Wednesday, 28 January 2015

मंगळ

तुळशीचे लग्न झाले कि लग्नसराई सुरु होते .मुलगा बघणे ,मुलगी बघणे 
सुरु होते .पण मुलगा किवा मुलगी किती शिकले आणि दिसयला किती देखणे 
असेल तरी सगळ्यात आधी बघितली जाते ती कुंडली ........................
आज आपण किती चंद्र वर किवा मंगळावर गेले असे बोलत असलो तरी 
अनेक जण आहेत असे जे कुंडली बघूनच लग्न ठरवतात .
आणि या बाबत आपल्याकडील मालिका अजून खतपाणी घालतात .
कुंडली जुळवूनच लग्न ठरवले जातात .
कुंडली मध्ये जर मंगळ असेल तर..??
एखादी मुलगी /मुलगा हुशार असतात .देखणे असतात .सर्वगुण संपन्न असतात .
मुलगी पण सुंदर असते .पण जर पत्रिकेत मंगळ असेल तर या करणा साठी तिला
नाकारले जाते .मंगळ ची मुलगी आहे ना मग मुलगा पण मंगळचा पाहिजे .किवा 
 मुलाला मंगळ आहे.मग मंगळाची मुलगी हवी . पण हे सगळे करत असतानी 
मुलीचे/मुलाचे वय वाढते.आणि केवळ मंगळचा मुलगा/मुलगी पाहिजे म्हणून कधी कधी 
कोणत्या पण गोष्टीत अनुरूप नसतानी फक्त मुलाला /मुलीला मंगळ आहे म्हणून 
लग्न लावले जाते .पण हि एक गोष्ट जुळते बाकी अनेक गोष्टी नाही जुळत अशा वेळी 
त्या मुलींच्या /मुलांच्या वाटयला घुसमट येत नसेल का ?
असेच काही अनुभवातून 
!!आशा !!-२८/१/१५

No comments :

Post a Comment