Thursday, 25 February 2016

का शिकावा स्वयपाक

"मला नाही लग्न करायचे ! कोण बसेल सासरच्या लोकांच्या पुढे पुढे करत ."
हे वाक्य होते एका पंचवीस वर्ष वय असलेल्या एका मुलीचे ! मी मुली बरोबर पार्लर मध्ये गेले होते .तिथे अनेक मुली काम करतात .त्यांच्यात बोलणे चालू होते .का करायचे लग्न ,लग्न करा सासरी जा त्यांच्या पुढे पुढे करा. घरातील सगळे आवरा मग कामावर या .त्या पेक्षा आता आहे ते काय वाईट आहे का ? सकाळी मस्त आरामशीर उठा आपले आवरा ,हातात येणारा आयता डबा घ्या .कामावरून घरी गेले कि मस्त चहा जेवण .वाटले तर करा थोडे काम नाही केले तरी चालते.हे सवांद ऐकले आणि होम मिनिस्टर मधील प्रत्येक भागात अनेक सासू आपल्या सुने बद्दल बोलातानी ऐकलेले वाक्य आठवले ."सून चांगली आहे पण उशीर उठते " असे का बरे.फेसबुक वर काही पोस्ट बघतो .मुलगी जर चांगली असते तर मग सासू सासर्यांना का वृद्ध आश्रमात पाठवते .हाच तो फरक असतो .अनेक आया एक चूक करतात ते म्हणजे आपली मुलगी शिकली पाहिजे .तिनी स्वताच्या पायावर उभे राहिले पाहिजे.हा विचार करून अनेकदा मुलीना किचन मध्ये काही करू देत नाही .मग मुलीना काही येत नाही .आणि जे काही येते ते थोडेसे .मुलगी शाळेत जाते .कॉलेज मध्ये जाते.नंतर कामावर जाते .आई काय करते तिचा सगळे हातात देते .तिला डबा देते .तिनी काही काम केले नाहीतरी स्वता करून घेते .{काही घरात मुली स्वता करतात पण मुबई मध्ये तरी खूप अपवाद }मागे मुलीच्या कॉलेज मध्ये मिटींगला गेले होते .माझा बरोबर असलेली एक महिला घरी जाण्याची घाई करत होती ,कारण विचारले तर बोलली मुली घरी आहे ना ? अजून स्वयपाक होयचा आहे .मला थोडे आश्चर्य वाटले कारण तिचा मुली म्हणजे एक वीस वर्षाची आणि एक बावीस वर्षाची .त्यांना चहा पण येत नाही .मी त्यांना काही करू देत नाही हे ती महिला अभिमाना ने सांगत होती .मग याच बायका जेव्हा सून आणतात तेव्हा तिनी सगळे करावे हि अपेक्षा का करतात .मुलगी उशिरा उठली तर चालते .मुलीने काम नाही केले तर चालते .मुलीला आयता डबा देणे चालते .पण सून आली का ? तिनी स्वताचे करावे आणि घरातील पण करावे अशी अपेक्षा केली जाते .अनेक मुलीना काही येत नाही. मग वादास सुरवात होते .नवीन सुनेस आई जवळची वाटते .सासू नको वाटते .येथूनच सुरावात होते दुराव्याची मग आपले पणा कधी निर्माण होताच नाही.मुली साठी जेवढे करता तेवढे नका करू पण थोडे सहकार्य नक्की करता येवू शकते .स्वताच्या मुलीला पण तसे सांगा.आज अनेकदा ऐकायला मिळते कि मुलींनीच /महिलांनीच का स्व्यापक करायचा बरोबर आहे पण मुलीना स्वता पुरते तरी करून खाता येईन एवढे तरी जेवण बनवणे शिकावयाला हवे ना ? अनेकदा मुली आम्ही नोकर ठेवू असे उत्तर देतात.पण नोकर तरी मिळायला हवे ना ?सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले तेव्हा मुंबई अघोषित अशी बंद झाली होती .मग अश्या वेळी हॉटेल बंद मग अनेकांचे खाण्याचे हाल झाले .तेच मुंबईत पूर आला होता तेव्हा झाले होते .मग अशी वेळ येईन तेव्हा तरी स्वता पुरते काही तरी करता आले पाहिजे हे तरी आपल्या मुलीना शिकवायला हवे ना ?तू मुलगी आहेस ,मुली सारखी राहा ,असे आमचा काळात आमच्या आया अनेकदा आम्हाला ऐकवत असायच्या.अगदी लहान असल्या पासून मनावर हे पूर्ण बिंबवले जायचे.मग अगदी लहान वयातच घरात आईला स्वयपाक मध्ये छोटी मोठी मदत करायला मुलींची सुरवात होत असे ."मुलीला काय चूल आणि मुल तर करायचे आहे " या विचार नुसार मुलीना वाढवले जायचे .आज परस्थिती पूर्ण बदलली आहे.तरी पण त्यांच्या नकळत आपण आपल्या मुलांना मग तो मुलगा असो कि मुलगी त्यांना छोटे छोटे काम सांगून सवय लावू शकतो ना ?बघा पटले तर ........‪#‎असेचमनातील‬ काही
{ फोटो  गुगल वरून  घेतला }

No comments :

Post a Comment