पुरुष दिवस का ???
आज अनेक पोस्ट वाचून समजले आज पुरुष दिन आहे.नेहमी कोणते ना कोणते दिवस असतात.सवय झाली ना ? पण आज जरा वेगळे वाटले.
महिला वरील अत्याचार चा विरोध म्हणून महिला संघटना स्थापन झाल्या.पुरुष प्रधान संस्कृती मध्ये महिलांना त्रास होता.हे जग जाहीर आहे.. हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून होणारे शारीरिक आणि मानसिक अत्याचार, प्रसंगी तिचा बळी देणे, अत्याचारातून मुक्ती मिळविण्यासाठी आत्महत्या यातून तिला संरक्षण देण्यासाठी शासनाने ४९८ अ हे कायद्याचे नवीन कलम लागू केले.
हळूहळू काळ बदलत गेला.स्रीया साक्षर झाल्या.स्वताच्या पायावर उभ्या राहू लागल्या.त्यांना स्वताच्या हुशारीची जाणीव झाली.पुरुषाचे वर्चस्व असलेले अनेक ठिकाणी स्रिया काम करू लागल्या.येथेच स्री आणि पुरुष समानता संघर्षाचे बीज रोवले गेले असावे.
फक्त स्रिया पिडीत हि संकल्पना हळूहळू बदलू लागली.४९८ कलमाचा गैरवापर करण्यास काही महिलांनी सुरवात केली.यातून मग अनेकदा काही दोष नसतानी अनेक जन भरडले जावू लागले.स्वता कमवतो याचा कुठे तरी काही महिलांनी अहंकार झाला त्यातून मग पुरुषांना त्रास देण्याच्या घटना घडू लागल्या.पण लोक लाजे मुळे आणि समाजात बायको याला त्रास देते, " याला बायको घाबरत नाही ' असे म्हणून कोणी हसू नाही म्हणून ,अनेक पुरुष महिला कडून आणि त्यांच्या घरातील लोका कडून होणारा मानसिक त्रास सहन करत राहिले.४९८ कलम नुसार असलेला कायदा हा दखलपात्र, अजामीनपात्र आणि तडजोड नसलेला असा कायद्याचा त्या गैरवापर करू लागल्या. कजाग स्त्रिया पती व सासरच्या लोकांविरुद्ध कुठलीही खोटी तक्रार करून त्यांना छळू लागल्या. अनेक निरपराध पुरुष व त्यांचे कुटुंबीय पोलीस आणि कायद्याच्या कचाट्यात नाहक भरडले जाऊ लागले. त्यामुळे पत्नीपीडित पुरुषांचा प्रश्नही गंभीर होऊ लागला.यातून काही पुरुष एकत्रित आले आणि १९९१ मध्ये नागपूर मध्ये पत्नीपीडित पुरुष मंच आणि स्त्री अत्याचार पीडित पुरुष विकास संस्थान केल्या .महिला कडून अत्याचार होतो हि गोष्ट हसण्यावारी नेली जात होती त्यामुळे या संघटना अपयशी झाल्या
मात्र २00५ मध्ये बंगलोर येथे सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशनची (सिफ) स्थापना झाली आणि इंटरनेट मुळे आज देशातील अनेक संस्था या संस्थेला जोडल्या गेल्या आहेत.या मुळे पुरुषाच्या समस्या कडे लक्ष वेधले जाऊ लागले.
खरे तर पुरुष हे कमजोर नसतात.ते कधी रडत नाही .असे मनावर बिंबवले जाते.पण आजच्या टेन्शन च्या या जगात पुरुषांना पण अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते .फक्त घरातच नाही तर अनेक ठिकाणी पुरुषांना पण मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते .मग पुरुष फक्त नवरा असेल असे नाही . पुरुष मग भाऊ असेल किवा वडील ,स्री पुरुष समानता असावी पण फक्त समानता म्हणून फक्त बरोबरी नसावी .असावी समजदारी जी दोघांनी दाखवण्याची गरज असते .
पुरुष दिन म्हणून असेच मनातले काही .
आज अनेक पोस्ट वाचून समजले आज पुरुष दिन आहे.नेहमी कोणते ना कोणते दिवस असतात.सवय झाली ना ? पण आज जरा वेगळे वाटले.
महिला वरील अत्याचार चा विरोध म्हणून महिला संघटना स्थापन झाल्या.पुरुष प्रधान संस्कृती मध्ये महिलांना त्रास होता.हे जग जाहीर आहे.. हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून होणारे शारीरिक आणि मानसिक अत्याचार, प्रसंगी तिचा बळी देणे, अत्याचारातून मुक्ती मिळविण्यासाठी आत्महत्या यातून तिला संरक्षण देण्यासाठी शासनाने ४९८ अ हे कायद्याचे नवीन कलम लागू केले.
हळूहळू काळ बदलत गेला.स्रीया साक्षर झाल्या.स्वताच्या पायावर उभ्या राहू लागल्या.त्यांना स्वताच्या हुशारीची जाणीव झाली.पुरुषाचे वर्चस्व असलेले अनेक ठिकाणी स्रिया काम करू लागल्या.येथेच स्री आणि पुरुष समानता संघर्षाचे बीज रोवले गेले असावे.
फक्त स्रिया पिडीत हि संकल्पना हळूहळू बदलू लागली.४९८ कलमाचा गैरवापर करण्यास काही महिलांनी सुरवात केली.यातून मग अनेकदा काही दोष नसतानी अनेक जन भरडले जावू लागले.स्वता कमवतो याचा कुठे तरी काही महिलांनी अहंकार झाला त्यातून मग पुरुषांना त्रास देण्याच्या घटना घडू लागल्या.पण लोक लाजे मुळे आणि समाजात बायको याला त्रास देते, " याला बायको घाबरत नाही ' असे म्हणून कोणी हसू नाही म्हणून ,अनेक पुरुष महिला कडून आणि त्यांच्या घरातील लोका कडून होणारा मानसिक त्रास सहन करत राहिले.४९८ कलम नुसार असलेला कायदा हा दखलपात्र, अजामीनपात्र आणि तडजोड नसलेला असा कायद्याचा त्या गैरवापर करू लागल्या. कजाग स्त्रिया पती व सासरच्या लोकांविरुद्ध कुठलीही खोटी तक्रार करून त्यांना छळू लागल्या. अनेक निरपराध पुरुष व त्यांचे कुटुंबीय पोलीस आणि कायद्याच्या कचाट्यात नाहक भरडले जाऊ लागले. त्यामुळे पत्नीपीडित पुरुषांचा प्रश्नही गंभीर होऊ लागला.यातून काही पुरुष एकत्रित आले आणि १९९१ मध्ये नागपूर मध्ये पत्नीपीडित पुरुष मंच आणि स्त्री अत्याचार पीडित पुरुष विकास संस्थान केल्या .महिला कडून अत्याचार होतो हि गोष्ट हसण्यावारी नेली जात होती त्यामुळे या संघटना अपयशी झाल्या
मात्र २00५ मध्ये बंगलोर येथे सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशनची (सिफ) स्थापना झाली आणि इंटरनेट मुळे आज देशातील अनेक संस्था या संस्थेला जोडल्या गेल्या आहेत.या मुळे पुरुषाच्या समस्या कडे लक्ष वेधले जाऊ लागले.
खरे तर पुरुष हे कमजोर नसतात.ते कधी रडत नाही .असे मनावर बिंबवले जाते.पण आजच्या टेन्शन च्या या जगात पुरुषांना पण अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते .फक्त घरातच नाही तर अनेक ठिकाणी पुरुषांना पण मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते .मग पुरुष फक्त नवरा असेल असे नाही . पुरुष मग भाऊ असेल किवा वडील ,स्री पुरुष समानता असावी पण फक्त समानता म्हणून फक्त बरोबरी नसावी .असावी समजदारी जी दोघांनी दाखवण्याची गरज असते .
पुरुष दिन म्हणून असेच मनातले काही .
No comments :
Post a Comment