Friday, 20 November 2015

शिक्षा

शाळेत आधी शिक्षक शिक्षा करतच होते ,तेव्हा आई वडील अजून मारले तरी चालेलं असे बोलत.पण त्या शिक्षकांना मुलांना बद्दल खूप काळजी असे. अगदी स्वताच्या खिशातून पैसे फी आणि पुस्तका साठी देणारे शिक्षक देखील होते.अनेकदा पालकांना शिक्षक ओळखत असत.कुठे भेटले तरी मुलाची प्रगती समजत असे.आजच्या सारखे सगळे पालक हे साक्षर नव्हते म्हणून त्यांना आपल्या मुलाने खूप शिकावे हि अपेक्षा असे .मग शिक्षक सांगतील ते योग्य असे होते .हळू हळू परस्थिती बदलत गेली आज अनेक पालक हे साक्षर आहेत .मुले शाळेत काय करतात त्यांना माहिती असते स्पर्धा वाढली,त्यामुळे प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना चांगले मार्क्स मिळावे हि अपेक्षा वाढली .
मग आले क्लास.शिक्षक शाळेत चांगले शिकवत नाही हा समज या मुळे वाढत गेला.अनेक शिक्षक हे फक्त एक नोकरी म्हणून शिक्षक होतात .अनेक शिक्षका मध्ये मग मुलांना शिकावतानी लागणारा पेशन्स नसतो.त्यात बदलती परस्थिती आणि वाढते टेन्शन यामुळे अनेक शिक्षक मग छोट्या करणा वरून मुलांना जबर शिक्षा करतात.त्यात मुलांना दुखापत होते.टीव्ही वर बातमी येते.
मग आठवतात आमचे शिक्षक त्यांनी केलेली शिक्षा ...एकाच वेळी हातावर घेतलेल्या दहा दहा छड्या .लाल झालेले हात पण घरी सांगायची सोय नव्हती .कारण अजून शिक्षा होत असे.
असेच मनातले काही ..

No comments :

Post a Comment