Friday, 24 June 2016

}तिन्ही सांज} नाटक बघताना

नाटक बघणे अलग अनुभव असतो तो चित्रपटा सारखा नाही बघता येत .
चित्रपट बघतानी किती आवाज करा बोला .मोबाईल रिंग वाजो काही फरक नाही पडत .पण नाटकाचे असे नसते .मुलांचा आवाज किवा मोबाईल रिंग चा आवाज
त्या नाटकात काम करणाऱ्या अभिनेता किवा अभिनेत्रीला डिस्टर्ब करू शकतो .
अनेक प्रेषकाचे मोबाईल पुन्हा पुन्हा वाजत होते .तर कुठे लहन मुले मधेच रडत होते .नाटका मधील पात्रांचे सवांद हे पण मोठे मोठे होते .त्यामुळे तीन वेळा नाटक 
बंद करावे लागले .त्यांना रिक्वेस्ट करावी लागली .मोबाईल साईलेंट वर ठेवा .लहान मुलांना बाहेर घेवून जा .
आठवत नाही .मग हे लोक तर संपूर्ण नाट्यगृहा मधील प्रेषका समोर आपला प्रयोग
सादर करत असतात .त्यांना आपली लिंक तुटली तर त्रास नक्कीच होत असणार ना ?मग एकदा सांगितल्या वर देखील मोबाईल वाजत राहिले .
म्हणजे मुले आलीच .मोबाईल हा अनेकदा पर्स मध्ये असतो आणि तो नेमका
वाजतो तेव्हा पटकन सापडत नाही .दुसरी गोष्ट अनेकजणी घरात चित्रपट
बघत असताना कधी एका जागेवर बसून बघत नाही .चित्रपट जर चित्रपट गृहात
चित्रपट बघताना काही बोलणे हि सवय असते .सैराट मधील शेवटचा सीन चालू असताना .आर्ची चहा करते .तेव्हा त्यांचे किचन दिसते .त्यावेळी एक महिला
"अग्ग बाई बघ तिचे घर किती भारी झाले .डब्यात काजू बदाम सुद्धा भरले "अश्या
टोन मध्ये बोलली कि त्या पाच मिनिट शांतता असणर्या सीन मध्ये त्या महिलाच्या बाजूचे शांत बसण्या पेक्षा हसत होते .आणि किती मूर्ख लोक म्हणून बाकी लोक त्यांच्या कडे पाहत होते .
असे बोलून त्यांना सांगणाऱ्या लोकांना वेड्यात काढतात .कुठे किती मोठ्याने कसे वागावे कसे बोलावे याची काही गरज काही लोकांना वाटतच नाही .
असेच मनातले काही


याचा अनुभव ३० तारखेला दादरच्या शिवाजी मंदिर मध्ये "तिन्हीसांज" या नाटकाच्या प्रयोगा वेळी आला .अतिशय सुंदर असलेले हे नाटक बघत असतानी 
खरे तर आपण दोन मित्र किवा कोणी दोन जन जरी गप्पा मारत असलो आणि मध्ये काही करणा मुळे जर सवांद तुटला तर आपण काय बोलत होते ते आपल्याला 
आता असे का होते त्या प्रयोगाला महिलांची संख्या जास्त होती.महिला असणार 
पण अश्या लोकांना आपण काही चुकतो असे वाटतच नाही .मग काय झाले त्यात 
१जुन २०१६ 

माझा दहावीचा निकाल

आज मुलांना मिळणारे मार्क्स हा अनेकांच्या चर्चेचा
विषय आहे.आमच्या वेळी एवढे मार्क्स मिळत नव्हते हे अनेकांचे मत अगदी
माझे सुद्धा,का तेव्हा मुले हुशार नव्हते का ? आतची मुले जास्त हुशार आहेत का?
खरे तर तेव्हा मुले हुशार होते .

आजच्या सारखे तेव्हाचे पालक जागरूक नव्हते .गरिबी मुळे वह्या घेणे परवडत
नसायचे .जुनी पुस्तके वापरली जात .गाईड घेणे परवडत नव्हते .खरे तर त्यावेळचे
शिक्षक अतिशय चांगले असायचे .शिकवणी कोणी लावत नव्हते.वर्गात होईल 
तेवढाच आभ्यास असे अनेक मुला बाबत होते.अनेका कडे लाईट देखील नसायची .
आईवडील जर शेतकरी असतील तर मग आधी शेतातील काम करावे लागायचे.
अभ्यास हा नेहमी दुय्यम होता.
याउलट आज आहे आपल्याला जेजे नाही भेटले तेते स्वता पालक आधी मुलांना
आणून देतात .पुस्तके ,गाईड.आणि त्याबरोबर अनेक शिकवणी वर्गाच्या नोटस,
मोठे मोठे क्लास. आणि आईवडिलांचे मुलांच्या अभ्यासावर असलेले बारीक लक्ष.
मार्क्स मिळवण्या साठी किती अभ्यास करायचा हे बरोबर क्लास मध्ये शिकवले जाते.
अनेकदा परीक्षा घेतल्या जातात .मुलांची मग चांगली तयारी होते.हेच आज
चागले मार्क्स पडण्याचे कारण आहे असे मला तरी वाटते.
दुसरा मुद्दा म्हणजे अनेक आईवडील मुलांना चांगले मार्क्स मिळून देखील खुश
का नसतात.त्याचे कारण आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे हि अनेक आई
वडिलांची इच्छा असते.पण आज प्रचंड स्पर्धा आहे .ज्यांना चांगले मार्क्स त्यांना
चांगले कॉलेज हे समीकरण झाले आहे.अगदी एक मार्कस वरून सुद्धा चांगल्या
कॉलेज मध्ये प्रवेश मिळत नाही.अनेकदा मुलांना जे कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो
ते लांब असते .येण्या जाण्यात वेळ जातो .म्हणून अनेकदा जवळचे कॉलेज मिळावी
हि अपेक्षा असते .म्हणून भरपूर मार्क्स मिळून मुले खुश नसतात.तर अनेक मुले हे
कमी मार्क्स असून पण चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशाचा हट्ट करतात.तेव्हा आपल्याला
जेमार्क्स जास्त वाटतात ते त्या आईवडिलांना वाटत नाही .आणि मुलांना देखील
आजचे मुले पण खरच मेहनत करतात मनापासून.
प्रचंड स्पर्धा आहे हे असेच होणार,पण यासगळ्यात कमी मार्क्स असणारे जाणार
कुठे हा आजचा मोठा प्रश्न आहे .आजच बातमी बघितली ज्यात उपलब्ध जागा आणि
आवश्यक जागा यात मोठी तफावत आहे .सगळ्यांना प्रवेश मिळणे मुश्कील
आहे.
असेच मनातले काही

दहावी कालची आणि आजची

आज मुलांना मिळणारे मार्क्स हा अनेकांच्या चर्चेचा
विषय आहे.आमच्या वेळी एवढे मार्क्स मिळत नव्हते हे अनेकांचे मत अगदी
माझे सुद्धा,का तेव्हा मुले हुशार नव्हते का ? आतची मुले जास्त हुशार आहेत का?
खरे तर तेव्हा मुले हुशार होते .

आजच्या सारखे तेव्हाचे पालक जागरूक नव्हते .गरिबी मुळे वह्या घेणे परवडत
नसायचे .जुनी पुस्तके वापरली जात .गाईड घेणे परवडत नव्हते .खरे तर त्यावेळचे
शिक्षक अतिशय चांगले असायचे .शिकवणी कोणी लावत नव्हते.वर्गात होईल 
तेवढाच आभ्यास असे अनेक मुला बाबत होते.अनेका कडे लाईट देखील नसायची .
आईवडील जर शेतकरी असतील तर मग आधी शेतातील काम करावे लागायचे.
अभ्यास हा नेहमी दुय्यम होता.
याउलट आज आहे आपल्याला जेजे नाही भेटले तेते स्वता पालक आधी मुलांना
आणून देतात .पुस्तके ,गाईड.आणि त्याबरोबर अनेक शिकवणी वर्गाच्या नोटस,
मोठे मोठे क्लास. आणि आईवडिलांचे मुलांच्या अभ्यासावर असलेले बारीक लक्ष.
मार्क्स मिळवण्या साठी किती अभ्यास करायचा हे बरोबर क्लास मध्ये शिकवले जाते.अ
नेकदा परीक्षा घेतल्या जातात .मुलांची मग चांगली तयारी होते.हेच आज
चागले मार्क्स पडण्याचे कारण आहे असे मला तरी वाटते.
दुसरा मुद्दा म्हणजे अनेक आईवडील मुलांना चांगले मार्क्स मिळून देखील खुश
का नसतात.त्याचे कारण आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे हि अनेक आई
वडिलांची इच्छा असते.पण आज प्रचंड स्पर्धा आहे .ज्यांना चांगले मार्क्स त्यांना
चांगले कॉलेज हे समीकरण झाले आहे.अगदी एक मार्कस वरून सुद्धा चांगल्या
कॉलेज मध्ये प्रवेश मिळत नाही.अनेकदा मुलांना जे कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो
ते लांब असते .येण्या जाण्यात वेळ जातो .म्हणून अनेकदा जवळचे कॉलेज मिळावी
हि अपेक्षा असते .म्हणून भरपूर मार्क्स मिळून मुले खुश नसतात.तर अनेक मुले हे
कमी मार्क्स असून पण चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशाचा हट्ट करतात.तेव्हा आपल्याला
जेमार्क्स जास्त वाटतात ते त्या आईवडिलांना वाटत नाही .आणि मुलांना देखील
आजचे मुले पण खरच मेहनत करतात मनापासून.
प्रचंड स्पर्धा आहे हे असेच होणार,पण यासगळ्यात कमी मार्क्स असणारे जाणार
कुठे हा आजचा मोठा प्रश्न आहे .आजच बातमी बघितली ज्यात उपलब्ध जागा
आणि आवश्यक जागा यात मोठी तफावत आहे .सगळ्यांना प्रवेश मिळणे मुश्कील
आहे.
असेच मनातले काही

असेच मनातले काही {माझ्या फेसबुक पोस्ट }

सुखाचे क्षण अनेका बरोबर वाटून घेता येतात .तसे दुखाचे नसते.काही वेदना कधी कोणाला सांगता येत नाही .तसे विस्वसाचे कोणी असायला हवे .नाही तर अनेकदा तोंडातून बाहेर पडलेले शब्द वार्या सारखे कुठे कुठे पोचतात .मग अजून दुखात भर पडते .कोणावर विस्वास नाही राहत .
मग मनातले कोणाला तरी सांगायचे असते मन हलके करायचे असते .अश्या वेळी सरळ लिहून काढावे .जो पर्यंत मन हलके होत नाही .आपले शब्द कुठे जात नाही .नाही जमत लिहिणे सरळ देवाच्या फोटो समोर उभे राहावे सगळे बोलून टाकावे .देव ऐकायचे काम करतो का नाही माहिती नाही पण .तो कधी कोणाला सांगयला जाणार नाही हा पूर्ण विस्वास असतो .असेच मनातले काही 
पण मनात येते ,काही मन हरवलेली माणसे देखील असतात नाही .
अनेकदा असी माणसे नेहमीचे आयुष्य हे सुरळीत जगत असतात .
असे वाटते त्यांच्या आयुष्यात काही समस्या नाहीच आहे .जसे काही डोळ्याने
बघणारे मनापासून बघतातच असे नाही.कारण मन भलतेच कुठे फिरत असते .
शरीर जसे आजारी होते तसे मन सुद्ध आजारी होते नाही ,आजारी शरीर दिसते.
आजारी मन दिसत नाही .डोळे रडतात तसे मन पण रडते नाही.रडणारे डोळे दिसतात.रडणारे मन दिसत नाही .
पण मनाचे रडणे अति झाले कि ते पण हरवते .मग त्या मनाला कोणत्या व्रेद्ना 
राहत नाही.सुख दुख यापलीकडे ते जाते .
"मग जग त्याना वेडे म्हणतात "
असेच मनातले काही






घर हरवलेली माणसे मागे वपु चे हे पुस्तक वाचले .



मौनात मोठी ताकद असते म्हणतात.पण तेच मौन कधी कधी मनस्ताप देते .मन दुखावले चूप बस हवे तर राडा पण ज्याने मन दुखावले त्याला काही बोलू नका .कारण त्याला जसे वागायचे तसे तो वागला तो त्याचा स्वभाव असे समजून चूप बसने म्हणजे मुर्ख पणा असतो कारण तुमच्या मौनाचा लोक वेगळा अर्थ लावतात .तुम्हाला चूक समजतातत त्या . पेक्षा जास्त त्रास तेव्हा तुमच्या मौनाचा वेगळा अर्थ घेवून तुमच्या वर अविस्वास दाखवला जातो .अपेक्षा असते तुम्ही कोणावर पूर्ण विस्वास ठेवता त्या व्यक्तीने पण तुमच्या वर विस्वास ठेवावा .जेव्हा असे होत नाही तेव्हा खूप मन दुखावले जाते .

शाप

शाप 
कोणी तरी कोणाचे वाईट केले हकनाक त्रास दिला कि ज्या व्यक्तीस त्रास
झाला ती व्यक्ती तळतळाट देते ,"तुमचे वाईट होईल ,किवा तुझे वाटोळे होईल"
वाईट बोलत असेल तर "तुझ्या जिभेत किडे पडतील "
असे बोलणे म्हणजे काय ,शाप देणे .
जेव्हा आपण आपल्या हिंदू धर्माचे अनेक धर्म ग्रंथ वाचतो तेव्हा आपल्या लक्षात
येईन कि अनेक देव देवता यांना कोणी ना कोणी शाप दिला होता.आणि नंतर त्यांना
ते शाप भोगावे लागले होते.ऋषी दुर्वासा यांचे नाव तर याबाबत सगळ्यात आधी आठवते.शाप दिला 

तो लागू पडला म्हणून ज्या व्यक्तीला शाप दिला त्याचा त्रास
त्या व्यक्तीला जर होत असेल तर ज्याने दिला त्याला पण होत असेल का?
आता पुराणातील शाप साठी माहिती असलेल्या काही कथा . कंसाला मिळालेला शाप "देवकीचा 

पुत्र तुझा अंत करीन "
दशरथ राजाला श्रावणाच्या आईवडिलांनी दिलेला शाप....सगळ्यानाच माहिती आहे.ज्या शापाचा परिणाम म्हणून दशरथ राजाला पुत्रवियोग झाला .
आहिलेला शिळा होण्याचा शाप ,तर अहिलेचा इंद्रास शाप तुझ्या शरीरात अनेक
भोके पडतील .खोटो बोलून विद्या शिकलात म्हणून कर्णास परशुरामाचा शाप
"गरज असेल तेव्हा तुझी विद्या विफल होईल" आणि ती झाली महाभारत युद्धात .
"अर्जुनाने स्रियांना दिलेला शाप " स्रीयांच्या पोटात कोणते गुपित राहणार नाही "
{ याची कथा माहिती नाही } राजा परीक्षित यास ऋषीच्या गळ्यात मेलेला साप
घातला म्हणून ऋषीच्या मुलाने शाप दिला "आज पासून सात दिवसात साप चावून मारशील "त्याशापाचा प्रभाव होऊ नाही म्हणून परीक्षित राजाने सात दिवास श्रीशुकदेव यांनी राजा परिक्षीत यास भाग्वात कथा सांगितली आहे .जी आज भागवत महापुराण म्हणून आहे .ज्यात बारा खंड आहे .या कथा सांगितल्या तरी
परीक्षित राजा हा साप चावून सातव्या दिवशी मरण पावला.
हिंदू धर्मात अश्या अनेक कथा आहेत .बाकी धर्मात पण असतील का ?
काल भागवत पुराणावरील एक पोस्ट वाचून असेच काही आठवले .

कधी न पुसल्या जाणाऱ्या आठवणी

कधी न पुसल्या जाणाऱ्या आठवणी 
सगळे पावसाची वाट बघत आहे .पाऊस सगळ्यांना हवाहवासा वाटणारा ,,,,,,,,,,,,
पण सगळ्या साठी वेगळाच असणारा,तो येतो कधी चोर पावलांनी कधी येतो .ढोल
नगारे वाजवत .तो येतो मग कोणाला आठवतात कविता कोणाला आठवतात
भजी तर कोणाला खुणवतात सह्याद्रीच्या वाटा ,आणि धबधबे ,तर कोणाला
नेवून सोडतात मनावर आघात झालेल्या वेदानाच्या गावी,मग कधी त्या असतात पुरात वाहून गेलेल्या ,डोक्यावर छप्पर हरवलेल्या माणसांच्या ...........
आज फेसबुक फ्रेंड ज्ञानदेव पोळ यांची पोस्ट वाचली .आणि चौथी मध्ये
असतानाची आठवण परत जागी झाली .छोटे गाव पक्के घरे कमी आणि कच्चे घरे जास्त .साधे मातीचे घर त्यावर उसाच्या पाचटाचे छप्पर .आमचे चुलीचे घर असेच होते .आईवडील शेतात मीआणि लहान दोन भाऊ शाळेत .दुपारी जेवणास घरी येत असू.एक दिवस दुपारी जेवायला घरी आलो .अचानक जोराचा वारा सुटला.वाऱ्याचा आवाज आल्याबरोबर दारा कडे धावले दार बंद कारे पर्यंत वारा आता घुसला आणि सगळे छप्पर उडून गेले .भीतीने तिघे एकमेकाला पकडून बसलो .वारा शांत झाला होता.पण घरात पसरलेल्या पालापाचोळाच्या रूपाने भीती सोडून गेला होता .त्या निरागस मनाला फक्त एकाच जाणवत होते आपले घर उडून गेले .आपण लवकर दार बंद नाही केले .आता आई मारणार .
भास होईल असा अंधार पसरला .अजून चैत्र पण संपला नव्हता अनेक ठिकाणी
लग्न चालू होती .मनी ध्यानी नसतानी वळवाचा पाउस आला होता.शेतकरी म्हणजे घरात कमी आणि त्याचा संसार बाहेर जास्त.अचानक आलेल्या पावसामुळे घर बाहेरील सामान आत घेण्या साठी धावपळ सुरु झाली कोण गोवर्या झाकतो कोण
वळ्याय झाकतो .पण पावसा कडे वेळ नव्हता त्याचा धीगाना सुरु झाला ,मोठ्या मोठ्या थेंब बरोबर आडवा तिडवा वारा सुरु झाला .घरात आई मी आणि भाऊ .दरवाजा बंद असून वाऱ्याच्या धडकेने दरवाज नक्की तुटणार यांभीतीने हाताने दरवजा दाबून ठेवण्याची केविलवाणी धडपड.त्याच वेळी दरवाज्या वरील एक पत्र
वर उचलला गेला आणि जोरात आपटला .आणि आईने देवाचा धावा सुरु केला .
एक पत्र उचकने म्हणजे घराचे छप्पर उडून जाणे.वखराची पास दरवज्याला आडवी लावली आणि धान्याच्या थाप्पीवर चढून उडणारा पत्रआईने दाबून ठेवला .घरातील चादरी पत्र्याच्या फटीत आम्ही दाबून ठेवल्या .त्याअर्धा तास वार्या बरोबर धीगाना घालणाऱ्या पावसात आम्ही देवाची पार्थांना करत होतो .
आर्ध्या तासाने पाऊस थांबला ,मनावर कधी न संपणारी भीती मनात बसवून .
येत असणार.आज मुंबईत राहते .मुंबईत नेहमी शांत पाउस पडतो तरी पावसामुळे अंधारून आले.वारा सुटला कि आज पण माझ्या मनाचा थरकाप होतो .नकळत मन माझ्या शेतकरी बंधावाच्या घरात जावून येते .मला नाही वाटत पावसात भजी खावी.माझे मन पुन्हा सुन्न होते .कुठे तरी कोणी तरी आशा असाच पावसाचा सामना करत असेल .कोणाला तरी असाच पाउस बेघर करत असेल , कोणच्या अंगणातील अनेक वर्षाचे मायाने जपलेले झाड उन्मळून पडत असेल .मागे एक भकास पणा सोडून .
आज असेच आठवणीतील काही


फेसबुक वर अश्याच एक पोस्टने आज त्या आठवणी मध्ये नेवून सोडले.
मध्ये काही वर्ष गेले नेहमी सारखा कडक उन्हाळा पण तो दिवस काही वेगळाच होता बघता बघता आकाशात काळे ढग जमा झाले .सकाळचे नौ वाजता रात्रीचा 
शेतकऱ्याचे जीवन असेच असते .अनेकांना असा अनुभव आला असणार काहीना 

"कल्पनेच्या जगात ".

"कल्पनेच्या जगात ".
स्वताच्या विश्वात जगणारा आपले काम भले नि आपण भले असा वागणारा काहीसा अबोल .खरे तर अत्माविस्वसाची कमी स्वताचे म्हणणे नीट मांडता न येणारा, जगासाठी नेभळट समजायचे त्याला सगळे .आपले हसू नको म्हणून तोच दूर राहायचा सगळ्या पासून .बाकीचे फेसबुक वापरतात त्याची चर्चा करतात आपण पण फेसबुक चालू करावे म्हणून त्याने फेसबुक चालू केले .एक अनोखे जग त्याच्या पुढे खुले झाले
.चार लोका समोर दोन शब्द निट न बोलू शकणारा तो आता रोज मोठे मोठे लेख लिहू लागला हळू हळू त्याचा मित्र परिवार वाढला तो आता खुश राहू लागला .त्याच्यात बदल झाला .आपण काही आहे असे वाटू लागले .कधी तरी त्याला हसणारे आता त्याला छान लिहितो म्हणून मेसेज करायचे .दिवस जात होते आपली आता एक ओळख आहे यात तो खुश होता .थोडा खुश होता .थोडा हवेत .आता आपल्याला कोणी नेभळट म्हणणार नाही या भ्रमात तो जगू लागला .
अशातच एका नातेवाईकाच्या लग्नाला जाण्याचा त्याला योग आला .मोठ्या घरचे लग्न असल्या मुळे झाडून सगळे नातेवाइक जमा झाले होते हा पण पोचला .तिथे गेल्यावर नमस्कार चमत्कार झाला .नंतर जो तो आपल्या नादात मग्न झाला .हळू हळू याच्या लक्षात आले आपण आहे तसोच आहे आपण आज पण वास्तव जगातील लोका मध्ये मिक्स नाही होऊ शकत .आभासी जगात रोज बोलायला अनेक जन असणारा तो आज स्वताला गर्दीत एकटा समजत होता .या विचाराने त्याच्या डोळ्यात पाणी आले .
पण त्याच वेळी आभासी जगातील मिळालेला आत्मविस्वास कमी आला .आणि त्याने मनाशी निश्चय केला काय झाले माझ्यात काही कमी असेल तर मी जसा आहे तसा लोकांना समोर जाईन.त्यांनी आजू बाजूला बघितले काही छोटी मुले होती त्यांच्या कडे गेला .त्यांचाशी बोलला .आणि त्यांचात तो रमला .नकळत त्याला या निरागस मुला मध्ये तोच त्याला भेटला .आता तो कल्पने पेक्षा वास्तवात जगणार होता .सगळ्यात आधी त्याने फेसबुक स्टेटस टाकले " मी आता लवकरच आपल्या समोर एक कादंबरी घेवून येत आहे .तो पर्यंत फेसबुकवर नसणार भेटू लवकरच " त्याने पेपर समोर घेतला त्यावर मोठ्या अक्षरात लिहिले "कल्पनेच्या जगात ".

Wednesday, 22 June 2016

फादर्स डे

प्रिय दादा ....
हो दादाच बोलत असू ना आम्ही ...
आज तुम्ही या जगात नाही ,फादर डे काय असतो हे माहिती नसलेले तुम्ही ,कशाची अपेक्षा नाही कोणाचा कधी राग नाही .तुमचा दिवस सुरु होत असे पहाटे चार वाजता हरिपाठाने होत असे .आपण आयुष्यभर खूप कष्ट आणि कष्ट केले पण आपण शिकू शकलो नाही आपल्या मुलांनी खूपशिकावी हि तुमची इच्छा होती .स्वत काम केले पण मुलांना शिकवले.आज पण मला आठवते स्वता बद्दल तुम्ही खूप कमी बोलत ,आत जून महिना चालू आहे शेतात पेरणी चालू असे आणि तुमच्या बरोबर मी असे त्या वेळी तुम्ही तुमच्या बालपणा बद्दल बोलत .वयाच्या अवघ्या अडीच वर्षाचे तुम्ही असतानी आई गेली होती.मग तुमचे वडील हेच आई आणि बाबा सुद्धा.आई काय असते आईची माया काय असते हे तुम्ही कधी अनुभवले नव्हते .त्या वेळच्या प्रौढा साठी {डांगरी शाळा } असेलेल्या शाळेत लिहिता वाचता येतील एवढे शिकले .त्याचा उपयोग तुम्ही कायम कोणत्या ना कोणत्या पोथ्या वाचयला केला.नेहमी तुम्ही धार्मिक गोष्टी सांगत त्या मुळे आज मला पुराणातील सगळ्या कथामाहिती आहे .

तुम्ही माळकरी म्हणून लोक तुम्हाला खूप मानत कारण तेव्हा दारू पिणार्यांनावाईट समजत .आम्हाला आमचे वडील व्यसनी नाही याचा खूप अभिमान वाटत असे .कधी कधी मी विचारत असे काय भेटते तुम्हला देव देव करून .त्या वर तुमचे उत्तर असे "आपण बचत का करतो कारण ती आपल्याला अडचणीच्या वेळी उपयोगी यावी ,तसेच आहे हे आज मी ठीक आहे म्हणून मी देवाचे नाव घेतो जे आपल्याला आपल्या दुखाच्या वेळी उपयोगी पडेल.मी दहावीला पास झाले तेव्हा किती आनंद झाला होता तुम्हाला आज पण आठवते.आज मी जीकाही आहे ,जे काही आज येथे लिहू शकते ते तुमच्या मी शिकले पाहिजे या हट्टामुळे,दहावीझाले आणि पुढे कॉलेज साठी बाहेर जावे लागेल म्हणून आई ने खूप विरोध केला तरी तुम्ही मला कॉलेजला पाठवले.मुलीना कॉलेजला पाठवले कि मुली बिघडतात असे लोक बोलत तेव्हा तुमचे उत्तर असे "माझा माझ्या मुलीवर विस्वास आहे.ती मला कधी मान खाली घालयला लावणार नाही" मी शिकले पदवी घेतली पण नोकरी नाही केले याची खंत मात्र कायम राहिली तुमच्या मनात

.तुम्हाला कधी दुखी बघितले नव्हते मी पण जेव्हा मला लग्ना नंतर फक्त दीड वर्षात टीबी झाला.मी हॉस्पिटल मध्ये होते माझी मुलगी गावी तुमच्या कडे .मुंबईची माहिती नाही तरी मला भेटायला आले.माझ्या समोर शांत असणारे तुम्ही घरी जाऊन पहिल्यांदी रडले.माझी बहिण लहान मुली सोडून टीबी मुळे गेली आता माझी मुलगीतरी बरी होऊ दे म्हणून पहिल्यांदी देवा समोर बोलले होते.एक पण व्यसन नसलेले तुम्ही पण तुमचा एक मुलगा मात्र पूर्ण व्यसनी झाला.आणि मनातून तुम्ही खूप खचले.कधी तसे दाखवले नाही तुम्ही.कधी सुपारी न खाणारे आणि चहा सुद्धा न पिणारे तुम्ही पण केवळ मुलगा व्यसनी झालाआणि त्याचा त्रास नको म्हणून पूर्ण आयुष्य जिथे घालवले ती जागा सोडून शेतात राहायला गेले.शेवट पर्यंत एकदशी आणि हरिपाठ न सोडणारे तुम्ही .आज खूप खूप आठवण येते आहे.असे वाटते आज तुम्ही हवे होते.खूप काही बोलावे वाटते खूप काही सांगावे.पण आता ते मनातच राहणार ............

असेच काही

आज बातम्या मध्ये एक बातमी दाखवत होते .एक व्यक्तीने ट्रेन समोर आत्महत्या केली .अश्या बातम्या आजकाल नेहमीच येत आहेत .आपण पण पण बघून च्यानल बदलतो .रोजमरे त्याला कोण रडे असे असते.
पण खोल विचार केला तर एक व्यक्ती स्वताच्या आयुष्याला कंटाळते आणि जीव देते .पण त्यावेळी तिथे अनेक वयोगटातील लोक हजर असतात .त्यांच्या मनावर अश्या घटनाच किती परिणाम होतो .रेल्वे पोलिस,रेल्वे कर्मचारी आणि मोटारमन 
हि माणसेच असतात.हि काय त्यांचे काम आहे असे आपण सहज म्हणून जातो.
सगळ्यात मोठा फटका बसतो तो प्रवास करणाऱ्या लोकांना .ट्रेन थांबते .रूळ साफ करणे .यासगळ्यात वेळ जातो .एक छोटी घटना पण अनेकांच्या जीवनावर असर करून जाते.जर परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी जात असेल तर त्याच्या मनावर परिणाम होतो .त्याचा पेपर अवघड जावू शकतो .यामध्ये त्याची काही चूक नसते..
वाढती महागाई ,रोजचे टेन्शन ,कमी होत चाललेला संयम यामुळे माणूस मानसिक विकाराचा शिकार होत चालला आहे .सवांद कमी होत चालला त्याचा परिणाम आज एकटेपणा वाढला आहे .यातूनच टोकाचे निर्णय घेतले जातात .
पण जेव्हा अश्या आत्महत्या होतात तेव्हा कोणाला सहानुभूती नाही वाटत .उलट
लोक शिव्या घालत असतात ."त्याला मरायला ट्रेनच सापडली का ?"
आयुष्य सुंदर आहे तेअसे गमावू नका, माघार घेण्या पेक्षा चालत राहा मार्ग सापडेल

आठवणीतील ती

काय कमी राहिली होती माझ्या प्रेमात ??
मनापासून प्रेम केले होते तुझा वर .तू काय केले त्या बद्द्ल्यात दिले ते फक्त दु:ख 
आणि केला विस्वासघात मी कायम तुझा बरोबर राहीन असे वचन दिले होते तु तरी पाठ फिरवून गेलास ..........
आता काही अपेक्षा नाही कारण मी चूक केली होती चुकीच्या माणसा कडून अपेक्षा ठेवली होती मी, 
पण गेलास जा .आता मी तुला माफ केले कारण या पुढे आता मी तुला कधी दिसणार नाही ना माझा 
आवाज आता तुला ऐकयला भेटेल ....आज त्याला तिचे हे सगळे बोलणे आठवत होते .त्याचे डोळे अश्रुनी भरले होते .त्यालाच समजत नव्हते आज खूप दिवसाने त्याला तिचे बोलणे आणि तिची एवढी आठवण का येत आहे .
साधी होती ती मनापासून प्रेम करत होती ."बस तु मला कधी विसरू नको ".
"तुझे असणेच माझ्या साठी खूप आहे ".फक्त तू भांडत नको जाऊ सारखा सारखा
 "राग नुसत्या नाकाच्या शेंड्यावर असतो तुझा" .
कारण काय मला फोन का केला नाही .कधी माझा फोन का घेतला नाही .हि काय करणे आहेत का रे .
असे बोलून खळखळून हसायची ती ...
आज हे सगळे का आठवते आहे समजत नाही ...कोण चुकले ,ती नाही आपण चुकलो, 
समजू नाही शकलो तिला...शहरात आलो आपण आजूबाजूल्या असलेल्या मुली त्याचे राहणे
 त्याचा आपल्या वर प्रभाव पडत गेला .तिचे विचार तिचे राहणे आपल्यला आपल्याला आता
 गावंढळ वाटायला लागले .आपण हळू हळू मेसेज करणे कमी केले .नंतर फोन करणे .
ती विचारात राहायची काय झाले तू बदलला आहेस .आपण बहाणे करत राहायचो बिझी असण्याचे ......
गावी गेलो आपण ,धावत आली ती नेहमीसारखी ....माझ्यात झालेला बदल जाणवला तिला ...
..शांत राहिली ती ...शहरात परतत असतानी रस्त्यावर समोर आली ती .."जा माफ केले तुला 
,माझ्या प्रेमात कमी राहिली असेल ."वाऱ्याच्या वेगाने निघून गेली ती ....कुठे गेली ,
नाही माहित पण आज तिचा प्रत्येक शब्द आठवत आहे .आज ती खूप आठवत आहे ....
माफी मागायची संधी पण नाही दिली ....पण आता वेळ गेली माहित आहे ...
काल्पनिक !!!आशा!!! 23/11/15Ripost