आजूबाजूला अनेक स्वभावाचे लोक आपल्याला दिसतात किवा असतात.
प्रत्येकाची आवडी वेगळ्या वेगळ्या असतात.कोणाला काय आवडते कोणाला काय.प्रत्येकाचे मते वेगवेगळी आणि त्या मुळे मी बरोबर असे विचार दिसतात.
हे झाले वास्तव जगातले येथे जेव्हा मते वेगवेगळे येतात तेव्हा आपण त्याला चर्चा म्हणतो.येथे आपण कधी टोकाचे म्हणजे तुझे आता तोंड पण बघणार नाही असी भूमिका कधी नसते .
पण या आभासी जगात असे होते का ?
याचे उत्तर अनेकदा नाही असे येते.येथे वर्तमानात जगणारे अनेक आहे.तसे काही निष्पन्न न करणार्या भूतकाळात रमणारे देखील आहे.वर्तामानात जगणारे नेहमी आजचा विचार करतात मग त्यांच्या पोस्ट देखील तश्या येतात.तर काहीना इतिहासात रमायला आवडते मग आज ज्याचा काही फायदा नाही अश्या विषयावर ते पोस्ट टाकतात.ते मग इतिहासातील कोणत्यातरी व्यक्तीचे भक्त असतात किवा त्यांच्या वर त्यांचा प्रभाव असतो.त्यांना वाटते बाकीच्यांनी पण त्यांना वाटते तसेच वाटावे.पण असे होत नाही.मग आज आणि काल अशा वाद रंगतो.आणि अनेक दिवस एकमेकाचे फेसबुक मित्र हे एकमेकांना ब्लॉक करतात.
तर काही अतिशय संवेदना शील लेखन करतात.कोणाच्या पण डोळ्यात पाणी आणणारे त्यांचे लेखन असते.हे लोक जगत मित्र असल्या सारखे असतात.यांच्या पोस्ट वर सहसा वाद होताना दिसत नाही. ते असतात आणि नसतात असे येथे वावरत असतात.त्यांना सगळे ओळखत असतात.त्यांना कधी कोणी ब्लॉक करत नाही.वास्तव जगातल्या सारखे येथे पण अनेक जन "बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ "असे पण असतात.मग ते काही तरी वादग्रस्त पोस्ट टाकतात.आणि चूप बसतात मग अनेक जण त्यावर कॉम्मेंत करत बसतात.आणि हि व्यक्ती फक्त मजा बघत असते.
अनेक जन विचारवंत असल्या सारखे काही तरी लिहितात.ते जे लिहितात ते अजिबात सामान्य बुद्धीच्या लोकांना समजत नाही.त्यांचे लिखाण मध्ये एक वेगळा विचार असतो वरवर साधे वाटणारे हे लिखाण असते.पण ते सरळ नसते.त्यांना खूप काही सुचवायचे असते,पण सगळे विचारवंत नसतात त्या मुळे प्रचंड गोंधळ होतो.त्यातील विचार राहतो बाजूला आणि विषय नको तिकडे जातो.मग पोस्ट करणारी व्यक्ती आता काय बोलू म्हणून शांत बसते.आणि बाकीचे उगाच हे असे ते असे म्हणून कॉम्मेंत मध्ये वाद घालत बसतात.
खरेच फेसबुक मानवी स्वभावाचे एक न उलगडणार कोडे वाटते कधी कधी ...........
असेच मनातले काही
!!आशा !!
प्रत्येकाची आवडी वेगळ्या वेगळ्या असतात.कोणाला काय आवडते कोणाला काय.प्रत्येकाचे मते वेगवेगळी आणि त्या मुळे मी बरोबर असे विचार दिसतात.
हे झाले वास्तव जगातले येथे जेव्हा मते वेगवेगळे येतात तेव्हा आपण त्याला चर्चा म्हणतो.येथे आपण कधी टोकाचे म्हणजे तुझे आता तोंड पण बघणार नाही असी भूमिका कधी नसते .
पण या आभासी जगात असे होते का ?
याचे उत्तर अनेकदा नाही असे येते.येथे वर्तमानात जगणारे अनेक आहे.तसे काही निष्पन्न न करणार्या भूतकाळात रमणारे देखील आहे.वर्तामानात जगणारे नेहमी आजचा विचार करतात मग त्यांच्या पोस्ट देखील तश्या येतात.तर काहीना इतिहासात रमायला आवडते मग आज ज्याचा काही फायदा नाही अश्या विषयावर ते पोस्ट टाकतात.ते मग इतिहासातील कोणत्यातरी व्यक्तीचे भक्त असतात किवा त्यांच्या वर त्यांचा प्रभाव असतो.त्यांना वाटते बाकीच्यांनी पण त्यांना वाटते तसेच वाटावे.पण असे होत नाही.मग आज आणि काल अशा वाद रंगतो.आणि अनेक दिवस एकमेकाचे फेसबुक मित्र हे एकमेकांना ब्लॉक करतात.
तर काही अतिशय संवेदना शील लेखन करतात.कोणाच्या पण डोळ्यात पाणी आणणारे त्यांचे लेखन असते.हे लोक जगत मित्र असल्या सारखे असतात.यांच्या पोस्ट वर सहसा वाद होताना दिसत नाही. ते असतात आणि नसतात असे येथे वावरत असतात.त्यांना सगळे ओळखत असतात.त्यांना कधी कोणी ब्लॉक करत नाही.वास्तव जगातल्या सारखे येथे पण अनेक जन "बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ "असे पण असतात.मग ते काही तरी वादग्रस्त पोस्ट टाकतात.आणि चूप बसतात मग अनेक जण त्यावर कॉम्मेंत करत बसतात.आणि हि व्यक्ती फक्त मजा बघत असते.
अनेक जन विचारवंत असल्या सारखे काही तरी लिहितात.ते जे लिहितात ते अजिबात सामान्य बुद्धीच्या लोकांना समजत नाही.त्यांचे लिखाण मध्ये एक वेगळा विचार असतो वरवर साधे वाटणारे हे लिखाण असते.पण ते सरळ नसते.त्यांना खूप काही सुचवायचे असते,पण सगळे विचारवंत नसतात त्या मुळे प्रचंड गोंधळ होतो.त्यातील विचार राहतो बाजूला आणि विषय नको तिकडे जातो.मग पोस्ट करणारी व्यक्ती आता काय बोलू म्हणून शांत बसते.आणि बाकीचे उगाच हे असे ते असे म्हणून कॉम्मेंत मध्ये वाद घालत बसतात.
खरेच फेसबुक मानवी स्वभावाचे एक न उलगडणार कोडे वाटते कधी कधी ...........
असेच मनातले काही
!!आशा !!
No comments :
Post a Comment