Wednesday, 2 March 2016

असेच मनातले काही

ठाण्या मध्ये एकच व्यक्तीने आपल्या घरातील १४ लोकांना मारून स्वता आत्महत्या केली .त्याची बातमी करण्यास गेलेला रिपोर्टर अटैक येवून मरण पावला .एकूण १५ लोकांचा जीव गेला.कारण काही समजले नाही .
पण प्रश्न पडतो असे का घडते .का माणसे असे क्रूर झाले.
एक दिवस असा नसतो कोणी तरी कोणाची हत्या केली.आता काही गोष्टीचे काही वाटणे बंद झाले आहे ,काय कारण असेल याचे.आपण आज विज्ञानामुळे 
बोलतो जग जवळ आले पण खरच असे झाले आहे का ? 
आता एक क्लिक वर जगातील कोणती माहिती समजते .म्हणून आता आपल्याला कोणाची गरज राहिली नाही हा एक नवीन भ्रम तयार झाला आहे का ? आधीच्या काळी माणसे एकमेकावर अवलंबून होते .काही माहिती पाहिजे असेल तर एकमेकांना विचारले जात असे.माणसात सवांद होता.
समोरासमोर आल्या मुळे चेहरा दिसायचा मनात काय चालू आहे समजत असे .
मग त्या व्यक्तीला बोलते केले जात असे.आज जगातील कानाकोपर्यात आम्ही सोशल साईट मुळे मित्रमैत्रिणी तर बनवत आहे .रोज एकमेकांना भेटतो बोलतो ,पण खरच आम्ही सगळे खरे बोलतो का ?
जे बोलतात ते खरे हे मानायला मन तयार नसते कारण अनेक जन खोटे बोलून अनेकांना फसवत असतात .मग अश्या वेळी सवांद होतो पण मनातील बोलले जात नाही ते मनात राहते .वरवर नॉर्मल दिसणारे लोक मनातून खूप अस्थिर झालेले असतात .मग कधी तरी त्यांच्या कडून भयानक घडून जाते.आपण फक्त बोलतो तो ती शांत होता मग असे कसे झाले विस्वास बसत नाही.घटना ज्यांच्या आसपास घडते त्यांना ये गोष्टीनी खूप मोठा फरक पडतो .माणसाचा माणसावर विस्वास राहत नाही.मग सगळ्या नात्या कडे संशयाने बघितले जाते.
म्हणून आज खरच आज गरज आहे ती संवादांची एकमेकाशी वास्तव मध्ये  बोलण्याची ...
‪#‎असेचमनातलेकाही‬

No comments :

Post a Comment