Wednesday, 26 August 2015

आयुष्य हे क्षणभंगुर आहे.
हे तर सगळ्यांना माहिती असते तरी सुद्धा या छोट्या आयुष्यात आपल्यला किती अहंकार ,गर्व ,स्वाभिमान आणि काय काय असते.आपण खूप काही कमावतो.अमाप पैसा ,बंगला गाडी आणि काय काय ?पण खरच आपण काही बरोबर घेवून जातो का ?नाही मग तरी आपण का माणूस असून अनेकदा माणुसकी नसल्या सारखे वागतो.खरी संपत्ती असते ती आपण आपल्या आजूबाजूला निर्माण केलेली मायेची माणसे ,अशी माणसे जी आपण गेल्यावर सुद्धा आपल्याला विसरत नाही.
छोटे आयुष्य असते त्यात मीच महान म्हणून आपण अनेकदा समोरच्याला समजून न घेता.त्याला काय म्हणायचे आहे हा विचार न करता अनेकदा खूप नावे ठेवून घेतो.कारण आपला अहंकार दुखावला जातो.पण जर हाच अहंकार बाजूला ठेवला तर ? नात्यात कधी दुरावा येणार नाही.
नाही का ???
असेच मनातले काही

No comments :

Post a Comment