Sunday, 25 January 2015

कचाट्यातून चालताना चपलेचे महत्व कळते,दु:खात कुढत बसतांना आयुष्याचे गुपीत कळते.
आपले स्वत:चे आहे असे वाटते पण नशीबात मात्र नसते , तरीही का कुणास ठाऊक मन त्या मागेच पळत असते.
कधी खड्डा कधी अडथळे, मार्गात नेहमीच कठीणाइ असते. तरीही त्याला झुगारून पुढे जायची वेगळीच जीद्द असते.
हवं हवंसं वाटणं आणी तरीही लांब जाणं, यात खरच परीक्षा असते.
ऊगाच कर्णाचं रंप दाखवून आपली मात्र वाट लागत असते,
जङलेले बंध तुटण्याची खंतं असते, तुटताना मात्र मनाला जखम होते.
कसे अजब आहे पहा.....मनाच्या जखमेचे औषध मात्र शोधुनही सापङत नसते.
आज रडणे आणी पुन्हा पडणे, असेच कधी कधी चालू असते.
पुन्हा पडण्यासाठी मात्र ऊभे राहण्याची जीद्द कुठूनतरी येत असते......

अनामिक {आवडलेली पोस्ट }

No comments :

Post a Comment