Thursday, 25 February 2016

अशा काही प्रथा

\आमचा नाशिक आणि नगर जिल्ह्यात {बाकी माहिती नाही } लग्नात एक प्रथा असते .रुखवत आणणे. लग्नात फळ भरणे आणि कन्यादान या नंतर केला जाणारा विधी.मुलाच्या आईचा आणि त्याचा कडील महिलांचा मानपान करण्याची हि प्रथा. या मध्ये मग पाच भांडी आणि जमेल ते किवा काबुल केलेले 
असते ते ठेवले जाते .यात पुऱ्या आणि कुरड्या या महत्वाच्या असतात. खास या साठी पुऱ्या केल्या जातात.कुरड्या तर पंधरा ते वीस किलोच्या पेक्षा जास्त या साठीच केल्या जातात.
मुलाकडील बायकांनी पंगत मध्ये बसवून मग नवीन भांड्यात पुऱ्या आणि कुरड्या वाढल्या जातात. मग होते सुरवात गाण्याची.पण गाणे पेक्षा हि एक जुगलबंदीच असते.मुला कडील आणि मुली कडील एकमेकांना नावे ठेवणे सुरु
असते.मग होते सुरवात जे नाते ने मेहुणे असतात. किवा मेहुणी असते .त्याच बरोबर दीर वाहिनी आणि जे ज नात्याचे असतात त्यांच्या डोक्यावर कुरड्या फोडणे.त्या फोडतानी त्यांचा आवाज आणि ज्यांच्या डोक्यावर फोडली जाते.
त्यांची रिअक्शन बघण्यात मजा येते .आमचा कडे खूप चालते हे लग्नात.
मला कधी हे आवडले नाही. कुरड्या फोडण्यास सुरवात झाली कि कधी तिथे थांबत नसे .अनेकदा पुरुष कुरड्या फोडतात तेव्हा खूप जोरात लागते.याचा एकदाच अनुभव घेतला होता .डोक्यात सगळ्या कुरड्याचे तुकडे अडकतात ते आवडत नसे. अनेक वर्ष झाले कोणाच्या लग्नात गेले नाही त्यामुळे आता फोडतात कि नाही माहिती नाही.काल एक पोस्ट वरून आठवले हे सगळे..............

2 comments :

  1. आमच्याकडे पण हा प्रकार आहे.

    ReplyDelete
  2. आमच्याकडे पण हा प्रकार आहे.

    ReplyDelete