Sunday, 30 August 2015

अधिक वाण आणि मरण

मागच्या आठवड्यात एक बातमी अनेकानी वाचली असणार ,"एका विवाहित प्राध्यापिकेस अधिक महिन्यातील आहेराच्या हट्टापायी जाळून मारण्याचे प्रयत्न कण्यात आले ."त्यात ती गंभीर भाजली .........
या बातमी मुळे अनेक जन दुखी झाले .तश्या प्रतिक्रिया पण सोशेल मिडीया वर 
उमटल्या .........अनेक कायदे आज महिलांच्या बाजूने असून देखील एक शिकलेले घरातील लोक असून देखील असे कृत्य कसे करतात .ते पण एक कमावती बायको असतानी ....असे का होते याचे मूळ आजूबाजूच्या समाजात दिसून येते.आता अधिक मास आहे.म्हणजे जावयाला वाटते आपल्याला सासरच्या लोकांनी आपल्याला बोलवावे आपला मान पान करावा,अनेक जावई खूप समजदार असतात.जे देतील त्यात खुश होतात.आपल्या आई वडिलांना सारखा मान ठेवतात.तर काही सासू सासरे स्वताची परस्थिती जर चांगली असेल तर जावयाला भरपूर काय काय देतात.मग काहीना त्यात जास्त अभिमान वाटतो.मग ते मला हे मिळाले ते मिळाले हे सगळ्यांना सांगत बसतात.परंतु त्याचा परिणाम कधी कधी वेगळा होवून देखील जातो.मग आपल्या सासू सासऱ्याची परस्थिती नसतानी देखील त्यांचा कडून अपेक्षा केली जाते.मग आपली बायको किती कमवते किती चांगली याचा विसर पडतो.त्यांना फक्त आठवतो आपला मान पान,आपण किती शिकलो आहे किती कमवतो आहे,मग बाकीच्यांना एवढे भेटले तेवढे भेटले.कुठे तरी इगो दुखावतो मग तो राग निघतो निष्पाप मुलीवर.
अश्या गोष्टी घडतात त्या पण आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या मानसिकते मुळे स्वताचा मोठे पण दाखवण्याची हौस असते.मग आपल्याला हे भेटले ते भेटले हे सांगत सुटतात.पण कोणी अश्या प्रथा बंद होयला पाहिजे म्हणून प्रयत्न करातांनी दिसत नाही.उलट काहीनी तर येथे फेसबुक वर काय भेटले त्याचे फोटो टाकले.
अनेक मुली आज शिकतात स्वता कमवतात त्यांना जर त्रास झाला तर त्या सरळ वेगळ्या होतात.तेव्हा त्यांना नावे ठेवले जातात.पण ज्या एकदा लग्न झाले तेच आपले घर हे मानतात त्यांना मग असे जाळून जायला लागते.मग किती कडक कायदे करा नाही तर काही करा ..
{बायकांच्या बाजूने कायदे आहेत काही त्याचा चुकीचा उपयोग करतात.पण सगळ्या तश्या नसतात हे अश्या घटना मधून दिसते.काही घटना मोठ्या प्रमाणात होतात तेव्हा माहिती पडतात.पण अश्या अनेक असतील त्रास सहन करत ज्यांचे दुख कधी जगा समोर येत नाही }

No comments :

Post a Comment