Friday, 20 November 2015

आजच्या महिला

आज आपण बोलतो समाज सुधारला आहे .खूप काही बदलले आहे.आज स्रिया शिकत आहे आपल्या पायावर उभ्या राहत आहे.महिला सक्षम झाल्या आहे .महिलाना न्याय देण्यासाठी महिला संघटना आहेत.महिलांच्या बाजूने कायदे आहे.पण आज देखील किती कायदे तळागाळातील महिला पर्यंत पोहचले आहेत.
शहर पुरत्या मर्यादित आणि साक्षर महिला साठी काम करणार्या किती महिला संघटना खेड्यात जावून महिला साठी झगडत आहेत.अपवादाने असतील पण फारशा नाही.आज देखील पुरुषी मानसिकतेचा मोठा पगडा जाणवतो.आज पण कुठे तरी स्रीला दुय्यम वागणूक मिळते.तिला काही गोष्टी करण्या पासून रोखले जाते.
"स्त्रीने स्वताला पती मध्ये त्याच्या घरात स्वताला समर्पित केले पाहिजे"स्वाध्याय परिवारातील काही लोक घरोघर जातात.लोकांना भेटतात.त्यांच्या बरोबर अशीच चर्चा चालू असतानी त्यातील एक वयस्कर व्यक्ती जे बोलले ते विचार करायला भाग पाडते. सुशिक्षित असणारे हे लोक जर अशा विचार करत असतील तर......प्रश्न हा आहे नेहमी स्री ने तडजोड केली आहे करत आहे.मग आजच्या बदलत्या काळात पुरुषाने का नाही बदलायचे.आज कायदे असून देखील अनेकदा महिलांवर अन्याय होतच आहे.हो मान्य आहे अनेक महिला या कायद्याचा चुकीचा उपयोग करतात.सासरच्या लोकांना त्रास देतात.म्हणून सगळ्या सारख्या असे होत नाही ना ?
आज पण आम्ही मुला कडील म्हणून एक वेगळ्या तोऱ्यात वागणारे भेटतात.आणि त्याच्या या विचारांना खतपाणी घालणाऱ्या महिलाच असतात.
आज पण मुलगा हावा असा विचार आधी केला जातो.एक मुलगी किवा फक्त मुलगी असेल तर अनेक प्रश्न विचारले जातात."मुलगीच आहे का ? एक तरी मुलगा हावा होता "हे ऐकवले जाते.
टीव्ही वर येणर्या मालिका आणि त्यात दाखवले जाणारे भपके बाज लग्न या मुळे आपल्या मुलाचे लग्न असे होयला पाहिजे हि अपेक्षा केली जाते.जर त्यात काही कमी राहिले तर पुढील वादळाचे बीज तिथेच पडते .मग सुरवात होते त्रास देण्यास मग मुलगी कमवती असो नाही तर नसो.तिला ऐकवले जाते तिचा माहेरची कमी .......बदल हवा तो होईल पण अजून अनेक वर्ष जावे लागेल.तळागाळातील महिला पूर्ण साक्षर होतील स्वताचे हक्क समजून घेतील तेव्हा.

No comments :

Post a Comment