Saturday, 28 February 2015

काही समजुती ....

बस stop वर काही मुली उभ्या होत्या संध्याकाळची वेळ होती .
कुठे तरी कार्यक्रमाला जात असव्यात .आधुनिक पद्तीचा पेहराव केलेल्या मस्त चिवचिवत होत्या .पण एक गोष्टीने लक्ष वेधून घेतले ते म्हणजे सगळ्यांनी छान केस कापले होते .आणि सगळ्यांनी केस मोकळे ठेवले होते ."तिन्ही सांजाला असे केस मोकळे ठेऊ नाही,कुठे झिपऱ्या उडवत फिरत्या "असे म्हणारी आई आठवली .खरच अलग होता तो जमाना ,खूप काही आई वडील सांगत.हे करू नाही ते करू नाही .संध्याकाळी केस मोकळे सोडू नाही ,संध्याकाळी केर फेकू नाही .रात्री मीठ कोणाला देऊ नाही ,अगदी जेवतानी दारात बसू नाही ,झाडूला पाय मारू नाही ,असे खूप काय काय .काही गोष्टी पटत नसत .पण मोठे सांगतील ते ऐकायचे असते उलट प्रश्न नसतात विचारायचे .समजा कधी का नाही करायच्या या गोष्टीला उत्तर असे आमच्या आई बापाने सांगितले आम्ही ऐकले आम्ही अति शहाणे नव्हतो तुमच्या सारखे असे उत्तर मिळत असे खरे तर संध्याकाळी लक्ष्मी येते म्हणून हे नाही करायचे हे उत्तर होते त्यावर .लक्ष्मी म्हणजे गाई गुरे ,शेतातून येत .पण अनेक गोष्टीचा अर्थ कधी लागला नाही .पण आज पण नकळत या गोष्टी पाळल्या जातात सवयीने ...पण आजच्या पिढीला आता काहीच नाही पटत त्यांना पर्त्येक गोष्ट का नाही करायचे याचे कारण हवे असते .आणि आमची मधली पिढी मात्र आमच्या वेळी नव्हते असे एवढेच बोलते .कारण आधी आई बाप सांगेल ते ऐकले त्यांना प्रश्न नाही केले .आणि आज मुले जे काही नवीन तत्त्वज्ञान म्हणजे अक्कल पाजळतील ती पण ऐकयला लागते .कारण आमच्या कडे पर्याय कुठे आहे .नाही तर आई तुला काय कळत नाही .हे ऐकयला लागते .तुमचा जमाना अलग होता .पण आज आठवले गावात तेव्हा लाईट नव्हत्या .खूप अंधार असे .भुते असतात असा एक समज होता .आणि केस मोकळे सोडू नाही नाही तर भूत लागते .असे काही .....पण खरे कारण असणार मोकळे केस जर गाळले तर ते गायी गुराच्या तोंडात जाऊ नाही .जेवणात पडू नाही .असे काही असेल .पूर्वीच्या काळी प्रत्येक गोष्टीला जरी आजच्या सारखे वैनानिक कारण देत येत नसेल पण साधा पद्धतीनी समजेल असे हि करणे असू शकतात ना .संध्याकाळ होण्या आधी केर काढावा कारण त्यात जर आपल्यला इजा होणर्या काही वस्तू असतील तर त्या अंधार होण्या आधीच उचल्याला जाव्या अशा हेतू असू शकतो  ना .
२८/२/१५

No comments :

Post a Comment