Tuesday, 27 January 2015

समजून घ्या थोडे


लग्न म्हणजे एक जुगार असे नेहमी बोलले जाते ,

पण विचार केला तर हे खरे आहे .जीवनसाथी जर चांगला असेल तर आयुष्य ख़ुशीने जाते .
नाही तर सगळेच बिघडते .आज काल अनेक मुले प्रेमविवाह करतात.कधी घरचे तयार असतात कधी नाही ,
अनेकदा एकाच जातीचे असून देखील केवळ परर्स्थिती मधील फरक असतो .मग घराचे तयार होत नाही.त्यात आईवडील फक्त आपल्या मुलाचे हित बघत असतात .उद्या जर काही प्रोब्लेम आला तर सासर भक्कम असावे हा हेतू असतोच .पण अनेकदा मुले ऐकत नाही ,त्याना आवडणार्या मुली बरोबर लग्न करतात .मुलाच्या हट्टा साठी आई वडील तयार होतात . पण पुढे जाउन मुलाने आपल्या मर्जी विरोधी जाउन लग्न केले म्हणून त्याच्या मनात कुठे तरी सुने बद्दल असतो .जर तिचे थोडे जरी चुकले तरी मग तिला नावे ठेवले जातात .तिला सगळे आले पाहिजे अशी अपेक्षा करतात .मग ते मुलाला सारखे ऐकवत असतात तुझी बायको अशी तशी आहे .तिच्या कोणत्या गोष्टीला नावे ठेवले जातात .या उलट ती मुलगी तुमचे आई वडील असे आहे तसे आहे .हे त्या मुलाला ऐकवत असते .या मध्ये मुलगा मुलीला खूप समजून घेतो ,आपल्या भरोशा वर हि आपल्याबरोबर लग्न करून आली आहे .त्या मुळे तो आपल्या बायकोला सपोर्ट करतो .पण या मुळे आई बापांना वाटते मुलगा खूप बदलला आहे .मग एकामेका बद्दल गैरसमज वाढत जातात . आणि मग आपल्या बायकोला समजून घेत नाही म्हणून मुलगा वेगळा होतो .खरे तर यात त्याची काही चूक नसते तरी मग बायको साठी आई वडिलांना सोडले म्हणून लोक त्याला नावे ठेवतात .
तर दुसरी बाजू असते मुलगा प्रेम असून घरचे ऐकत नाही म्हणून त्यांना आवडणार्या मुली बरोबर लग्न करतो .पण प्रेम असलेल्या मुलीला विसरू शकत नाही .मग तो फक्त नवऱ्याचे कर्तव्य करतो .पण अनेकदा जेव्हा सुनेचे आणि सासूचे पटत नाही तेव्हा मुलगा तुमच्या पसंतीची मुलगी आहे ना मग तुम्हीच 
बघा असे म्हणून शांत राहतो कोणालाच काही बोलत नाही .नवरा बाजू घेत नाही
म्हणून असे बायकोला वाटते ,तर मुलगा आईवडिलांची बाजू घेत नाही म्हणून आई 

वडील दुखी परिणामी वाद वाढत जातात .नको कटकट म्हणून मग नाविलाज म्हणून अलग घर करतात .या दोन्ही मध्ये फक्त त्रास होतो तो फक्त मुलाला .
खरे तर हि समस्या मोठी नसतेच पण फक्त समजून घेतले जात नाही म्हणून 
हे सगळे घडते .मुलाला मुलगी आवडली आहे ना मुलाच्या सुखात आपले सुख असे समजून मग तिला समजून घ्या ,
आई वडिलाचे ऐकून लग्न केले ना मग त्यांना पण समजून घ्या.आई वडील आपले चांगले करणार म्हणून थोडे समजून घेतले तर असे प्रोब्लेम होणार नाही .

असेच मनातले काही २८/१/१५ 

No comments :

Post a Comment