उद्या श्रावणातील पहिला सोमवार ,
प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करायची आवड असते.मला आवड आहे शिव पूजा करण्याची.
मी खरे तर अति देवभोळी अजिबात नाही पण मला आवडते पूजा करणे.लग्ना आधी मातीचे घर होते मग काय सोमवारी सकाळी लवकर उठून शेणाने जमीन सरावाने अगण भर सडा टाकणे.त्यावर रांगोळी काढणे.काही न खाता उपवास करणे.गावाच्या दुसर्या टोकाला असलेल्या मंदिरात जाणे हे माझे आवडते उद्योग असायचे.पूर्ण महिना कोणता ना कोणता उपवास आणि पूजा असे.
त्याकाळी घरोघर खेड्यात तरी टीव्ही कमीच होते.त्यामुळे श्रावणात कोणाकडे ना कोणाकडे नवनाथ हे ग्रंथ वाचला जात असे .दिवसभर शेतात काम असे म्हणून हे पोथीवाचन रात्री असे.ते ऐकायला शेजारी जमत.दरवर्षी तीच पोथी परत परत ऐकतानी कंटाळा देखील येत नसे.घरात पोथी आणि नंतर आरती होते असे त्या मुळे त्या कधी पाठ करायला लागले नाही.
आजूबाजूच्या वातावरणाचा नकळत असर होतो आपल्यावर.पूर्ण महिना किती छान वातावरण असे. त्यावेळी मोठे सांगतील ते ऐकण्याचा जमाना
होता त्यामुळे उपवास का करायचा त्याने काय होते असे कोणी विचारात नसत.श्रावण पाळत सगळे.काय होते श्रावणात नॉनव्हेज खाल्ले तर "आम्ही खातो आमचे मुले नाही राहू शकत खाल्ल्या शिवाय "असे कोणी म्हणत नसत .मोठ्या माणसांचा एक आदर असायचा ,
लग्न झाले आणि मुंबई सारख्या शहरात आले.आणि ज्या दिवशी नॉनव्हेज नाही खात तो दिवस उपवास हे नवीन समजले.
आजूबाजूचा असर नकळत होत गेला.हिंदू म्हणण्या पेक्षा मराठी लोक बिल्डींग मध्ये नावाला होते.मग काय कोणता उपवास लक्षात ठेव्तानी कालनिर्णय वर मोठे दिसतील असे गोल मारून ठेवायला लागत असे.आयुष्यात खूप काही बदलत गेले,आणि देवावरील विस्वास उडत गेला.सगळे उपवास सोडून दिले.पण किती काही असले तरी श्रावण महिना मात्र आज पण आवडतो.
खूप फुले आणणे हार बनवणे.घरात पोथी वाचन करणे हे मात्र आज पण मना पासून करते.
असेच मनातले काही
१६/८/१५
प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करायची आवड असते.मला आवड आहे शिव पूजा करण्याची.
मी खरे तर अति देवभोळी अजिबात नाही पण मला आवडते पूजा करणे.लग्ना आधी मातीचे घर होते मग काय सोमवारी सकाळी लवकर उठून शेणाने जमीन सरावाने अगण भर सडा टाकणे.त्यावर रांगोळी काढणे.काही न खाता उपवास करणे.गावाच्या दुसर्या टोकाला असलेल्या मंदिरात जाणे हे माझे आवडते उद्योग असायचे.पूर्ण महिना कोणता ना कोणता उपवास आणि पूजा असे.
त्याकाळी घरोघर खेड्यात तरी टीव्ही कमीच होते.त्यामुळे श्रावणात कोणाकडे ना कोणाकडे नवनाथ हे ग्रंथ वाचला जात असे .दिवसभर शेतात काम असे म्हणून हे पोथीवाचन रात्री असे.ते ऐकायला शेजारी जमत.दरवर्षी तीच पोथी परत परत ऐकतानी कंटाळा देखील येत नसे.घरात पोथी आणि नंतर आरती होते असे त्या मुळे त्या कधी पाठ करायला लागले नाही.
आजूबाजूच्या वातावरणाचा नकळत असर होतो आपल्यावर.पूर्ण महिना किती छान वातावरण असे. त्यावेळी मोठे सांगतील ते ऐकण्याचा जमाना
होता त्यामुळे उपवास का करायचा त्याने काय होते असे कोणी विचारात नसत.श्रावण पाळत सगळे.काय होते श्रावणात नॉनव्हेज खाल्ले तर "आम्ही खातो आमचे मुले नाही राहू शकत खाल्ल्या शिवाय "असे कोणी म्हणत नसत .मोठ्या माणसांचा एक आदर असायचा ,
लग्न झाले आणि मुंबई सारख्या शहरात आले.आणि ज्या दिवशी नॉनव्हेज नाही खात तो दिवस उपवास हे नवीन समजले.
आजूबाजूचा असर नकळत होत गेला.हिंदू म्हणण्या पेक्षा मराठी लोक बिल्डींग मध्ये नावाला होते.मग काय कोणता उपवास लक्षात ठेव्तानी कालनिर्णय वर मोठे दिसतील असे गोल मारून ठेवायला लागत असे.आयुष्यात खूप काही बदलत गेले,आणि देवावरील विस्वास उडत गेला.सगळे उपवास सोडून दिले.पण किती काही असले तरी श्रावण महिना मात्र आज पण आवडतो.
खूप फुले आणणे हार बनवणे.घरात पोथी वाचन करणे हे मात्र आज पण मना पासून करते.
असेच मनातले काही
१६/८/१५
No comments :
Post a Comment