Saturday, 28 February 2015

माझी फेसबुक पोस्ट

एखाद्या व्यक्तीला जीव लावणे ,माया देणे कधी कधी जास्त होते ,
मग ती आईची माया असो नाही तर मित्र ,नातेवाईक कोणी असो .
एक मर्यादे पर्यंत ठीक असते पण जेव्हा अति प्रेम समोरच्या आयुष्यात
जर दाखल अंदाजी करत असेल तर मग माणसावर जेवढ प्रेम कराव 
तेवढी ती दुर जातात .असे वाटते ,वाटू शकते .
सुंदर दिसणारे फुलांना नाजूक पणे हळुवार हाताळावे लागते नाही तर
त्यांच्या पण पाकळ्या गळून जातात .नात्याचे पण तसेच असते ..
जवळची नाते पण असेच हळुवार पणे जपावी लागतात .नाही तर ती दुरावतात .
मनापासून आपले मानले ते आपल्याला विसरून जातात .
नाते जपा काळजी घ्या पण ठाराविक अंतर मात्र नेहमी असू द्या .

No comments :

Post a Comment