Sunday, 30 August 2015

काय केले फेसबुक ने ?

काय केले फेसबुक ने ?
आमच्या  सारख्या  अनेकांना स्वताचे विचार {हुशारी किवा अक्कल }मांडण्याची 
संधी दिली.कधी काळी घराचे दारे सकाळी उघडली ती रात्री झोपतानी बंद होत असत.हळूहळू बदल होते गेले.कुटुंब छोटे होत गेले.माणसे आत्मकेंद्रित होत गेले.
चाळीत राहणारी एकमेकांना मदत करणारी एकमेकाची सुखदुख वाटून घेणारी माणसे हळूहळू चाळीतून फ्लैट संस्कृती मध्ये बंदिस्त झाले.नावा एवजी फ्लैट नंबर आणि फ्लोअर नंबर ने ओळखायला लागले.
सगळ्या सुखसोयी तर आल्या छान घरे झाली.पण माणूस मात्र एकटा झाला.
चाळीतील आणि आपल्या गावातील आठवणीत रमू लागला.पण माणसाला हवे असते बोलायला कोणी.मग टीव्ही किती बघणार ,माणसाला आनंद झाला तरी तो सांगायला कोणी हवे असते दु:ख झाले तरी ते सांगायला कोणी हवे असते.
फ्लैटस  संस्कृती मुळे मानसिक आजार वाढले हे काही दिवसा पूर्वी पेपर मध्ये आले होते.आणि या सगळ्यातून एक आधार सापडला तो म्हणजे फेसबुक .

फेसबुक मुळे आपले विचार जसे मांडण्याची संधी भेटली तशी,माणसे जमवण्याचा छंद असणारया माणसांना खूप समवयस्क आणि छान मित्र भेटले.
आपण आहे आपली विचार पूस करणारे कोणी आहे.याचे समाधान भेटले.
"हि अभाशी जगातली मैत्री खूप छान आहे.येथे नाही कोणी गरीब,नाही कोणी
श्रीमंत.ना कोणी कोणत्या धर्माचा,ना कोणत्या जातीचा,कोण शहरातले कोण खेड्यातले.कोणी छोटे कोणी मोठे."म्हणून हि मैत्री सुंदर आहे.
माझ्या सारख्या घरात राहणाऱ्या  गृहिणी आज आपले विचार मांडू शकतात.
ते फेसबुक मुळे.खूप सारे छान फ्रेंड भेटले.आपल्या राज्यातील काना कोपऱ्यातील
जिथे मी कधी जाणार नाही,गेले नाही.अशी अनेक माणसे भेटली जी मला कधी भेटली असती ती भेटली फेसबुक मुळे .......
असेच मनातले काही ...
!!!!आशा !!!! २३/७/१५

No comments :

Post a Comment