Friday, 26 December 2014

मनातले घर



६ एप्रिल 2013





ने  नजर फिरवली कधी काळी मोकळी असणारी  जागा आत अनेक घरांनी घेतली होती
मंदिराचा बाहेर आली आणि तिचे पावले नकळत बाजूला असलेला पडक्या घर कडे वळाली ' .
आजूबाजूला बघितले  किती मोठी ती जागा अशीच  पडून होती सगळी कडे गावात आणि कचरा चालतानी अचानक तिला ठेच लागली खडक होता न तिथे .
नकळत ती भूतकाळात गेली.
इथेच तिचे घर होते या अगणात ती कितीदा खेळताना ती पडली होती ढोपरे फुटली होती .बघून  चालता येत नाही का म्हणून आईचा ओरडा खाल्ला  होता.
इथेच आपले घर होते.घर होते असे तिला वाटायचे . घर म्हणजे कच्च्या मातीच्या भिंती.शेणानी सारवलेली जमीन .छत म्हणून   उसाच्या पानाचे  {ज्याला गावाकडे पाचट म्हणतात } छप्पर .त्याच्या  बाजूला एक पक्के घर .
केवळ जेवण करण्यासाठी  चुली मुळे काळे होऊ नाही म्हणून बांधलेले हे घर ,
घर भरपूर मोठे.फक्त स्वयपाका पुरती  भांडी.पिण्याचे पाणी. एवढेच सामान बाकी घर रिकामे.
घराच्या बाजूला मोठे निंबाचे  झाड .
समोर मोठे अगण सगळा  खडक असलेले .
दारा समोर मोठे बोरीचे झाड .
थोड्या दूरवर बैल आणि गाई बधाण्याची  जागा .
या घरासी तिचे एक वेगळे नाते होते .
आठवड्यातून दोनदा शेणानी जमीन सारवणे तिला खूप आवडायचे.
सारवल्या  नन्तर हिरवी दिसणारी जमीन आणि मातीचा वास तिला खूप आवडायचा .मातीशी आपला एक अनोखे नाते आहे असे तिला वाटायचे
आजूबाजूला खूप शांतात पण हवीहवीसी वाटणारी.आजूबाजूला घर पण खूप दूर दूर .
शाळातून घरी आला वर जमिनी वर चटई टाकून अभ्यास करणे तिला खूप आवडायचे इथेच बसून अनेक लेखकाची पुस्तके तिने वाचाली होती.इथेच अनेक सु:ख दु:ख अनुभवले होते.
ती लहान होती तिचा पाठी वर एक सात वर्षांनी आणि एक पाच वर्षांनी लहान भाऊ म्हणजे ती मोठी आई वडील शेतकरी .
एक दिवस अचानक वादळ आले .घराचे छापर उडाले आणि तेव्हा पासून तिचा मनात वारेची आणि वादळाची  भीती बसली ती आज पर्यंत .
लग्न झाले ती मुंबई सारखा मोठा शहरात आली जिकडे तिकडे सिमेंटचे जंगल.जवळ जवळ मोठा मोठा बिल्डींग मोकळी जागा नाही.आज ती बिल्डींग मध्ये  राहते जिथे मातीचा काही संबध नाही .मातीशी कोणते नात नाही .
तिने अनुभवलेली  शांतता नाही.खूप सुबत्ता आहे घरात सुखाला  काही कमी नाही.पण तरी एक दिवस असा जात नाही तिला तिचे ते घर आठवत  नाही .खास करून कोणत्या पण सणाला तिचे आवडते काम होते ने घर सरवाने अगणात सडा टाकणे रांगोळी  काढणे .त्या नंतर एक पवित्र पणा  जाणवतो असे तिला वाटयचे
एक दिवस तिला फोन आला .कोणी तरी बिडी न विझवता  फेकली आणि तिच्या त्या घराला आग लागली .
आपले कोणी तरी गेले असे वाटून ती खूप रडली.
आई वडील ती जागा सोडून शेतात राहायला गेले.पण ती आज पण विचार करते जर तिला जर घर बांधण्याची  संधी भेटली तर ती असेच घर बांधेल  साधे तिच्या मनातले
तिला माहित आहे ते शक्य  नाही आहे.आता काळ बदलला आहे.
गाडी तयार  आहे निघू या आपण ड्रायव्हरच्या बोलणे मुळे ती भानावर आली .खूप जड मनाने ती तिथून निघाली .बालपणीच्या खूप सार्या आठवणी घेऊन ............

No comments :

Post a Comment