संधिवाताचे ,विस्वास बसत नव्हता या वयात हा त्रास कसा ?
डॉक्टरांनी सांगितले हा एक अलग प्रकारचा त्रास आहे तो कोणत्या पण वयात होतो .त्या वेळी त्याची तीव्रता समजली नाही .
नोकरी लागली एक स्वप्न होते आपल्या गावी जायचे गावा साठी काही करायचे .गावी आलो मनात होते ते स्वप्न पूर्ण केले .पण हे करत असतानी होणारा त्रास कधी कोणाला समजू दिला नाही .खूप त्रास होत असे .रोज वेदना शामक गोळ्या घेऊन पण त्रास कमी नाही झाला तर शेहारात कामाचे निम्मित करून जायचो आणि strong इंजेक्शन घेऊन येत असे .असे करणे बरोबर नाही हे डॉक्टर सांगत असायचे .पण मला माझे दुख आईला दिसू द्यायचे नव्हते .तिला वाटत असे मी लग्न करावे .पण मला हे पटत नव्हते .
आज धरणाचे काम पूर्ण झाले .छोटे का असेन पण गावाची पाण्याची सोय झाली .सगळे गाव खुश आहे .एवढे दिवस कामा मुळे आपले दुखणे वाढले ह लक्षात पण नाही आले .गोळ्या पण नाही घेतल्या .आज उठवत पण नाही आहे .
आज मन खूप उदास आहे .सागर दिसतो छान हुशार आहे छान नोकरी आहे .पण फक्त दिसयला आता मध्ये सगळे कमजोर ,जसे घराच्या भिंती 
वरतून अगदी व्यवस्थित दिसत आहे पण आता पोखरल्या आहे .वाळवी लागली आहे .काय उपयोग अस्या जगण्याचा .......
सागरच्या आईने त्या पेपरवरील सागरचे मनातील विचार वाचून दाखवले .ते वाचता असतानी सागरच्या आई बरोबर सगळे रडत होते .
आज सगळ्यांना समजले होते सागरने का आत्महत्या केली .
पण त्यांनी बोलायला हवे होते .सगळ्या गोष्टीवर उपाय असतात ना ?
पण आता या जर तर चा काही उपयोग नव्हता ................





Sunday, 19 April 2015

चूल

         गेले दोन तीन दिवसा पासून अनेकांनी चुलीचे चित्र आणि चुली वरील काही कविता आणि पोस्ट टाकल्या आहे .त्या पोस्त बघितल्या आणिमन भूतकाळा बरोबर गावाला जाऊन पोचले .माझे सगळे बालपण खेड्यात गेले .आजच्या सारखे तेव्हा gas घरोघरी आले नव्हते .खेडे जास्त करून शेतकरी वर्ग जास्त प्रमाणात होता .प्रत्येक घरी गाई गुरे असत त्यामुळे शेणाच्या गोवऱ्या लावल्या जात .आणि त्याचा जळणासाठी उपयोग होत असे .शेतात असलेली काटेरी झाडे देखील जळणासाठी वापरत .ज्यांच्या कडे गाईगुरे नसत ते लोक लाकडाच्या वखारी असत .तिथून लाकडे घेत.सकाळ संध्याकाळ प्रत्येक घरात चूल पेटवली जात असे .चुलीतील धूर हा प्रत्येक घरातून बाहेर पडतानी दिसत असे .चुलीवर स्वयपाक करणे खरच कौशल्याचे काम होते एकाच वेळी चुलीतील जाळ कमी जास्त करणे .चटका बसू न देता काम करत राहणे ,          खरच धन्य होत्या
आधीच्या बायका .पावसाळा असेल तर लाकडे पेटत नाही .मग फक्त धूर आणि धूर होतो .आज फेसबुक फोटो टाकणे किती सोपे वाटते ना ,पण खूप अवघड असते .त्या जाळा समोर बसून ताप सहन करत धूर सहन करत काम करणे .आज मात्र परस्थिती खूप बदलली आहे ना ?
आज खेड्यात काही प्रमाणात gas चा वापर केला जातो .
ज्या मुले अचानक कोणी आले तर कमीत कमी चहापाणी लवकर करता येतो .नाही तर भर उन्हात किवा दुपारच्या वेळी परत चूल पेटवणे नको वाटत असे .आज धुराने भरलेले घर नाही .काळ्या भिंती नाही .आणि ती चूल पण नाही .जशी घरात आई नसेल तर ते घर वाटत नाही तसे छान अगण सरावलेले आहे .छान घर आहे त्यात चूल नाही तर ते घर वाटत नाही .
       घरात आई नाही दिसली कि कसे ओकेबोके वाटते ,
तसे मला आज खेड्या गावात गेले आणि त्या घरात चूल नाही
दिसली का वाटते हे घर नाही .आज खूप सुधारणा झाल्या सुंदर किचन झाले तरी मनात कुठे तरी कोपर्यात पेटलेली ती चूल आठवत राहते .आई सारखी मायने सगळ्याचे पोट भरणारी .कारण चूल आहे आणि तिचा जवळ आई हि असतेच असते .जी आपली वाटत असे .आज gas आहे आई असेलच असे नाही .त्या एवजी बाई असते .म्हणून आईच्या जेवणाची आठवण येतेच येते ,आणि आम्ही म्हणतो चुलीवरील जेवणाला चव होती .खरी चव कशाला होती आईच्या मायाने बनवाल्य्ल्या त्या
चुलीवरील जेवणाला .कारण दोघीच्चे पक्के नाते होते .घरभर न दिसणारी आई चुली जवळ हमखास दिसत असे .तिची हक्काची जाग होती ना ती ?
!!आशा !!
२४ मार्च १५
फोटो सौजन्य गुगल

Thursday, 16 April 2015

कुरडया


फडणवीस सरकारचा महिलांनाही दिलासा...अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या कुरडया, पापड्यांचे..
पंचनामे करण्याचे आदेश. .
अश्या पोस्ट तुम्ही खूप बघितल्या असतील ना .पण खरच विचार केला तर खूप नुकसान होते .ते नुकसान सामानाचे होते आणि त्या बरोबर मेहनतीचे देखील ,
कुरड्या ...{घाट घालणे }
आपल्या कडे नेहमी सणाच्या दिवसी हा पदार्थ हमखास ताटात असतोच असतो .पण त्या करायला खूप मेहनत असते .एक व्यक्तीचे ते काम नसते .म्हणून उन्हाळ्या मध्ये शेजारणी जमा होतात आणि सगळ्या मिळून करतात .खरे तर आता खूप सोपे झाले पहिल्या पेक्षा ....आधीच्या काळी गहू भिजत घालणे तीन दिवसांनी ते ओले गहू वाटायचे यंत्र असे त्या साठी तीन चार जनी हव्या असत .एकाने गहू टाकणे एकाने फिरवणे आणि एक व्यक्ती ते वाटलेले गहू पाण्यात टाकणे .पण आज मोठे यंत्र आलेत 
घरी गहू दळण्याचा त्रास संपला .तरी वाटलेले गहू पाण्यात टाकूनत्यातील कोंडा 
अलग करणे हे एक मोठे काम .पाणी आणि चीक एकत्र परत भरून ठेवणे .दुसर्या दिवशी बरोबर पाणी काढून टाकणे चीक खाली राहिला त्याचा घाट घेणे .म्हणजे चीक शिजवणे.घाट घेणे हि एक कला आहे .आज देखील खेड्यात एकाचवेळी १५ किलो पर्यंत घाट घेतला जातो .एकच दिवशी आणि तो घेतानी लागते ते कौशल्य .सगळ्यांना जमेल असे नाही .घाट घेऊन झाल्यावर होते सुरवात कुरड्या करण्याची .त्या साठी हव्या असतात खाटा त्यावर पसरले जातात गव्हाच्या कड्या आई त्यावर टाकल्या जातात कुरडया .शिजवलेला चीक हा करड्या करण्याच्या ज्याला गावा कडे सोर्या म्हणतात .{फोटो मध्ये आहे }त्यात घातला जातो आणि एक जन दाबणार एक व्यक्ती कुरड्या ताटावर काढणार आणि एक त्या खाटावर नेऊन टाकणार अस्या कमीत कमी चार बायका या साठी हव्या असतात .म्हणून तर याला घाट घालणे म्हणतात ..आणि हे सगळे करून जर अचानक पावसाचे वातावरण झाले तर जीव खालीवर होतो .करड्या जर ओल्या असतील आणि पाउस आला

तर सगळी मेहनत वाया जाते .

Wednesday, 15 April 2015

लेख





उबरठ्या बाहेर 
            आज दोन पोट निवडणुका झाल्या दोन्ही ठिकाणी ज्या महिला उमेदवार होत्या .त्या आपल्या पतीचे निधन झाले म्हणून त्या जागे वर उभ्या होत्या .दोन्हीचे पती असे होते ज्यांनी खरच लोका साठी कामे केल होते .यात काही शंका नाही .पण सुमन पाटील या नेहमी राजकारणा पासून दूर राहिल्या होत्या .आबा गृहमंत्री असून देखील त्या कधी कोणत्या कार्यक्रमात त्या दिसल्या नाही .नेहमी त्यांनी घर सांभाळून आबांना साथ दिली .आबाच्या अचानक जाण्या मुळे त्यांना राजकारणात यावेलागत आहे .त्यांना राजकारणात किती इंटरेस आहे .किवा त्यांच्या साठी हे सगळे किती अवघड असणार आहे हे त्यांनाच माहिती 
        पण यातून मला एक गोष्ट जाणवली ती लिहिण्याचा प्रयत्न करत आहे .
आज अनेक महिला या शिकलेल्या नोकरी करणाऱ्या आहे .पण त्या पेक्षा पण आज अनेक महिला या गृहिणी आहे .खेड्यात तर अनेक व्यवहार हे पुरुष करतात .बाहेर काय चालते घरातील महिलांना माहिती नसते .कोणाला पैसे दिले आहे कोणा
कडून येणे आहे .अनेक महिलांचे बँकेत खाते देखील नाही .जर नोकरी करणारा पुरुष असेल तर तो आपल्या बायकोला सगळी माहिती देतेच असे नाही .फंड किती आहे किवा पेन्शन ऑफिस कुठे आहे ,कुठे कुठे गुतंवणूक आहे हे त्या घरातील बाईला माहिती नसते .जर धंदा असेल तर नेमका तो कसा चालतो याची घरातील बाईला माहिती नसते .अनेकदा मग घरातील या कर्त्या माणसाचे अचानक जर निधन झाले तर ,त्याच्या घरातीलआई किवा बायको यांच्या वर संकट कोसळते .
      माझ्या निरीक्षणातून मी हे लिहिते आहे .आमच्या कडे एक व्यक्तीचे छोटे दुकान होते .त्यांनी प्रेमविवाह केला होता .त्या दोघाचा घरच्या लोका बरोबर जास्त संबंध नव्हता .तो कधी कधी घरी जात असे .जे दुकान होते ते भाड्याचे होते .आणि राहत असलेले घर छोटे पण मालकीचे होते तीन छोटी मुले होती .आणि त्या माणसाने अचानक आत्महत्या केली .त्याच्या घरचे आले सगळे सोपस्कार झाले .तिनी कुठे राहायचा हा प्रश्न शेवटी घर विकून तिनी गावी राहावे असे ठरले .पण जेव्हा घर विकण्याची वेळ आली तेव्हा समजले कि ते घर त्या महिलेच्या पतीने आधीच गहाण ठेवले होते .दुकान घेण्या साठी 
आणि तो व्यवहार फसला होता पैसे गेले होते आणि घर पण आणि याच मुळे त्याने आत्महत्या केली होती .
     आता पुढे काय ?
गावात सासऱ्याचे घर होते त्याचा एक कोपर्यात तिचा संसार सुरु झाला .शेती होती पण तिला काही येत नव्हते .कधी शेतात न गेलेली ती बाई जमत नसतानी शेतात कामाला जायला लागली .बाकीच्यांना पूर्ण रोज तेव्हा तिला अर्धे पैसे देऊन ती होईल तसे काम करत असे .आणि ते करत असतानी तिची ती फरफट बघवत नसे .शेत ती विकू शकत नव्हती ते सासऱ्याच्या नाव वर होते .मुले लहान कधी घर बाहेर न गेलेली ती बाईची जगण्याशी लढाई चालू झाली .
    हे एक उदहरण असे खूप आहेत .फक्त मला एक सांगावे वाटते .आम्ही घरात खूप सुखी आहे मला काही बघयला लागत 
नाही नवरा सगळे बघतो असे म्हणून बायकांनी कधी काही गोष्टी कडे दुर्लक्ष करू नाही .किवा तू बाई आहे असे म्हणून नवर्यानी पण मी सगळे घरात आणून देतो मग अजून काय हवे असे म्हणू नाही .जर व्यवसाय असेल तर त्याची सगळी माहिती आपल्या बायकोला असू द्या .कोणा कडून येणे आहे कोणाला देणे आहे ते नेहमी लिहिलेले असावे .नोकरी असेल तर कोणते ऑफिस कुठे आहे .कुठे गुंतवणूक आहे याची माहिती द्यावी .अचानक घर बाहेर पडणाऱ्या बाईला खूप अवघड असते .पण माहिती असेल तर ती आपल्या घर साठी खंभीर पणे उभी राहू शकते .तिला कोणाच्या मदतीची गरज नसते 
आणि त्या मुळे फसवणूक देखील होत नाही .शेत असेल तर त्याची माहिती कशी ठेवायची हे देखील माहिती करून घ्यावी .
हे जीवन आहे याचा काही भरवशा नाही .....
१५ एप्रिल १५ 
फोटो -गुगल सर्च 

Tuesday, 14 April 2015

एक नवीन सुरवात

एक नवीन सुरवात

          रोज रोज तेच तेच ....
खूप कंटाळा आला आहे तेच तेच पणाचा .
आयुष्यात एक निरसता आली आहे.अशा विचार करत  टी  घरात चक्करा भारत होती  त्यावेळी अचानक भिंती वरील आरशा मधील आपल्या प्रतिबिंबा कडे तिचे लक्ष गेले .आणि ती एकदम दचकली .काय एक वर्षात  काय अवस्था झाली  आपली ,  स्वताशीच ती बोलली .डोळ्या खाली काळे वर्तुळे  दिसायला  लागली  होती.किती दिवसापासून अति विचाराने  केस गळत होते .पण गेल्या वर्षात जे काही झाले होते .त्या मुळे तिला कशात रस राहिला नव्हता .कुठे जाणे येणे नाही ,कोणाशी बोलणे नाही स्वता मध्ये ती हरवून गेली होती .

एक आणि एकच विचार "का वागला हा माझ्याशी असे  "हे वाक्य ती एक वर्षात स्वताशी लाख वेळा तरी बोलली असेल .

तीन वर्षा आधी  त्याची एका सोशल नेटवर्किंग साईट वर ओळख झाली होती..एकमेकाला समजून घेता घेता ,एकमेकाच्या प्रेमात कधी पडले हे त्यांना पण समजले नव्हते .नोकरी निम्मिताने ती एकटी राहत होती एकमेकाशी बोलता बोलता एकमेकावर प्रेम करायला लागले .एक दिवस त्याने हिम्मत करून तिला सांगितले .ती वयाने मोठी होती  त्याच्या पेक्षा आणि जातीचा प्रश्न होताच ती त्याला नेहमी सांगत असे ,"आपण फ्रेंडच ठीक आहेत रे ."

पण शेवटी तीचे  तिलाच समजले नाही कधी त्याच्या प्रेमात पडली .एक दिवस तो तिला भेटायला आला .गणपती विसर्जन होते त्या दिवसी ,मिरवणुकीच्या गर्दीतून जातानि त्याने तिचा  हात पकडला आणि तिला वाटले आपल्यासाठी एक भक्कम आधार आहे हा .त्याचातील बिनधास्त पणा तिला खूप आवडून गेला .मग हे नेहमीचे झाले तो तिला भेटायला येत राहिला.ती स्वतला विसरून गेली तिचे जग म्हणजे तो झाला होते .रोज रोज मेसेज फोनवर बोलणे  चालू असायचे  ,दिवस कसे फुलपाखरा सारखे उडून जात होते .या सगळ्यात तिचा एक गोष्ट लक्षात आली नाही .त्याचा स्वभाव खूप संशयी होता .तिच्या ऑफिस मधील एक फ्रेंडचा वाढदिवस होता .सगळे ऑफिस सुटल्यावर थाबले होते .त्याच वेळी त्याचा मेसेज आला .तिच्या लक्षात आले नाही  .नंतर त्याने फोन पण केला .गोंधळात तिच्या लक्षात आले नाही .बस हे एक कारण झाले आणि तो चिडला खूप तिच्यावर ,नको नको ते बोलला तिला ,

तिच्या कानावर विस्वास बसत नव्हता  हा  तोच आहे का ?नंतर नेहमीच हे घडू लागले .दोघात वाद वाढत गेले .तिनी वाद नको म्हणून बोलणे सोडून दिले .त्याची आठवण मात्र खूप त्रास देत असे तिला  .मग ती फोन करी पण तो वेळ नाही नंतर बोलू असे बोलून तिला टाळत असे .याचा परिणाम ती आजारी पडली .हसणे बोलणे विसरली .

आपल्याला तो विसरून गेला ना  मग आपण पण जाऊ विसरून हा विचार करून मनातल्या मनात  ती रडत राहिली .

सवयीने ती रोजचे काम करत होती  .

एक दिवस तिला समजले त्याच्या आयुष्यात कोणी दुसरी आली आहे .जी त्याचा वयाची आहे आणि त्याच्या जातीची देखील .तिनी त्याला खूप दिवसाने मेसेज केला .त्याने  काही लपवले नाही .खरे बोलला .तिनी फक्त मला एकदा भेटशील का म्हणून त्याला रिक्वेस्ट केली .पण मी नाही येऊ शकत कामात बिझी आहे .तूच इकडे ये भेटू आपण असे तिला बोलला .एकदा बघू त्याला शेवटचे म्हणून तीने ठरवले त्याला भेटायला जायचे .
आठ दिवस आधी सागून देखील ती गेल्यावर तो तिला भेटला नाही .एक मेसेज पाठवला माफ कर काही कामा निम्मिता अर्जेंट जावे लागले .ती खूप दुखावली गेली .खूप काय काय बोलली त्याला .पण परत स्वतच्या बोलण्याचा पश्चाताप करत राहिली .

"प्रेम असावे लागते मनापासून ,ते जबरदस्तीने करायला लावता येत नाही ".याचा तिला अनुभव आला 

.नाही तर तुला कधी सोडून जाणार नाही असे बोलणारा तो असे बदलला असता का ?आरशात बघता बघता ती भानावर आली .उठली सरळ पार्लर मध्ये गेली .केस कापून घेतले बाजारात गेली .नवीन ड्रेस घेतले स्वतासाठी  .जे होऊन गेले ते गेले आता नवीन सुरवात करायची मना पासून ठरवून 
ती येणाऱ्या उद्या साठी ती तयार झाली ....

एक नवीन सुरवात करण्यासाठी ..............

घड्याळे





घड्याळे
              सकाळी उठल्या पासून तर झोपे पर्यंत फक्त घाई आणि घाई असते .सकाळ होते तीच मुळी घड्याळाच्या गजर मुळे .{आता मोबाईल अलार्म }आपोआप जाग येणारे खूप कमी नशीबवान आहेत आजच्या जमान्यात .याला अपवाद गावाकडील लोक आणि वयस्कर व्यक्ती आहेत .म्हणजे आपण आता बाहेर सूर्य उगवला आहे का ? बाहेर काळोख आहे कि उजेड हे बघायची गरज नसते ,दिवस सुरु होतो तोच मुळी घड्याळ बघून .घड्याळ आज सगळ्यांची गरज आहे .मग ते हातातील असेल नाही तर भिंतीवरील असेल .मोबाईल मुळे हातातील घड्याळा चे महत्व कमी  झाले असले तरी देखील आज घड्याळ एक फ्याशन म्हणून घातले जाते त्या मुळे मार्केट मध्ये एका पेक्षा एक सुंदर घड्याळे येत असतात .

            पण एक काळ होता जेव्हा रिकू आणि एच एम टी कंपनीचे घड्याळे बाजारात होती .अतिशय महाग असणारी हि घड्याळे मात्र खूप चालत असत .चावीची घड्याळे रोज सकाळी उठले कि अगोदर घड्याळाला चावी देऊन नंतर कामांना सुरवात होत असे .भिंतीवरील ठोक्याची घड्याळे तासातासाला एवढे वाजले हे सांगत असे ..आज सहज घेऊ शकणारे घड्याळे तेव्हा सगळ्यांना घेणे परवडत नव्हते .मला आठवते मी लहान असतानी लग्नात हुंड्याची मागणी करतांनी हातातील किवा भिंतीवरील घड्याळ सुधा मागितले जात असयाचे .परंतु गावाकडे सावल्या बघून आणि रात्री चंद्र तारे बघून आज देखील काही लोक

अचूक वेळ सांगतात .मी सुद्धा शाळेत असतानी अनेकदा घरच्या ओट्यावर कित सावली आली हे बघून शाळेत जात असे .ते पण अगदी अर्धा तास असो किवा एक तास अगदी वेळा पाठ झाल्या होत्या .१० विला गेलो तरी माझ्या सारख्या अनेका कडे तेव्हा घड्याळे नव्हती .पेपर लिहीतानी पण नाही .. मुंबई म्हटले कि फक्त आणि फक्त घड्याळ बस ,जे काही चालते ते सगळे घड्याळावर चालते .म्हणून तर म्हणतात ना


"मुंबई हि घड्याळाच्या काट्यावर फिरते ."

{आधीच्या कंपन्या खूप चांगली घड्याळे बनवत असत ,आणि ती अनेक वर्ष चालत हेच कारण असेल का त्या आज बंद पडल्या आहे .आजचा जमाना युज आणि थ्रो चा आहे नाही का ?}

Monday, 13 April 2015

बटाटे वेफर्स .

बटाटे वेफर्स .
सगळ्यात करायला सोपे .
मोठे मोठे बटाट्याचे चकत्या करून घेणे ,रातभर त्या तुरटीच्या 
पाण्यात घालून ठेवणे .
सकाळी पाण्याला उकळी आली का त्यात  मीठ टाकून 
शिजतील इतपत उकळून देणे नंतर चाळणीत काढून ठेवणे .
पाणी सगळे गेले कि उन्हात सुकवत ठेवणे .


.


साबुदाणा पापड .

साबुदाणा पापड .
उपवासाच्या पदार्थां मधील अजून एक पदार्थ .
कोणाला पण करता येईन असा सोपा प्रकार .
एक किलो साबुदाणा रात्री खिचडीला भिजवतो तसा रात्री  भिजवून
ठेवायचा ,{पाणी थोडे जास्त असू दयाचे }
सकाळी डबल पाणी घेऊन उकळी आले कि त्यात मीठ
टाकून साबुदाणा टाकणे आधी पातळ वाटेल पण
नंतर .घट्ट होईल ,नन्तर गरम असतानीच ,मोठ्या प्लास्टिकच्या
कागदावर चमच्याने छोटे छोटे पापड घालणे .
चांगले सुकले कि उलटे करणे .कडक सुके पर्यंत वाळवून देणे .
तळल्यावर छान दिसतात आणि छान लागतात देखील .






उपवासाचे बटाटा पापड .......

                                                           बटाटे पापड ................
                                       बेगमीच्या पदार्थां मधील अजून एक पदार्थ .
                                   उपवासासाठी खाल्ला जाणारा .
                                  साधारणता दोन किलो बटाटे आणि पाव किलो साबुदाणा
                                  १ चमचा लाल तिखट किवा दहा बारा हिरव्या मिरच्या .
                                   लाल तिखट आणि  मिरची किती तिखट आहे त्या नुसार घेणे .
                                   मीठ चावी नुसार टाकणे ,
                बटाटे जास्त उकडवून घेणे ,साबुदाणा रात्रीच भिजत  खिचडी  साठी भिजवतो तसा भिजवणे   उकडलेले बटाटे साले कडून चांगले कुस्करून घेणे .त्या मध्ये बटाट्याचेतुकडे राहता कामा नाही .कुसकरलेल्या  बटाट्या  मध्ये साबुदाणा आणि तिखट मीठ टाकूनसगळे एकत्र माळून घेणे .पुरी यंत्राच्या सहय्याने पापड  करणे .{पुरी यंत्रात करातांनी प्लास्टिकचे पेपर वापरणे म्हणजे पापडचिकटत नाही आणि ते सुकवायला टाकतानी सोयीचे होते .}याला बटाट्याच्या पापड्या असे देखील म्हणतात .

सांडगे {वडे }




               एप्रिल मे सुरु झाले कि सुरवात होते ती बेगामिचे पदर्थ करण्याची ...मुंबई सारख्या ठिकाणी जागेचा प्रश्न असतो .काही बनवले तर ते कुठे वाळवायचेहा प्रश्न असतो .पण खेड्यात आज देखील वर्षभर लागणारे पापड कुरड्या .लोणचे हेघरी बनवले जातात .त्यातच एक प्रकार असतो तो म्हणजे सांडगे .....नाशिक नगर भागात मुगाच्या डाळीचे सांडगे बनवले जातात .
तिकडे त्यांना वडे बोलतात .
            एकदम सकाळी सकाळी सालीची डाळ भिजत घातली जाते .तीन ते चारतासाने ती धुतली जाते .सगळे साले निघून गेली का मग काही वेळ ठेवून ती डाळ पाट्यावर वाटली जाते .त्यात जिरे लाल मिरची पावडरआणि लसूनवाटून टाकला जातो ..आज काल अशी ओळी डाळ वाटण्याची मशीन देखील आली आहे .डाळ वाटून झाली कि सुरवात होते ते सांडगे घालण्याची .मोठी लाकडी फळी किवा प्लास्टिकच्या मोठ्यापेपरवर सांडगे घातले जातात .हातात थोडे पीठ घेऊन छोटे छोटे वडे भरभर घातले जातात .सवयीने ते जमते .
         

चवीला अतिशय छान लागते हि भाजी ..काही ठिकाणी चना डाळीची देखील सांडगे घालतात .सांडगे {वडे } भाजी अशी करतात .सांडगे अगोदर मंद आचेवर भाजून घायचे ,लालसर झाले कि थोडे तेल टाकायचे
आणि बाजूला कडून ठेवायचे .तेलाची फोडणी करून त्यात कढी पत्ता.कोथांबीर 
आणि आवडीनुसार कांदा टाकायचा व त्यात भाजलेले वडे टाकायचे .मिरची पावडर ,हळद ,मीठ आणि शेगदाणे
पावडर टाकून आवश्यक तेवढे पाणी टाकायचे .भाजी सुकी आणि रसा असलेली दोन्ही करता येतेकांदा खोबर्याचे वाटण घालून देखील काळ्या मसाल्याची हि भाजी छान होते



 .
 .

Sunday, 12 April 2015

आजीच्या गोष्टी

             एक होता राजा ...
          आम्ही लहान असतानी आजच्या सारखे करमणुकीचे साधने नव्हते .रात्री झाली कि लवकर जेवणे करून लोक लवकर झोपत असत .
दिवस माळवल्यावर घरातील स्रिया स्वयपाक करत असत .तो पर्यंत घरातील आजी किवा आजोबा घरातील चिल्ल्या पिल्यांना जमा करत असत आणि गोष्टी सांगत असत .गोष्टी मध्ये अनेकदा "एक होता राजा ,अशी सुरवात असे .अनेक गोष्टी या पोथी पुराणातील असत .काही गोष्टी बालमनाला पटत पण नसे .पण गोष्ट सागण्याची पद्धत अतिशय छान असे मग त्यात गुगुन जायला होत असे .राजा त्याचा रथ ,त्याचा मोठा महल ,सुंदर राजकन्या याचे चित्र कल्पनेने मनावरकोरले जात असे .मग त्या कल्पनेमध्ये मन गुतून जात असे .नकळत आजी आपण नाही असे वागायचे किवा वाईट केले कि वाईट फळ भेटते .हे शिकवून जात असे नकळत मनावर संस्कार होत असे .आज खरच ना आजी आजोबा आहेत ना त्या गोष्टी .       -
      आजची मुले स्मार्ट झाली आहेत .त्यांना त्या गोष्टी पटत पण नाही .
करमणुकीचे साधने बदलले आहे दिवसातून त्यांच्या पुढे टीव्ही मुळे खूप काय काययेत असते .आजची मुले कल्पनेत रमत नाही .
परंतु तरी देखील आज छोटा भीम बघणारे मुले देखील जास्त आहे हे देखील खरे .लहानपणी आपण ऐकलेले "एक होता राजा "किवा "एक होता कावळ "किवाचाल रे भोपळ्या या टुणूक टुणूक अश्या गोष्टी ऐकताना ,म्हातारी भोपळ्या मध्येकशी बसली असेल असे प्रश्न तेव्हा बालमनाला पटत नसत .पण तेव्हा त्या ऐकयला
छान वाटत असत .हे मात्र खरे ........

पैसे म्हणजे सगळे असते का ?

         पैसे म्हणजे सगळे असते का ?
कदाचित हो जगायला पैसे आवश्यक असतात .
पण कोणाला मेहनत आणि नशीब म्हणून गरजे पेक्षा जास्त पैसे भेटतात.
 याचा अर्थ ज्यांना मिळत नाही म्हणून त्यांनी त्यांचा राग करावा का ?
जेव्हा जास्त पैसे भेटत तेव्हा नकळत गरजेच्या वस्तू पेक्षा चैनीच्या वस्तू घेतल्या 
 जातात .काही वस्तू वरवर जरी चैनीच्या वाटल्या तरी त्या नंतर गरजेच्या
 होतात .आपण मेहनत केली त्याचे फळ भेटले म्हणून खुश होणे स्वाभाविक आहे .

 पण जर ते सगळे नाते ,मैत्री टिकवून ठेवत असतील तरी ज्यांना गरजे पुरत्या भेटत 
 नाही तेव्हा त्यांनी ज्यांना भेटले त्यांना नावे ठेवणे योग्या आहे का?
पण अनेकदा असे होताना दिसते .चांगले मित्र ,जवळचे नातेवाईक .

जवळची माणसे नकळत दुरावली जातात .
 अश्या वेळी समजत नाही असे का होते।

मनातले प्रश्न

          मनात कधी कधी खूप प्रश्न येतात ना?
ज्याचे उत्तर आपल्याला मिळतातच असे नाही .
अनेकदा स्वतालाच प्रश्न पडतात या जन्मात मी एक मानव आहे .
या आधी मी कोण असेल .माझ्या बरोबर राहणारे माझे भाऊ .बहिण आधी कुठे होते .  
काय असते आपण या जन्मात एकमेकाचे नातेवाईक असतो .
एकमेका साठी खूप काही करतो आणि करत असतो 
.कधी कधी एकमेका मध्ये खूप प्रेम माया असते .त्या साठी मग आपण काहीही करतो .
आणि एकमेका बद्दल प्रेम जरी राहिले नाही तरी आपण कोणतेही
नात्याची बंधने झुगारु शकत नाही .नाविलाजाने आपण ते नाते निभावत असतो 
.पण एक दिवस शेवट असतो .तो म्हणजे मृत्यू.....मृत्यू म्हणजे सगळे संपते .
शरीर जाळून राख होऊन जाते .सगळे नाते संपतात .म्हणजे नाते असते ते शरीर बरोबर ,
काही काळा साठी एकत्र आलेले आपण .
या जीवना पुरता तो आपला संबंध.....

     म्हणजे नाते शरीरला असतात का ?
      शरीर संपले कि सगळे संपले
....

बांगड्या ......

बांगड्या ......
छान किणकिण वाजणाऱ्या अनेक रंगाच्या .....
नव वधूच्या हाताची शोभा वाढवणाऱ्या ....
सौभाग्य लेणे म्हणून आज पर्यंत त्यांच्या कडे बघितले जाते .
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये सुवासिनीचे एक लेणे .
मी लहान असतानी पासून नेहमी बघत आले आहे .खेड्यातील बायकांना हातातील बांगड्या जर फुटल्या आणि जर हातात एक पण बांगडी जर राहिली नाही तर त्या भुंड्या हाताने काही खात नसत .मग हाताला रुमाल किवा एखादा कपडा बांधत .
या मागे त्यांचे विचार पती निष्ठाशी निगडीत असे .पती जिवंत असतानी हातात बांगड्या आणि 
गळ्यात मंगळसूत्र असायला हवे तसे कसे काही खायचे नाही ..म्हणजे आपल्या पतीला काही होऊ नाही हि भावना असावी ,कारण पती निधना नंतर या गोष्टी म्हणजे कुकू पुसले जाते मंगळसूत्र काढले जाते आणि बांगड्या फोडल्या जातात .म्हणून असे करत असतील का ?त्या बायका ,आज देखील खेड्यात असे करतात बायका .
लग्न मध्ये आमच्या कडे बांगड्या भरणे हा एक कार्यक्रम असतो .मुलीला जसा लग्नाचा चुडा असतो .चूडा हा फक्त नवरी मुलीला असतो पण त्याच वेळी गावातील बागड्या भरणाऱ्या कासाराला {बांगड्या जे विकण्याचे आणि भरण्याचे काम करतात ते } घरी बोलावले जाते मग शेजारी आणि पाहुणे आलेल्या बायकांना मग बांगड्या भरण्याचे काम चाले .खरे तर काचेचा बांगड्या आज खूप महाग आहे .अनेकदा हातात खूप बांगड्या असून देखील त्या बायका आधीच्या बांगड्या फोडून नवीन भरतात .जर चुकण कोणी राहिले तर "एक काच तरी भरली का ?अशा नाराजीचा डायलॉग ऐकायला लागतो .
बांगड्या पण किती दोन दोन डझन पेक्षा कधी कधी जास्त असतात .मला नेहमी नवल वाटते एवढ्या बांगड्या घालून या बायका कसे काम करतात .त्यात काहीच्या बांगड्या कधीच फुटत नाही .तर काहीना अजिबात टिकत नाहीत .आज बांगड्या न घालण्याची फ्याशन आहे .परंतु जेव्हा एखादी मुलगी सासर वरून माहेरी येत असे तेव्हा तिचा हातात जर बांगड्या नसेल तर.काय माणसे आहेत पोरीच्या हातात एक काच सुद्धा नाही ...
म्हणजे तिला किती सासुरवास आहे असे समजले जाई .
आमच्या गावा कडे सगळ्या रंगाच्या बांगड्या घालतात पण मुंबईत मात्र फक्त हिरव्या
बांगड्या घातल्या जातात .
पण आज नवीन नवीन सुंदर बांगड्या बाजारात असतात .काचेच्या आणि मेटल च्या
सुद्धा ..सुंदर ड्रेस असो किवा साडी बांगड्या मुळे सौदर्यात अजून भर पडते .हे मात्र नक्की
किती नाही म्हटले तरी बाजारात गेल्यावर या बांगड्या आकर्षित करतातच .
असेच मनातले काही ....
३ एप्रिल १५