Sunday, 25 January 2015

कोणीच कोणाचे नसते.

कोणीच कोणाचे नसते. हे वाक्य आपण नेहमी ऐकतो .
याचा अर्था काय ?
म्हणजे आपण असा समज करतो
. ."आपण आहे कोणा साठी "
या मुळे आपल्याला काही वेळे साठी समाधान मिळत असेल का ?
विचार केला तर सगळेच एकटे असतात .
काही माणसा साठी लिहिण्यास शब्द कमी पडतील अशी माणसे असतात .
आपले नशीब असते जेव्हा ती आपली असतात .
कोणत्या गोष्टीची किमत ती दूर गेल्यावर कळते .
आपल्या आयुष्यात असेच होते ना .
अनेकदा काही गोष्टी आपल्या जवळ असतात .तेव्हा त्याची किमत नसते .
खोट्या अहंकारा मुळे आपली अनेक नाती अशीच दूर जातात .
मग आपण आपल्या चुका शोधण्या पेक्षा "कोणीच कोणाचे नसते"
असे बोलून आपले समाधान करतो .
कधी कधी कोणी पण नको असे आपल्याला वाटते .
एकटे राहावे .स्वताच स्वतला शोधावे .
असा वेळी आपल्यालाही समजते .आपण देखील कोणाचे असतो का ?

No comments :

Post a Comment