प्रवास म्हटले कि अलग अलग अनुभव येत असतात.वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतात.काही तासाचा प्रवास पण खूप काही अनुभव येतात.माणसातील माणुसकी दिसते तसे माणसातील अहंकार सुद्धा दिसतो.माणसांना काही न समजणारे लोक देखील भेटतात.
थोड्या दिवसा पूर्वी नाशिक रोड वरून सकाळी सकाळी सेवाग्राम एक्प्रेस पकडली .नागपूर वरून येणारी हि ट्रेन आधीच भरून आली होती त्यात महिला डबा हा अतिशय लहान असल्या मुळे जागा नव्हती.एका बाकावर पूर्ण एक मुस्लीम परिवार बसलेले होते.त्यांना रिक्वेस्ट केली आणि थोडी जागा भेटली .काही तर जागा नाही म्हणून खाली बसले होते तर काही बायका झोपल्या होत्या.नागपूर वरून आलेल्या त्या बायका सगळ्या एकमेकीना छान ओळखायला लागल्या होत्या.कोणाची कोणा बद्दल काही तक्रार नव्हती.
इगतपुरी स्टेशन आले सगळ्यांना भूक लागली होती म्हणून कोणीं ना कोणी काही ना काही घेण्याचे ठरवले.कोणी चहा घेतला कोणी वडापाव,कोणी भजी
पाव घेतले .पाण्याच्या बाटल्या घेतल्या.ट्रेन येथे जास्त वेळ थांबते म्हणून .
आणि तेव्हाच तीन मुले आणि एक पस्तिशीची महिला अतिशय भारी कपडे महागडे घड्याळ हातात महागडा मोबाईल मुलाच्या हातात tab. तिची आई बरोबर डब्यात चढली.आल्या बरोबर स्वताची जड ब्याग धडकन खाली ठेवली ती एक बाईच्या पायावरच तो ओरडली नन्तर ती काढली आणि सुरु झाला तिचा आरडा ओरडा .थोडे सरका जागा द्या.पण जागा नाही तर कुठून देणार तिला.मग ती मग मुलांना बोलली वरती जिथे झोपायची जागा असते तिथे जाऊन बस.
तो मुलगा वरती चढत असतानी त्याचं पायात बूट तसेच होते सगळे काही ना
काही खात होते.त्या मुळे बूट काढून वरती चढ सांगत होते पण ती बाई "आम्ही कार मधून आलो आहे " असे उत्तर दिले .तिचे हे वागणे बघून एक बाई बोलली
मग कार मधेच जायचे का आली ट्रेन मध्ये.त्यावर ती काय वाटेल ते बोलायला
लागली.सारखी हालचाल त्या मुळे कोणाचा पाव पडला कोणाचे भजे पण कोणी तिला काही बोलले नाही .पण ती सारखी बडबड करत होती.काय बायका आहे सरकत नाही हे नाही ते नाही .सगळ्या कडे ती अगदी तुच्छेतेने बघत होती.
त्याच वेळी काही बायकांनी चहा घेतला .ती जिथे उभी होती तिथे एक वयस्कर महिला बसलेली होती.तिनी चहा घेतला ,पण तिला अजिबात आवडले नाही तिनी जाणून बुजून हलका धक्का मारला पण ती महिला सावध होती .त्यामुळे ती बाजूला झाली आणि तो चहा त्या हायफाय च्या पायावर किंचित पडला बस निम्मित झाले आणि तिनी
सरळ बाटलीभर पाणी पायावर ओतून दिले सगळे घाण केले .तोंडातून सारखे
बडबड चालू अगदी वरतून ती हायफाय दिसत होती त्याला न शोभणारी .सडक छाप भाषा होती तिची .साल्ये फालतू लोक अजिबात अक्कल नाही .कुठून येतात
आणि या पेक्षा खालची भाषा होती तिची सगळ्या आवक होऊन बघत होत्या .
ज्या खाली बसल्या त्यांना तिनी पाणी ओतले म्हणून उभे राहिला लागले .
त्यातील एक तिला बोलली म्याडम आपल्याला एवढा त्रास होती तर आल्या
कशाला ट्रेन मध्ये स्पेशल गाडी करायची होती ना.बस ती लगेच ये साली चूप बस कोणी हिचे तोंड बंद करा .थांब पोलिसांनाच बोलावते म्हणून तिनी पोलिसांना बोलावले .
एक रेल्वे इन्स्पेक्टर डब्यात आला पण त्याच वेळी ती काही बोलणार त्या आधी
सगळ्या एकदम बोलल्या साहेब जागा नाही म्हणून हि बाई भांडत आहे आणि हिचा धक्का लागला म्हणून चहा सांडला.पोलिसांनी बघितले एक सीटवर सहा बसले.तो काही बोलला नाही .निघून गेला आणि एक मुलाला पाठवून ती जागा साफ करून घेतली .पण सगळ्यांना तिचा खूप राग आला होता .तिचे मुले चुपचाप तिला बघत होते.कदाचित काय संस्कार घेणार होते ते आईचा काय माहिती.? ट्रेन चालू झाली सगळ्या एकमेकशी गप्पा मारत होते कुठून आले कुठे जाणार .हसत खेळत प्रवास चालू होता.त्या हायफाय बाई कडे कोणी बघत पण नव्हते .जशी ती तिथे नाहीच आहे.किती वेळ ती उभी राहणार होती .शेवटी
जिथे तिनी घाण केली होती मुद्दाम तिथेच आता ती खाली बसली होती .
हळूहळू तिचा अहंकार कमी झाला होता .मी इतर पेक्षा अलग आहे याची तिची घमेंड कमी झाली होती.आता ती बाकी सारखी एक ट्रेन प्रवाशी होती.
हळू हळू एक एक स्टेशन येत गेले बायका उतरत गेल्या.एकमेकीना निरोप देत होत्या .त्या कोणाच्या कोणी नव्हत्या होता साथ काही तासाचा प्रवास ...
न विसरता येणारा .पण असे वागून त्या हायफाय बाईला कोणी विसरणार नाही
काय मिळाले असेल तिला असे वागून .
नुसते कपडे चांगले असणे म्हणजे ती व्यक्ती खरेच चांगली असेलच असे नाही .
नाही का ?????
थोड्या दिवसा पूर्वी नाशिक रोड वरून सकाळी सकाळी सेवाग्राम एक्प्रेस पकडली .नागपूर वरून येणारी हि ट्रेन आधीच भरून आली होती त्यात महिला डबा हा अतिशय लहान असल्या मुळे जागा नव्हती.एका बाकावर पूर्ण एक मुस्लीम परिवार बसलेले होते.त्यांना रिक्वेस्ट केली आणि थोडी जागा भेटली .काही तर जागा नाही म्हणून खाली बसले होते तर काही बायका झोपल्या होत्या.नागपूर वरून आलेल्या त्या बायका सगळ्या एकमेकीना छान ओळखायला लागल्या होत्या.कोणाची कोणा बद्दल काही तक्रार नव्हती.
इगतपुरी स्टेशन आले सगळ्यांना भूक लागली होती म्हणून कोणीं ना कोणी काही ना काही घेण्याचे ठरवले.कोणी चहा घेतला कोणी वडापाव,कोणी भजी
पाव घेतले .पाण्याच्या बाटल्या घेतल्या.ट्रेन येथे जास्त वेळ थांबते म्हणून .
आणि तेव्हाच तीन मुले आणि एक पस्तिशीची महिला अतिशय भारी कपडे महागडे घड्याळ हातात महागडा मोबाईल मुलाच्या हातात tab. तिची आई बरोबर डब्यात चढली.आल्या बरोबर स्वताची जड ब्याग धडकन खाली ठेवली ती एक बाईच्या पायावरच तो ओरडली नन्तर ती काढली आणि सुरु झाला तिचा आरडा ओरडा .थोडे सरका जागा द्या.पण जागा नाही तर कुठून देणार तिला.मग ती मग मुलांना बोलली वरती जिथे झोपायची जागा असते तिथे जाऊन बस.
तो मुलगा वरती चढत असतानी त्याचं पायात बूट तसेच होते सगळे काही ना
काही खात होते.त्या मुळे बूट काढून वरती चढ सांगत होते पण ती बाई "आम्ही कार मधून आलो आहे " असे उत्तर दिले .तिचे हे वागणे बघून एक बाई बोलली
मग कार मधेच जायचे का आली ट्रेन मध्ये.त्यावर ती काय वाटेल ते बोलायला
लागली.सारखी हालचाल त्या मुळे कोणाचा पाव पडला कोणाचे भजे पण कोणी तिला काही बोलले नाही .पण ती सारखी बडबड करत होती.काय बायका आहे सरकत नाही हे नाही ते नाही .सगळ्या कडे ती अगदी तुच्छेतेने बघत होती.
त्याच वेळी काही बायकांनी चहा घेतला .ती जिथे उभी होती तिथे एक वयस्कर महिला बसलेली होती.तिनी चहा घेतला ,पण तिला अजिबात आवडले नाही तिनी जाणून बुजून हलका धक्का मारला पण ती महिला सावध होती .त्यामुळे ती बाजूला झाली आणि तो चहा त्या हायफाय च्या पायावर किंचित पडला बस निम्मित झाले आणि तिनी
सरळ बाटलीभर पाणी पायावर ओतून दिले सगळे घाण केले .तोंडातून सारखे
बडबड चालू अगदी वरतून ती हायफाय दिसत होती त्याला न शोभणारी .सडक छाप भाषा होती तिची .साल्ये फालतू लोक अजिबात अक्कल नाही .कुठून येतात
आणि या पेक्षा खालची भाषा होती तिची सगळ्या आवक होऊन बघत होत्या .
ज्या खाली बसल्या त्यांना तिनी पाणी ओतले म्हणून उभे राहिला लागले .
त्यातील एक तिला बोलली म्याडम आपल्याला एवढा त्रास होती तर आल्या
कशाला ट्रेन मध्ये स्पेशल गाडी करायची होती ना.बस ती लगेच ये साली चूप बस कोणी हिचे तोंड बंद करा .थांब पोलिसांनाच बोलावते म्हणून तिनी पोलिसांना बोलावले .
एक रेल्वे इन्स्पेक्टर डब्यात आला पण त्याच वेळी ती काही बोलणार त्या आधी
सगळ्या एकदम बोलल्या साहेब जागा नाही म्हणून हि बाई भांडत आहे आणि हिचा धक्का लागला म्हणून चहा सांडला.पोलिसांनी बघितले एक सीटवर सहा बसले.तो काही बोलला नाही .निघून गेला आणि एक मुलाला पाठवून ती जागा साफ करून घेतली .पण सगळ्यांना तिचा खूप राग आला होता .तिचे मुले चुपचाप तिला बघत होते.कदाचित काय संस्कार घेणार होते ते आईचा काय माहिती.? ट्रेन चालू झाली सगळ्या एकमेकशी गप्पा मारत होते कुठून आले कुठे जाणार .हसत खेळत प्रवास चालू होता.त्या हायफाय बाई कडे कोणी बघत पण नव्हते .जशी ती तिथे नाहीच आहे.किती वेळ ती उभी राहणार होती .शेवटी
जिथे तिनी घाण केली होती मुद्दाम तिथेच आता ती खाली बसली होती .
हळूहळू तिचा अहंकार कमी झाला होता .मी इतर पेक्षा अलग आहे याची तिची घमेंड कमी झाली होती.आता ती बाकी सारखी एक ट्रेन प्रवाशी होती.
हळू हळू एक एक स्टेशन येत गेले बायका उतरत गेल्या.एकमेकीना निरोप देत होत्या .त्या कोणाच्या कोणी नव्हत्या होता साथ काही तासाचा प्रवास ...
न विसरता येणारा .पण असे वागून त्या हायफाय बाईला कोणी विसरणार नाही
काय मिळाले असेल तिला असे वागून .
नुसते कपडे चांगले असणे म्हणजे ती व्यक्ती खरेच चांगली असेलच असे नाही .
नाही का ?????
No comments :
Post a Comment