Sunday, 25 January 2015

असेच काही

"क्या हुआ रात के ग्यारह तो बजे है .मॉं तू भी ना !"किवा तुला काय समजते .?असे संवाद जेव्हा कानावर पडतात ना तेव्हा मनात येते .अरे मुलानो ,मुलीनो जमाना वाईट आहे .नका राहू जास्त वेळ घराबाहेर कामा शिवाय .काही अनिस्ट घडले तर तुमचा त्रास नाही बघवणार आम्हला .जेव्हा तुला काय समजते ?असे बोलले जाते तेव्हा .खरच आम्हाला काही समजत नाही पण आता तुला जे समजते किवा तुला जे जास्त समजते असे वाटते ते आम्हीच शिकवले आहे .दहा वेळा शिकवले समजावून सांगितले ना .मग तुम्ही सांगा ना आम्हाला समजावून ..अनेक घरात असे चित्र असते .आजच्या मुलांना सगळे फास्ट हावे असते .ते चुकत आहे असे वाटले तर आई वडील समजावण्याचा प्रयत्न करू बघतात पण त्यात यश येत नाही ,आमच्या वेळी नव्हते असे असे उद्गार निघतात मग एक जमाना होता आई वडील जे बोलातीला ते ऐकाण्याचा .असे का हे विचारायचे नाही .मग ते चूक असो कि बरोबर ,बोलण्याचा प्रयत्न केला तर तुला काय कळते असे ऐकायला लागत असे .आम्ही सांगतो ना हे अनुभवाचे बोल आहे .काळ बदलला विचार बदलले .नवीन नवीन तंत्रज्ञान आले .मागची पिढी जसे जमेल तशे नवीन तंत्रज्ञाना बरोबर जमवून घेत आहे .तशा प्रयत्न करत आहे .पण या नवीन पिढी बरोबर जुळवून घेताने त्याची दमछाक होते कि काय असे वाटते .

No comments :

Post a Comment