Sunday, 25 January 2015

बालपण

बालपण 
व्यक्ती मोठी होते .मग ते कोणते पण क्षेत्र असो .
आदर मिळतो सगळे काही असते तरी मनातून जात नाही ते बालपण .
आणि जर ते खेड्यात गेले असेल तर मग अशी व्यक्ती मग जगात कुठे गेली 
तरी विसरत नाही .स्वताचे गाव ती मनात जपत जगत असते .
असेच मग अचानक जुने मित्र भेटतात .
आणि सगळ्या गोष्टी परत आठवतात .
आठवतात मळ्यातील वस्ती वरून गावात जाणारी ती ओबडधोबड वाट .
खडी वर आलेली .पायांना टोचणारे ते खडे .मग बाजूच्या फुफुट्यातून जातानि
भाजणारे पाय आणि त्यावर उडणारी धूळ .
माझा कडे एक सायकल असती तर असा मनात येणारा विचार
{आज कार असून मजा नाही }
उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये केलेले रोजगार हमीचे काम .
मित्रा बरोबर गाव भर भटकणे .कट्टी कधी बट्टी.
सूरपारंब्या ,लपाछापी.....
गावात येणारा एकमेव गारेगार वाला त्याचा मागे फिरणे .
कोणच्या घरी जेवणे .कोणी ओरडले तरी आपलेच आई वडील बोलतात
असे समजून ऐकून घेणे .
१५ ऑगस्ट २६ जानेवारीला स्वताच ड्रेस धुणे .पिताळी तांब्यात
विस्तव टाकून इस्री करणे .
थंडीत शाळेत जातानि स्वेटर नसतानी कुडकुडणे.
नवीन कपडे हवे म्हणून आई कडे हट्ट करणे .ते ती नाही घेऊ शकत
म्हणून वाईट वाटणे .
आणि आवडणारा बाजाराचा दिवस ..
बाजारातून आईने आणलेली भेळ ....
कधी तरी लाडू ...
आणि आठवतो तो दिवस दहावीला छान मार्क्स मिळाले तरी
पेढे वाट्याला नसलेले पैसे ...
{आजचे मुले खरच नशीबवान आहे ना .त्यांना हवे ते कपडे मिळतात .
हवे ते मिळते कदाचित आपण न अनुभवलेले बालपण आपण त्याच्यात
परत जगत असतो ]

No comments :

Post a Comment