Sunday, 30 August 2015

अधिक मास

अधिक मास तीन वर्षातून एकदा येणारा महिना ,
आपण नेहमी एक म्हण ऐकतो.दुष्काळात तेरावा महिना .
जुने लोक हि म्हण का वापरात असतील .कदाचित त्या मुळे पाउस लेट 
होत असेल शेतात पीक उशिरा येत असेल आणि तो पर्यंत काय असे देखील असेल ना ?
पण या पेक्षा या महिन्यात जावयाला वाण {आमच्या कडे ज्याला धोडा खायला बोलावणे म्हणतात }देण्याची पद्धत आहे .
अधिक मास हा जास्त करून चैत्र ते अश्विन या महिन्याच्या जागे वर येतो .
अनेकांचे लग्न तुळशीच्या लग्ना नंतर ते आषाढ महिन्या पर्यंत होतात.
म्हणजे ज्या वर्षी अधिक मास आला त्या वर्षीच जर आपल्या मुलीचे लग्न झालेले असेल तर ,त्या मुलीचे आई वडील हे गरीब असतील लग्नातच जर त्यांनी मुश्किलीने खर्च केला असेल आणि त्याच वर्षी जर अधिक मास आला तर
जावयाला वाण दयायला लागतोच पण त्या बरोबर मुलीच्या सासू सासरे ,नणंद यांना पण जेवायला बोलवावे लागते.मग त्यांना खरच प्रश्न पडतो .जावई समजदार असेल तर काही नाही पण कधी कधी लग्नात एखादी मागणी बाकी असते ती आठवते.ती पण हवी असते मग .
यात पण गम्मत असते जावयाला बोलवायचे पण कधी कधी सासर्यला वाटते मी म्हणजे खूप मोठा ,तर कधी जावायला वाटते मी जावई आहे माझा मान जास्त
ठेवायला पाहिजे.मग या दोघा मध्ये बिचारी मुलगी कोणाची बाजू घेऊ .
असे होते तिला .........
त्यात नन्तर त्या मुलीला ऐकायला लागते काय पण कपडे दिले किवा काय भांडी दिली .मग त्या वस्तू शेजारी पाजारी दाखवून मुलीला ऐकवले जाते .
कधी कधी वाटते का आहे अश्या प्रथा ..

२/७/१५ 

No comments :

Post a Comment