मला हे आवडत नाही मला ते आवडत नाही.मी स्पष्ट बोलतो /बोलते असे म्हणणारे अनेक जण भेटतात ना ? रोखठोक असणे वेगळे आणि स्वता मी हे आहे मी ते आहे बोलणे वेगळे.कारण अशी माणसे वेळे नुसार आपले धोरण बदलतात.पण रोख ठोक माणसे कोणती वेळ आणि परस्थिती असो त्यांच्या धोरणे बदलत नाही मग त्यांच्या समोर त्यांचे आपले जरी असेल तरी .काही व्यक्ती या स्वता आपण खूप मोठे आहे हे स्वताच सांगत फिरतात .काही व्यक्तीना ते आवडत नाही मग ते तसे बोलतात.पण अहंकाराने आंधळे झालेले असतात त्यांना वाटते आपण फार कोणी असून आपला मजाक उडवला आहे .कोणती व्यक्ती अचानक अशी वागत असते का ? नाही .आधी आपण तिला चांगले ओळखत असतो चांगले समजत असतो.{ती व्यक्ती चांगली आहे असा आपला समज असतो }पण अहंकारा मुळे अनेकदा आपल्या नेहमी बघण्यातील व्यक्ती अजीब वागू लागते किवा त्याचे नेहमीचे वागणे बदलते.त्याचे विचार बदलले बघून अनेकदा मग त्याचे वागणे बघून जवळचे लोक दूर जातात.असे का होते विचार केल्या वर मग लक्षात येते.व्यक्ती अचानक बदलत नाही तर ती ज्या लोका बरोबर राहते त्याचा तिचा वर प्रभाव पडतो एवढा कि ती व्यक्ती आपले विचार विसरून जाते आणि तिचा वर ज्याचा प्रभाव आहे त्याच्या सारखे बोलयला लागते.काय चूक काय बरोबर याचा विचार न करता. आणि मग त्या व्यक्तीचे जवळचे एक एके दूर होत जातात कधी हे त्या व्यक्तीला पण नाही समजत.
पण कोणता हि प्रभाव हा काही काळा साठी असतो.माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो.सगळे दूर गेलेले असतात ज्याच्या प्रभाव मुळे झाले तो देखील मग हातात काहीच राहत नाही .
पण कोणता हि प्रभाव हा काही काळा साठी असतो.माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो.सगळे दूर गेलेले असतात ज्याच्या प्रभाव मुळे झाले तो देखील मग हातात काहीच राहत नाही .
No comments :
Post a Comment