Sunday, 25 January 2015

मनातील खंत







जीवनात अनेक गोष्टीची खंत असते कधी ती स्वतच्या आयुष्यातील तर कधी समा जात आजूबाजूला घडणारया गोष्टी बद्दल .
माझे लग्न २० वर्ष पूर्वी झाले जो अनुभव तेव्हा होता तोच आता पण येतो त्या बद्दल मी लिहिणार आहे
आज मुली शिकत आहे नोकरी करतात.कमीत कमी शहरात मुली पदवी पर्यन्त शिक्षण घेतात नन्तर लग्न करतात .पण खेडेगावात आज आणि २०,२५ वर्ष पूर्वी जशी परस्थिती होती तशीच काही प्रमाणत बघायला भेटते . मुली गावात जेवढ्या वर्गा पर्यन्ता शाळा असेल तेव्हडेच शिक्षण घेत .आज पर्त्यक गावात १० वी पर्यंत शाळा आहे .म्हणून मुली १० वी पर्यंत शिकतात अपवाद ने काही मुली ना बाहेर शिक्षणा साठी जायला भेटते.पण त्याची संख्या बोटावर मोजण्या एवढी असते.मग बाकीच्या मुली काय करतात .??????
आज देखील खेड्यातील मुली या १८ वर्ष पूर्ण होण्या आधीच त्याचे लग्न करून दिले जाते .आणि लग्न करण्यचा पूर्ण निर्णय हा आई वडीलचा असतो.आणि हे मी स्वतहा आज देखील बघते. आणि माझी हीच खंत आहे आज मुलीना १२ वी पर्यन्त शिक्षण मोफत असतानी देखील मुलीना का शिकवले जात नाही? .का त्याच्या लग्नाची घाई केली जाते ?????
हे प्रेश्न मी अनेक आई वडिलांना विचारले आणि त्या वरील त्याचे उत्तर असे असतात.जे काही वर्षा पूर्वे होते .मुलीची जात आहे लिहिण्या वाचण्या पुरती शिकली ना.आणि मुख्य म्हणजे आई वडिलच्या मनातील भीती मुलगी कोणच्या प्रेमात तर पडणार नाही ना .आपल्या समजाच्या बाहेर लग्न तर करणार नाही ना .आणि याचे कारण अपवादाने एखाद्या मुलीनी घरातून पळून जाऊन प्रेम विवाह करणे त्या मुळे बाकीच्या मुली वरील बंधने वाढतात .आणि आपल्या मुलीनी असे काही करू नाही म्हणून त्याचा शेवट मुलीचे लवकर लग्न..........
माझी हीच खंत आहे कधी माझा खेड्यातील मुली त्यांना हवे तसे शिक्षण घेऊ शकतील.आणि आई वडील त्याच्या वर विश्वास ठेवतील .

फेब्रुवारी २०१४




















No comments :

Post a Comment