Sunday, 30 August 2015

कांदा पोहे

काल चितळे काकांनी कांदा पोहे या वर पोस्ट होती ना आज माझा अनुभव लिहिते आहे.
बी .ए ची परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या .मे महिना होता त्या मुळे कोणाचे ना कोणाचे लग्न असे.त्या दिवशी घरातील सगळे कोणाच्या ना कोणाच्या लग्नाला गेले होते.घरी मी एकटीच होते.आमच्या गावातील माझ्या वर्गात १० वी पर्यंत असणारा परंतु नापास झाला म्हणून शाळा सोडून घराचे काम करणारा धनगर समाज्याच माझा वर्गमित्र घरी आला.खरे तर तो मेंढ्या घेवून तो वर्षातील चार महिने दुसऱ्या गावाला फिरत असत.त्या मुळे त्यांच्या अनेकगावी ओळखी होत असत .बारा वाज्याच्या सुमारास तो घरी आला.त्याने बघितले आज घरी कोणी नाही.तो मला बोलला एक मुलगा आला आहे मी त्याला बोलावले आहे तुला बघायला.घरी तर कोणी नाही पण तो मुलगा आता एवढा लांब वरून आला आहे तर आपण बघण्याचा कार्यक्रम करू या ना ? काही नाही तू चहा आणि पोहे कर ते काय विचारातील ते सांग बाकी बघू नन्तर,मी त्यला सांगितले ठीक आहे.
"पण ते पाटावर वैगरे मी नाही बसणार सांगते आधीच ",एक तर मला असे कोणी कधी बघयला आले नाही .तो बोलला ठीक आहे.
काही वेळाने तो दोन मुला बरोबर येतानी दिसला त्या तिला एक असेल माझ्या अठरा एकोणवीस वर्षाचा आणि दुसरा चोवीस पंचवीस वर्षाचा .त्या मुळे मला समजले कोणता मुलगा बघयला आला आहे.त्याला दूर वरून बघून मी ठरवले हा आपल्याला तर पसंत नाही.कारण त्याची उंची दूरवरून बघून कमी आहे हे माझ्या लक्षात आले.आणि अचानक गम्मत करण्याची माझ्या मनात आले.
एक तर दुपार आमच्या कडे चुलीवर सगळा स्वयपाक होत असे.आता एवढ्या
उन्हात चूल पेटवायची आणि चहा पोहे करायचे खरच कंटाळा आला होता .
म्हणून मी ते जसे आले तसे मी समोर गेले नमस्कार वैगरे केला.बसयला दिले.
पाणी दिले.आणि त्यांच्या समोर बसले.ते बघून मी घाबरण्या एवजी तोच घाबरला.मला काही विचारणार त्या आधीच मी सांगितले.
माझे नाव.जन्मतारीख ,शिक्षण.आणि त्याला विचारले .
तुझे नाव काय ?
तुझे बोलल्या मुळे त्याची अजून त त प प झाली.
त्यांनी मला काही विचारण्या एवजी मीच त्याला खूप प्रश्न विचारले.
मी असे काही वागेल आणि माझा तसा स्वभाव नसल्या मुळे माझा वर्ग मित्र
थोडा वेळ शॉक झाला.पण नंतर त्याला खूप हसायला येत होते.शेवटी बिचारा तो मुलगा त्याला बोलला चाल आपण आता जाऊ यांच्या घरी कोणी असेल तेव्हा येऊ.आणि तो उभा राहिला मी लगेच बोलले अरे बसा ना ? मी चहा करते.
मी चहा नाही घेत .तो मुलगा बोलला
मग थांबा मी पोहे करते .मी बोलले
मला पोहे नाही आवडत तो मुलगा पटकन बोलला.
मग जेवण करा.नाही नका आम्ही जेवण करून आलो.
असे बोलून तो मुलगा घरच्या बाहेर देखील पडला.
मला खूप हसू येत होते.पण लगेच भीती पण वाटली आता आई काय म्हणाले.
आणि झाले तसे आई घरी आली तिला वर्ग मित्रा ने सांगितले.आई खूप चिडली .आता लोकांना माहिती होणार तू कशी मुलगी आहे.काही अक्कल आहे का नाही ?असे वागतात का ?खूप काही ऐकयला लागले.
नंतर वर्ग मित्राने सांगितले खूप घाबरला होता तो असे मुली अजून तरी मुलांना प्रश्न विचारत नाही .पण मला खूप बरे वाटले होते नेहमी काय मुलीनी खाली मान घालून बसायचे.प्रश्नाचे उत्तरे द्याचे म्हणून.
आज चितळे काकाच्या पोस्ट मुळे सगळे आठवले /

No comments :

Post a Comment