Sunday, 14 February 2016

रथ सप्तमी कथा ...

आज रथसप्तमी ....
संक्रातीचा सन आणि त्या नंतर घातले जाणारे हळदी कुंकू आज संपणार ...
आपल्या हिंदू संस्कृती मध्ये फक्त देवच नाही तर ग्रहाची देखील पूजा करण्याची पद्धत आहे .चंद्राची पूजा तर दर संकष्टीला केली जाते .त्या प्रमाणे 
सूर्याची पूजा देखील केली जाते ती रथ सप्तमीला .
रथ सप्तमी कथा ...
श्रीकृष्णाचा मुलगा शाम्ब याला आपल्या ताकदीचा आणि शरीर संपदेचा खूप अभिमान झाला होता.एकदा दुर्वासा ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते .दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागीट होते .हे श्रीकृष्णाचा मुलास माहिती नव्हते .दुर्वासा ऋषी हे नेहमी खूप तप करत असत .यावेळी पण ते खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटवायास आले होते .दुर्वास ऋषी यांचे शरीर तपा मुळे कमजोर झाले होते .ते बघून श्रीकृष्णाचा पुत्र त्यांचे कमजोर शरीर बघून त्यांना हसले . जेव्हा तो का हसतो याचे कारण जेव्हा दुर्वासा ऋषिना समजले तेव्हा ,आधीच रागीट असलेल्या दुर्वासाना त्याचा अतिशय राग आला .आणि त्यांच्या स्वभावा नुसार त्यांनी त्याला शाप दिला .तुझे शरीर कुष्ठरोगी होईल .आणि त्याचा लगेच त्याच्या शरीरावर असर सुरु झाला .
अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही .तेव्हा श्रीकृष्णाने
त्यांना सूर्याची उपसना करण्यास सांगितले .वडिलांची आज्ञा मानून शाम्ब याने
सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्यांचा रोग बरा झाला .
त्या प्रमाणे अजून एक कथा सांगितली जाते .
हर्षवर्धन राजाच्या दरबारात मयूर भट्ट नावाचा कवी होता .त्याला कुष्ठरोग झाला होता तेव्हा त्याने सूर्य सप्तक हे काव्य लिहिले .आणि त्याचा रोग बरे झाला .
रथ सप्तमीला ,अचला सप्तमी .आरोग्य सप्तमी असे सुद्धा म्हणतात .

फोटो  क्रेडीट गुगल 

No comments :

Post a Comment