Saturday, 7 February 2015

बदल

बदल आवश्याक आहे .बदल होताना खूप काही बदलत असते .
आपण "आमच्या वेळी नव्हते असे "म्हणत बसण्या पेक्षा त्या बदलला स्वीकारले पाहिजे .
रोजच्या जगण्यात आपण अनेक गोष्टी मध्ये नकळत बदलत असतोच ना .
आज रोझ डे तो कुठे आपला आहे मग तो का साजरा कारायचा हे बोलण्या पेक्षा 
काही गोष्टीचा विचार करायला हवा .
आज अनेक फुले मार्केट मध्ये आले असतील .म्हणजे ज्यांनी आजचा दिवस समोर
ठेवून गुलाबाची शेती केली असेल त्याला यातून उत्पन्न भेटले असणार .
शेती पासून मार्केट पर्यंत होणारी वाहतूक करणाऱ्या गाड्या ,फुले तोडणारे मजूर
मार्केट मध्ये कामे करणारे ,आणि ती फुले विकणारे मोठ्या पासून छोटे व्यापारी
आणि अगदी सिग्नलवर फुटपाथ वर फुले विकणारी मुले .
या सगळ्यांना तुम्ही कोणता दिवस साजरा करता याचासी काही घेणे देणे नसते
त्यांना माहित असते त्या दिवसी मिळणारे पैसे जे इतर दिवशा पेक्षा नक्कीच जादा असतात .
आता राहिला प्रश्न हा दिवस आपला नाही ,मग रोजच्या वापरातील सगळ्या वस्तू
या तरी आपल्या आहेत का ?
मोबाईल असो किवा तुम्ही ज्यावर हे मत मांडता ते फेसबुक .
कोणत्या गोष्टी कडे नकारात्मक दृष्टीने न बघता सकारत्मक दृष्टीने बघा
कदाचित लक्षात येईन बदल तर होताच राहणार त्याला आपण कसे सामोरे जातो
हे म्हत्वाचे असे मला तरी वाटते .

No comments :

Post a Comment