Tuesday, 23 August 2016

मनातील बोचरे शल्य


मनातील बोचरे शल्य

मनातील शल्य खूप आहेत ,पण नेहमी जाणवणारे शल्य ते म्हणजे एखादी महिला शिकलेली असेल आणि ती नोकरी न करता गृहिणी असेल तर तिचा बद्दल बाकीच्यांना नेमके काय वाटते .अनेक महिला अशा आहेत त्यांना घरातील लोक नोकरी करू देत नाही .किवा जर नोकरी असेल आणि मुले झाल्या नंतर त्यांना बघयला जर कोणी नसेल तर मग जर नोकरी सोडण्याची जर वेळ आली तर ती स्रीलाच सोडावी लागते .मुले मोठी होतात तो पर्यंत स्रीचे वय वाढते मुले आपल्या विश्वात रममाण होतात .मग ती स्री एकटी पडते .तेच आधी पासून गृहिणीचे असतात त्यांचे बरोबर पण होते .गृहिणी असल्या मुळे तिला खुपदा गृहीत धरले जाते .मग अगदी त्याची सुरवात उठल्या पासून होते ,आपल्या नवऱ्याचा डबा ऑफिसची तयारी सकाळचा नाष्ट,मग मुलाचा डबा शाळेची तयारी यात तिला स्वताकडे बघायला देखील वेळ मिळत नाही .आणि कधी काही वाटले तर "तुला कुठे जायचे आहे ,घरीच तर आहेस "!असे म्हणून तिचा कडे दुर्लक्ष होते .कधी तरी तिला वाटते सुट्टी घ्यावी ,फिरावे ,पण हे सगळे घरातील बाकीच्याना वेळ असेल तर फिरयला जायचे यात तिची आवड निवड कुठे विचारत घेतली जात नाही ,अगदी जेवण बनवतानी देखील मुलांना काय आवडते ,नवऱ्याला काय आवडते हेच पहिले जाते त्यात ती स्वताची आपली एक आवड आहे हे पण विसरून जाते .मग आपण घरात नसतानी हि दिवस भर काय करते याचा पण विचार केला जात नाही .अनेकदा नोकरी करणऱ्या बायका सहज बोलून जातात .यांना काय काम आहे घरी तर असतात.यांना काय काम आहे गोसिपिंग शिवाय .पण खरच सगळ्या तशाच असतात का ? पण अनेकदा बोलयला कोणी नसते ,टीव्ही किती बघणार .मग येतात अशा बायका एकत्र स्वताचे सुख दुख बोलतात पण यांना काय काम असे म्हणून नावे ठेवली जातात .या उलट नोकरी करणार्या बायका काही प्रमाणत आपली आवड निवाड जपू शकतात ,स्वत साठी काही घेऊ शकतात .त्या बाहेर पडतात घर मुले नवरा यापासून अलग वातावरणात काही तास का होईन असतात .मग त्यांना अलग अलग व्यक्ती अलग अनुभव येत राहतात .घर आणि घराचे विचार यापासून दूर असतात . हो त्यांना त्यांची मुले सोडून जावे लागते .मग कधी ते आजारी असतील तरी याचे त्यांना वाईट वाटते मग त्या ते बोलून दाखवतात .स्वता आजारी असेल तर घरी राहून आराम करू शकतात .त्या स्वता कमवतात त्या मुळे त्याच्यात खूप आत्मविस्वास असतो .
पण गृहिणी आजारी जरी असेल तरी तिला सगळी कामे करयला लगतात .याचा कोणी कधी विचार करते का ?नोकरी करणारी असेल तर घरातील तिला मान देतात ,काही प्रमाणत का होईना कामात मदत करतात .पण गृहिणी ला कोणी मदत करत नाही 
खूप असे छोटी छोटी कामे असतात .ती देखील केले जात नाही .
{हे माझे विचार आहे माझे शल्य आहे बाकीचे त्याचासी सहमत असतीलच असे नाही }


रेणुका आर्ट्स  साहित्य  संमेलन  २०१५  साठी लिहिलेला  लेख  

!!आशा !!

Tuesday, 9 August 2016

माझ्या बद्दल

मी  आशा  नवले  .........
वाचनाची  आवड असणारी ,आजूबाजूला जे  काही  घडते ,त्याचा  चांगला वाईट परिणाम आपल्यावर होत असतो .तो असेच  मनातले काही  म्हणून  लिहिण्याचा  प्रयत्न  करते .वाचनाची आवड  जास्त  त्यामुळे  आपल्याला लिहिता येणार  नाही असे वाटायचे .जे  लिहितो  ते कोणाला आवडेल  का  असे  वाटायचे .मनात  कुठे  तरी एक  भीती  होती  .मग नाव न  टाकता ब्लॉग  वर  लिहियाला सुरवात  केली .जेव्हा  माझ्या ब्लॉग ला भेट देणारे  पाच हजार वाचक होतील तेव्हा फोटो आणि  नाव टाकायचे .आजपासून माझा ब्लॉगवर माझे  नाव दिसणार ...............
आता पर्यंत ज्या ज्या  वाचकांनी  माझ्या ब्लॉगला भेट दिली .त्या सगळ्यांचे मनापासून आभार .........

Saturday, 6 August 2016

कहाणी नागपंचमीची

श्रावण महिन्यातील पहिला सन म्हणजे नागपंचमी .
शहरात नाही पण खेड्यात हा सन मोठ्या उत्साहात साजरा होतो .
झाडाला  मोठे मोठे  झोके बांधले  जातात .संध्याकाळी सगळ्या लेकी सुना
एकत्र येतात .आणि झिम्मा फुगडी  खेळतात .
 कहाणी नागपंचमीची .........
ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पांच सुना होत्या. चातुर्मास्यात श्रावणमास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी आपल्या पणजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीचं नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून, नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल, असं म्हणू लागली. इतक्यात काय झालं? शेषभगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला. त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला? व आताच कुठून आला? पुढे त्यानं मुलीला विचारलं. तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली. त्या वेषधारी मामानं तिला आपल्या वारुळात नेलं, खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवा बसवून आपल्या बिळात घेऊन गेला. आपल्या बायकामुलांना ताकीद दिली की, हिला कोणी चावू नका.
एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली, तेव्हा हिला हातांत दिवा धरायला सांगितलं. पुढं ती व्याली, तिची पिलं वळवळ करू लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातांतला दिवा खाली पडला. पोरांची शेपूटं भाजली. नागीण रागावली. तिनं सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली, तो म्हणाला, “तिला लौकरच सासरी पोचवू”. पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपूटं कशानं तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यास फार राग आला, त्याचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले. नागपंचमीचा दिवस. हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्रं काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागांना, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात होती. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली. “जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत”. असं म्हणुन नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार त्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात तीजविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले. दुसऱ्या दिवशी तिनं हार उचलून गळ्यांत घातला.
एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली, तेव्हा हिला हातांत दिवा धरायला सांगितलं. पुढं ती व्याली, तिची पिलं वळवळ करू लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातांतला दिवा खाली पडला. पोरांची शेपूटं भाजली. नागीण रागावली. तिनं सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली, तो म्हणाला, “तिला लौकरच सासरी पोचवू”. पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपूटं कशानं तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यास फार राग आला, त्याचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले. नागपंचमीचा दिवस. हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्रं काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागांना, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात होती. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली. “जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत”. असं म्हणुन नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार त्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात तीजविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले. दुसऱ्या दिवशी तिनं हार उचलून गळ्यांत घातला.तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा होवो. ही साठां उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण! 
{संपूर्ण चातुर्मास पुस्तकातून  साभार }{ फोटो -गुगल सर्च }

Monday, 1 August 2016

मैत्री

दोस्ती ,मैत्री ,सखा किवा सखी.जिवलग असे अनेक नावे आहेत ना ?" मैत्रीचे" !
मैत्रीचा अर्थ खूप व्यापक आणि मोठा आहे .सगळे नाते मिळवणे किवा ते असणे हे आपल्या हातात नसते .पण मैत्री हे असे नाते आहे कि ते आपल्याला नशिबाने मिळते .आईवडील भाऊ बहिण नंतर सगळ्यात जवळचे नाते म्हणजे मैत्री .कधी कधी आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला काही सांगू शकत नाही तेव्हा कामे येते ती मैत्री .पण वयपरत्वे मैत्री बदलत जाते .


हातात हात घालून शाळेत जाणारे मित्र ,एकच बेंचवर बसणारे मित्र .एकत्र अभ्यास करणारे मित्र ,हातात हात घालून शाळेत जातानाची मैत्री अतिशय निरागस असते .कोणताही स्वार्थ नसलेली .निरगस असते .पण शाळा संपून जाते आणि "मोत्याची माळ धागा तुटून ,मोती जसे बिखारतात तसे मित्र देखील पांगतात .कोण कुठे कोण कुठे जातात .कॉलेज लाईफ सुरु होते .आपण काही करू शकतो हा विस्वास असतो .आणि या काळत होणारी मैत्री आयुष्यात सगळ्यात महत्वाची ,आयुष्याला वेगळे वळण देणारी ठरते .जादुई काळ असतो अनेक मोहाचे क्षण समोर असतात .याच कळत चांगले मित्र भेटले तर आयुष्याचे सोने होते .असे मित्र मग कायम कोहिनूर हिऱ्या सारखे हृह्द्याच्या कोपऱ्यात जपून ठेवले जातात .याउलट आयुष्य बेफिरीने जगणारे मित्र भेटले तर आयुष्य वेगळ्या वाटे कडे जाते .आयुष्याची वाट लागते .मग असे मित्र एक वाईट आठवण बनून राहतात .
कामा मुळे वेगवेगळे सहचारी भेटतात .त्यांच्या बरोबर काम करता करता सहवासातून मैत्री होते . नकळत सुख दुखात साथ देवून जाते हि मैत्री .मनापासून हवीहवी आणि गरज असणारी मैत्री असते उतार वयातील .आयुष्य जगून झालेले असते .चांगल्या वाईट गोष्टी आणि सुख दुखाचे अनेक क्षण सोबत असतात . पण वेळ घालवायला तर कधी जीवन साथी अचानकसाथ सोडून गेलेला असतात.आयुष्यातील एकटे पणा वाटून घेण्यासाठी मग मैत्री खूप उपयोगी पडते . वय कोणते असो आपल्याला एक तरी मित्र असावा असे वाटतेच वाटते .आपण न सांगता आपल्या मनातील ओळखणारा......सुखात साथ देणारा ,दुखात पाठी मागे उभा राहणारा .एक तरी मित्र असावा असे वाटतेच .



हर एक फ्रेंड कामिना होता है............
त्यापेक्षा हर एक फ्रेंड जरुरी होता है