Sunday, 12 April 2015

असेच मनातले काही {{ माझी फेसबुक पोस्ट }}

कधी कधी काही व्यक्ती मनाला लागेल असे बोलतात .
सवय असते का ?
मुद्दाम दुसऱ्याला कमी लेखणे असते .
त्यावर काहीचे मत असते ..अश्या बोलण्या मुळे माणूस अजून चांगले काम 
करू शकतो .
पण काचेला तडा गेला तर ती परत एकसारखी दिसते का नाही ना ?
काही व्यक्ती अश्या बोलण्या मुळे खूप दुखावल्या जातात .कदाचित
आपण काही चांगले करू शकणार नाही असे वाटते त्यांना .
मग आत्मविश्वास कमी होतो .
स्पष्ट बोलणे अलग आणि नावे ठेवणे अलग असते ना ?
कोणाचा एक शब्द खूप आधार देऊन जातो .
तर काही शब्द खूप घेऊन जातात ...
असेच मनातले काही

No comments :

Post a Comment