Friday, 20 November 2015

माझ्या फेसबुक पोस्ट

माणसाला नेहमी आपल्याला जे आपल्याला सोयीचे आणि चांगले असेच आवडते .मग ते काही असो .{बोलणे ,वाचणे,लिहिणे } बरोबर ना ?




जसे जसे आयुष्य पुढे जाते तशा गेलेल्या दिवसांच्या आणि भल्या बुऱ्या घटनाच्या आठवणी वाढत जातात .मग कधी त्या खूप कटू असतात .त्यांच्या आठवणी सुद्धा डोळ्यात आज देखील पाणी आणतात .तर काही सुखद घटनाच्या आठवणी आज पण चेहऱ्यावर हास्य आणतात .सुखद असो कि दुखद आठवणी आणि त्यांच्या बरोबर जोडली गेलेली माणसे आठवून आज पण मन बैचेन होते हे मात्र खरे .


अति परीचयाने आवज्ञा .हि म्हण कधी कधी खूप खरी आहे असे वाटते .


साधे पणा आणि ढोंगी पणा या मधील फरक ओळखता आला पाहिजे ना ?



घटना घडून जातात आठवणी मागे राहतात .आठवणीतील माणसे कधी आपल्याला विसरून जातात .पण त्यांच्या आठवणी मात्र येत राहतात .ज्या त्रास दायक असतात .तर कधी सुखद .दोन्ही मुळे त्रास होतो हे मात्र नक्की .मग वाटते ज्यांची आपल्याला आठवण येते .ते काढत असतील का आपली आठवण .कदाचित नाही कारण त्यांनी आपल्याला खूप मागे सोडून ते पुढे गेलेले असतात .



काही चांगल्या आणि मनाला आनंद देणारया गोष्टीत प्रवाहाला विरोध करण्या पेक्षा प्रवाहात सामील होणे कधी चांगले नाही का .


एखादी गोष्ट करता येत नसेल किवा ती जर मिळत नसेल तर .सरळ आवडत नाही सांगायचे .सो सिंपल.  




मला जे आवडते ते सगळ्याना आवडावे .मला जे आवडत नाही ते इतरांना आवडू नाही .हा हट्ट जर सोडला तर सगळ्यात आनंद घेता येतो .नाही का ?




व्यक्ती कोणत्या पदावर आहे त्यावरून त्याच्या बोलण्याला महत्व प्राप्त होते .नाही तर गल्लीत काही बोला कोणी ऐकत नाही .




माणसात राहण्याची सवय लागली कि एकटे राहणे नको वाटते .पण जर एकटेपणा .एकांत आवडायला लागला का .मग कोणी आजूबाजूला नको वाटते 




ढोंगी माणूस हा अनेकांना फसवत असतो पण अतिशय चांगल्या माणसाना फसवताना तो दहा वेळा विचार करतो .




विस्वास आणि विस्वासघात येत काय फरक आहे.खूप मोठा एकामुळे आयुष्याला चांगली दिशा मिळते तर दुसऱ्या मुळे माणूस आयुष्यातून उठतो.
तरी विश्वासावर जगावे लागते . विस्वासघातच्या अनुभवातून कोलमडून न जाता पुन्हा नवीन सुरवात करायला लागते.
असेच मनातले काही






निर्णय चुकतात आणि आयुष्य चुकत जाते .कधी तरी अनेक ,गोष्टीचा,निर्णयाचा पश्चाताप होतो .पण वेळ कधीच हातातून गेलेली असते .अनेक निर्णय केवळ लोक काय म्हणतील म्हणून घेतले जातात .त्याचा त्रास मात्र निर्णय घेणार्याला भोगायला लागतो .मग वाटते परत मागे जावे .दुनिया जाये भाड में,आपल्यला हवे तसे जगावे .बिनधास्त मनासारखे.




सुसंस्कृत,सभ्य,सज्जन असण्याचे काही तोटे असतात.कारण त्यांनी तसेच असावे असी अपेक्षा केली जाते.गमतीवर काही बोलणे पण लोक सिरीयस घेतात.किवा तुझा सारख्याला हे पटत नाही म्हणून मोकळे होतात..

No comments :

Post a Comment