Friday, 20 November 2015

दिवाळी

जशी जशी दिवाळी जवळ येते .तसंतसे लहान असो कि मोठे असो बाजार वेगवेगळ्या समाना मुळे फुलून जातात.काही घेणे असो नाही तर नसो असेच जावून बघावे बाजारात,....बाजारात सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतात ते लहान मुलांचे कपडे .खास करून मुलीचे किती व्हरायटी फक्त बघत राहावे.
मोठे मोठे शोरुम असो कि अगदी छोट्या पाटीमध्ये वस्तू घेवून बसलेली एखादी आज्जी ,किवा लहान मुलगा असेल .कोणी तरी सामान विकत आहे कोणी घेत आहे .ज्यांची विक्री जास्त होते त्यांचे खुश चेहरे ,मना सारखी खरेदी झाली म्हणून घेणारे खुश ,मस्त वातावरण असते.हो या सगळ्या गर्दीत कंटाळतात ते छोटे मुले.पण काही घ्यायचे नसले तरी बाजारात नक्की एक फेरी मारावी.
दिवाळी आली असे वाटते.



आपल्यावरून जग ओळखावे अशी एक म्हण आहे.पण आजच्या जगात नेमका उलट अर्थ घेतला जातो.म्हणजे आज मी जसा जगतो आहे ज्या स्थिती मध्ये आहे तसेच जग आहे असे वाटते अनेकाना ,त्यामुळे समोरची व्यक्ती आणि तिची परस्थिती समजून घेतली जात नाही .आणि माणसे ओळखण्यात कुठे तरी कमी पडतात मग अनेकजण .




प्रगती मध्ये साथ देणार्यांना .यश मिळाल्यावर जे विसरतात .ते लवकरच जमिनी वर पण येतात .




आजच्या जगात {बाजारात }तीच वस्तू जास्त चालते .जी कमी टिकते
.{कमी टिकते म्हणून तर दुसरी घेतली जाते.}
म्हणून तर गुणवत्ता आणि टिकवू पणा देणारे मोठे नावे आज बाजारातून गायब झाले.





दिवाळी आली कि खरेदी आली .काहीना चांगली पारख असते ते छान खरेदी करतात .काहीना काय घ्यावे काळात नाही जे छान दिसते ते घेवून येतात .कौतुकाने कोणाला तरी दाखवतात ,आता सगळ्यांची आवड सारखी कशी असणार एकाला जो रंग आवडतो तो दुसर्यांना कसा आवडणार मग काही सरळ बोलतात.हा काय रंग आहे का ? किवा एवढे पैसे गेले बरोबर नाही .
अश्या वेळी काय होते ज्यांनी काही घेतले असेल त्याला अचानक वाटायला लागते त्याने जे घेतले ते बरोबर नाही ,मग त्याच्या मनात नकरात्मक विचार येतात.आणि त्याचा आनंद गायब होतो .
मान्य आहे त्यांनी घेतलेली वस्तू बरोबर नाही ,तर सरळ तसे बोलू नका .
आपले म्हणणे आपण मन न दुखावता मांडू शकतो ना ?
"अरे हा रंग छान आहे पण ,तो अमुक अजून छान दिसला असता ,किवा घेतली ना वस्तू छान आहे पण महाग पडली ," अश्या शब्दा मध्ये आपण सांगू शकतो .
नाही का ? ज्या मुळे कोणाचे मन पण दुखावले जात नाही .
असेच मनातले काही





कोणतीही व्यक्ती हि एकटी राहू शकत नाही ,म्हणजे काय आनंद आणि दु:ख व्यक्त करायला त्यांना कोणी हवे असते .आयुष्यात खूप काही हवे असते पण खूप प्रयत्न करून देखील काहीना ना मिळते काहीना नाही .काही लोका साठी शुल्लक असणारी गोष्ट काही लोकांना खूप प्रयत्न करून मिळते मग त्यांना गगना एवढा आनंद होतो .अर्थात तो कोणाला सांगावा वाटतो .पण सगळे लोक मिक्स होणारे नसतात .कमी बोलतात कमी मित्र असतात .किवा आजच्या बंद दार संस्कृती मुळे तो व्यक्त करता येत नाही .असे लोक मग ते आपल्या वाल वर टाकतात .कोणाला tag करतात त्या पेक्षा हे बरे ना ?
त्यावर त्यांना हसू नका .नाही पटत लाईक नका करू .उलट होता आले तर त्याच्या आनंदात सामील व्हा ..

No comments :

Post a Comment