Sunday, 30 August 2015

."वारी कालची आणि आजची

."वारी कालची आणि आजची 
फेसबुक वर गेले काही दिवस आपण अनेक वारीला विरोध करणाऱ्या नावे ठेवणाऱ्या पोस्ट बघितल्या म्हणून काही लिहावे वाटले.
वर्षानु वर्षाची चालत आलेली वारकरी संप्रदायाची परंपरा म्हणजे वारी .
आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला जावे आपल्या देवाला डोळे भरून बघावे हि इच्छा असते.आता आजची वारी आणि पूर्वीची वारी जमीन आस्मानचा फरक पडला आहे .
पूर्वीच्या काळी वाहतुकीचे साधने नव्हते शेतात .पेरण्या झालेल्या असत.एकत्र कुटुंब पद्धती होती.चौदा पंधरा वर्षाचे असतानी लग्न होत असत.वयाच्या विसाव्या वर्षी अनेक जण बाप झालेले असत .वयाच्या चाळीसाव्या वर्षी आजोबा देखील.घरातील सगळे कामे आता मुले सांभाळण्यास समर्थ झालेली असत .मग असी माणसे आता आपण देवदेव करावा आपल्या दैवता ला भेटायला जावे .आजच्या सारख्या तेव्हा गाड्या नव्हत्या.मग दोन कपडे आणि थोडे पैसे घेवून लोक वारीला जात असत.स्वताचे सामान स्वता उचलत असत.अनेक गावात त्यांना जेवण दिले जात असे अनेक गावात फक्त पीठ किवा भाज्या मग वारीतील महिला स्वाता चूल बनवून स्वयापक करत.जातानि चालत जाणारी हि लोक येतांनी देखील चालत येत असत.त्या मुळे पूर्वीच्या काळी वारीत जाणऱ्या
लोकांची संख्या देखील कमी असे.ज्या गावात मुक्काम त्या गावातील लोक त्यांची व्यवस्था ठेवत असत.त्या मुळे आजच्या सारख्या समस्या तेव्हा नव्हत्या .धार्मिक गोष्टी कीर्तनातून प्रवचनातून ऐकायला मिळत .हेच कारण असे वारीला अनेक लोक जात.वारी आजची ....
आज अनेक वाहतुकीचे साधने झाले.कुठे जायचे तर झटपट जाता येते.
आज कुटुंब छोटे झाले.शेती हा मुख्य व्यवसाय न राहता आता नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणत झाला .शहर संस्कृती आली.मग नेहमी काम आणि बंद दाराच्या या संस्कृती मधून काही दिवस बाहेर जावे म्हणून अनेक जण देवस्थानाला भेट देतात.त्या पैकी एक म्हणजे आषाढ वारी.आणि तिला प्राप्त झालेले प्रशिद्धीचे वलय या मुळे दर वर्षी लोकांची वाढणारी संख्या हि नेहमी जास्त होत आहे .
त्यातून वारी सुरु होण्या आधी पासून मिडियाने घेतलेली दाखल हे पण एक कारण आहे वारीत जाणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे .प्रत्येक ठिकाणावरून अनेक छोट्या मोठ्या दिंड्या जातात .त्यांच्या बरोबर असतात.टेम्पो त्या मुळे पूर्वी सारखे सामान डोक्यावर घेयला लागत नाही.अगदी जेवण्याच्या सामाना पासून ते पाण्याच्या बाटल्या पर्यंत सगळ्या सोयी असतात.वारीला मिळालेली प्रशिद्दी या मुळे गावोगाव जेवण्याची सोय असते.पूर्वीची गावे आता मोठी शहरे झाली आहे.वारीचा सन्मान ठेवला जातो पण त्याच वेळी काही मुलभूत सुविधा वर ताण पडतो.मग ज्या गावा मधून हि वारी पुढे जाते तिथे मागे ठेवून जाते घाण आणि कचरा ,वारीचे उत्साहाने स्वागत करणारे अनेकदा त्या उत्साहाने साफ करतातच असे नाही मग खूप दिवस मागे राहतात त्याचे निशाण ..
तो गेला म्हणून मी गेलो असे अनेक जण जाणारे आहे.तुळशीची माळ घालून जाणारे आधी वारकरी दिसत आता अनेक कानात हेडफोन घालून जाणारे देखील दिसतात.वर्षानु वर्ष जाणारी हि वारी आहे आणि त्यात दर वर्षी वारकर्याची संख्या वाढत आहे हे सरकारला माहिती असते.वारी कोणत्या गावातून जाणार हे वेळापत्रक आधीच ठरलेले असते.मग त्या प्रमाणात मुलभूत गरजा असतात त्यांची सोय त्या प्रमणात का केली जात नाही.वारकरी देखील पेपर प्लेट आणि पाण्याच्या बाटल्या कुठे का फेकतात.वारी मध्ये आपण जात आहे तर कोणते व्यसन करून जावू नाही मग ते काही असो असे नियम का पाळत नाही त्या मुळे वारी कारण नसतानी बदनाम होते याची जाणीव का ठेवली जात नाही.
"वारी म्हणजे उत्साहा ,वारी म्हणजे तुकाबाचे अभंग ,वारी म्हणजे विठू माउलीचा गजर ."









2}वडील माळकरी विठ्ठल भक्त त्या मुळे नेहमीच त्याचा एकादशी उपवास असे.
बाकी करतात तसाच मी खिचडी खायला भेटवी म्हणून उपवास करत असे.
पण त्या दिवशी घरात आणि आजूबाजूल एक वेगळेच वातावरण असे.
बहुतेक मी लहान असतानी सगळ्याची घरे हि मातीची होती.त्या मुळे एकादशी असेल तेव्हा सकाळी लवकर उठायचे घराच्या भिंती आणि जमीन शेणाने सरावायची पूर्ण अंगणभर शेणाने सडा टाकायचा.एक वेगळे वाटत असे. मग त्या ओल्या सारवलेल्या जमिनी वरून घरात ये जा करत असू मग आई ओरडत असे.पण आमचे लक्ष खिचडी कधी होते या कडे असे.परस्थिती मुळे थोडी बनवली जात आणि मला जास्त हवी म्हणून आम्ही हट्ट करत असू.मग आई बिचारी स्वताला थोडी ठेवी.आज खिचडी भरपूर आहे पण खाऊ वाटत नाही.
असेच असते ना ?असते तेव्हा ते नको वाटते .

No comments :

Post a Comment