Friday, 20 November 2015

माझ्या फेसबुक पोस्ट

आईवडिला साठी आपली मुले हेच सर्वस्व असतात .त्यांच्या जन्मा पासून ते प्रत्येक वेळी ते मुलांना चांगले आयुष्य आणि भविष्य देण्या साठी धडपडत असतात .मग त्या साठी मुला साठी किवा मुली साठी एखादया खास दिवसाची गरज आई वडिलांना वाटत असते का .? दिवस हे आठवण करण्या साठी असतात .पण ते कधी आपल्या मुलांना विसरत नाही मग आठवण्या साठी असा दिवस का ?मदर डे किवा फादर डे मुलाना मात्र तो दिवस आईवडिलांची आठवण काढण्यास साजरा करवा लागतो .नाही का ?
अनेक मुले आईवडील याना विसरून जातात नाही का ?





रोज आपल्याला दिवसाच्या सुरवाती पासून ते अगदी झोपे पर्यंत अनेक लोक भेटतात .अनेक स्वभावाचे ,अगदी फटकळ तर काही दोन तीन वाक्यात आपल्याशी करणारी ,तर काही व्यक्तीचे व्यक्तिमत्व असे असते कि त्यांना बघताच त्यांची आपल्यावर छाप पडते .पण अश्या माणसांच्या स्वभावाची जेव्हा ओळख होते तेव्हा आपल्या मनात त्यांच्या बद्दल आदर राहीलच हे सांगत येत नाही .कारण काही माणसे हे प्रचंड अहंकारी असतात .मग तो कशाचा असेल .पण कधी कधी आपण जे नाही ते दाखवताना अनेक व्यक्ती मात्र नको तो अहंकार बाळगून असतात .का ? असे आपल्याला वाटते .कारण अश्या व्यक्ती सारासार विचार न करता बोलतात .ते बोलातानी ते विचार पण करत नाही , आपण समोरच्या लोकांचे मन दुखावतो तेव्हा नकळत आपण आपल्या बुद्धीची किती कुवत आहे हे दाखवून देतो .असे लोक लगेच ओळखायला येतात त्यांना इग्नोर करणे हा उत्तम उपाय असतो .पण काही लोकांना असे लोक ओळखू येत नाही मग ते बसतात डोके लावत .पण यामुळे होते काय ? बाकी लोकांचे मनोरंजन होते .हे लक्षात येत नाही .
तर काही लोक अतिशय बुद्धिमान असतात .त्यांचे साधे बोलणे देखील मन लावून ऐकायला देखील आवडतात .असे लोक कधी जास्त बोलत नाही .वाद घालत ते शांत पणे बघत असतात .कारण त्यांना जास्त बोलण्याची गरज नसते आपण काय आहे हे दाखवण्याची गरज नसते ..कारण त्यांनी एक ओळ लक्षात ठेवलेली असते .
अनंत वाचाळ बरळती बरळ
असेच मनातले काही


ऑक्टोबर

No comments :

Post a Comment