Friday, 20 November 2015

नवरंग आणि साड्या

गणपती उत्सव संपले नवरात्री उत्सव पण संपला बघता बघता दिवाळी येणार आणि जाणर.
नेहमीचा रुटीन चा कंटाळा येतो त्यातून हे सन उत्सव एक वेगळा आनंद देतात.
यामागे काही करणे नक्की असतात.म्हणून तर सन साजरे केले जातात .
माणसे हे समूह प्रिय असतात.कोणी एकटा जगू शकत नाही त्यांना दु:ख विचारणारे कोणी हवे असते तसे सुख आणि आनंद साजरे करायला कोणी हवे असते .आणि तो करता येतो सन आणि उत्सवाच्या वेळी .
नवरात्री हा जास्त करून महिलांचा सन समजला जातो.स्री ला एक शक्ती समजली जाते.पण तिला त्याची जाणीव व्हयला हवी .घर आणि नोकरी सांभाळणारी आजची स्री ,अनेक क्षेत्रात यशस्वी होते आहे .आणि त्याच बरोबर आपल्या परंपरा देखील ती सांभाळण्याचा प्रयत्न करते .
अनेक महिला आज उच्चशिक्षित असून गृहिणी देखील आहेत .काही मुला साठी चांगली नोकरी सोडून आनंदाने गृहिणी होतात .छोट्या शहरात नाही पण मुंबई सारख्या बंद दरवाज्या च्या आत राहणारी स्री जेव्हा मुले थोडी मोठी होतात .तेव्हा तिला नेमके काय करावे हे समजत नाही .तिचे जग हे तिचे घर असते .
आणि अश्या महिला साठी हक्काचे व्यासपीठ भेटले ते फेसबुक मुळे .
घरात राहून जगाशी संपर्क करता आला .आणि येथे त्यांना आपण एकटे नाही याची जाणीव झाली .
नोकरी करणाऱ्या महिला एकत्र येवून सन उत्सवाचा आनंद घेतात .पण आमच्या सारख्या कधी बाहेर न पडणार्या गृहिणीना कुबेर सारखा एक हक्काचा ग्रुप भेटला जिथे आम्ही ९ दिवस मस्त नवरात्री साजरी केली .वर्षानु वर्ष घेतलेल्या साड्या आम्ही बाहेर काढून घरात का होईना ते घातल्या .आमच्या मुलांना फोटो काढायला लावले,प्रत्येक रंगाची साडी शोधताना आमचा भूतकाळ समोर आला ."अरे हि साडी आहे माझ्या कडे ,लक्षातच नव्हते "असे उद्गार स्वताशी काढले.मग कोणी बहिणीनि दिली तर एखादी भाऊबीज भेट निघाली आणि खूप साऱ्या आठवणी जाग्या झाल्या .फोटो कोणी कोणी टाकला हे बघतानी मजा पण आली .कोणी काही बोलो किती नावे ठेवली तरी कधी कधी काही गोष्टी खूप आनंद देवून जातात.हेच खूप आहे .आणि त्याच्या आठवणी कायम मनात राहतील .त्या




साडी आवडत नाही असी स्री कोणी नसेल,साडी मध्ये कोणती पण भारतीय स्री छानच दिसते .आज पण खेड्यात साड्या जास्त वापरल्या जातात .मुंबई सारख्या शहरात जिथे रोज ट्रेनचा प्रवास असतो .धावत पळत बस पकडायला लागते .आणि मुंबई मधील असणारी गरमी या मुळे साडी पेक्षा ड्रेस घालणे सुटसुटीत असतो .तरी देखील अनेक बायका कडे खूप साड्या असतात .कुठल्या तरी सणाला घेतलेल्या .तसाच पडून असतात .कधी घालायच्या असा प्रश्न .मग फ्याशन जाते .आणि ती साडी घालायला नको वाटते .
पण काही वर्षा पूर्वी नवरात्री मध्ये नऊ दिवस नवरंगाच्या कपडे घालण्याची नवीन पद्धत सुरु झाली .आणि बिचारया कपाटात "कधी तरी आमचा नंबर येईन याची वाट बघणाऱ्या ", साड्या घातल्या जावू लागल्या ,एक ड्रेस कोड असल्या सारख्या .कोणी काही बोलत असले तरी छान वाटते असे सारखे कपडे घालणे एक अलग फील येते .माझ्या माहिती नुसार सगळ्या कडे सगळ्या रंगाचे ड्रेस आणि साड्या असतातच .कोणी खास नवीन विकत घेतात असे नाही .
त्या निमित्ताने जर एक वेगळ्या प्रकारे नवरात्री साजऱ्या करत असेल तर कोणी त्याची टिंगल का करावी .शाळेत तर सारखे कपडे घालतच होते ना ?

No comments :

Post a Comment