Sunday, 30 August 2015

माझ्या फेसबुक पोस्ट


कधी कधी आपल्यला एकटे राहायचे नसते आणि कोणाशी बोलायचे पण नसते मग काय करावे समजत नाही बरोबर असणारे कोणी तरी काही तरी विचारत असते.आपण बोलायचे म्हणून बोलत असतो.होते ना कधी कधी असे पण 



प्रत्येक घराला एक दार असते.आणि त्या दाराला असतो एक उंबरा ,
उंबरा म्हणजे असतात एक मर्यादा ,काही बंधने ........
आपण उंबऱ्याच्या आता जे असतो तसे आपण जगत असतोच असे नाही .
उंबऱ्याच्या आता असते एक सुरक्षित असे आपले आपल्याला हवे असलेले आपले जग.नाही का ?



आयुष्यात कधी कधी अंधार आणि एकटे पणा बरा वाटतो.
स्वतावर विस्वास नसतो का दुसऱ्यावर माहिती नसते .
स्वताच्या नकळत मनाचे दरवाजे बंद केलेले असतात .
स्वत: शिवय तिथे कोणाला प्रवेश नसतो .
कधी तरी कोणी दरवाज्यावर येते.टकटक होते ती मना पर्यंत 
पोहोचते.पण बाहेरून कोणाला आता येऊ द्यावेशे वाटत नाही.
मनाच्या हा आणि ना मध्ये मग थोडे दार किलकिले करून
बघावे वाटते.आत येणारा खरच विस्वास ठेवण्या सारखा असेल का ?
मनाचे मनाशी द्वंद्व चालू असते .
येणाऱ्याला आत येऊ देण्यास मन घाबरत असते .
त्याने यावे हे पण वाटत असते .
तरी मन घाबरत असते ,कारण मनाचे खेळ असतात .
जे कधी संपत नाही .
असेच मनातले काही




भूतकाळातील हाल आपेस्टा आठवतात तेव्हा हे सगळे आपण सहन करून आलो .याचे आज आश्यर्य वाटते .मग आजचा वर्तमान भूत काळा पेक्षा नक्कीच चांगला आहे असे वाटते .कारण ये तो वक्त वक्त कि बात होती है !






कधी तरी मनात नसतानी काही तरी घडते.त्याचा असर खोलवर होतो.नंतर कोणती गोष्ट करातांनी मनात भीती बसते .नकळत आत्मविश्वास कमी होतो गेलेला आत्मविस्वास परत येण्यास खूप वेळ लागतो



अनेकदा काही माणसे दु:खाची रडगाणे गात बसतात.
. पण ते कधी विचारच करत नाही आपण का दु:खी आहे .
अनेकांच्या दु:खाचे कारण असते अति अपेक्षा ,एखादी गोष्ट दुसर्या कडे आहे मग ती आपल्या कडे हवीच हा अट्टाहास आणि मग येते ती ओढा ताण आणि त्या मुळे येणारी 
निराशा ,खरच आपल्याला कशाची गरज हे ओळखले पाहिजे म्हणजे झाले .
म्हणजे दु:ख होणारच नाही .....

No comments :

Post a Comment